शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

शाळेत न जाताही द्या दहावी-बारावीची परीक्षा !

By अमित महाबळ | Updated: August 23, 2023 19:58 IST

जळगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खासगीरीत्या १७ नंबरचा अर्ज ...

जळगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खासगीरीत्या १७ नंबरचा अर्ज भरून परीक्षा देता येते. त्यासाठी बारावीप्रमाणेच आता दहावीच्या खासगी विद्यार्थ्यांचेही अर्ज सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांमधून स्वीकारले जाणार आहेत. मार्च २०२४ परीक्षेपासून ही सुविधा लागू झाली आहे.

दहावीच्या परीक्षेला बाहेरून बसणाऱ्या विद्यार्थ्यांना संपर्क केंद्रामार्फत नोंदणी करावी लागत होती. आता ही पद्धत बंद करण्यात आली आहे. बारावीचे खासगी विद्यार्थी सर्व कनिष्ठ महाविद्यालयातून अर्ज भरतात, त्याच धर्तीवर दहावीचे खासगी विद्यार्थी नोंदणीचे अर्ज सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळेतून भरू शकणार आहेत. किमान शैक्षणिक पात्रता पाचवी उत्तीर्ण असून, अर्ज ऑनलाइन आहे.

यादीतून शाळा, कॉलेज निवडा

नाव नोंदणी करताना दहावी व बारावीच्या विद्यार्थ्याला त्याचा पत्ता व त्याने निवडलेले माध्यम यानुसार शाळांची यादी ऑनलाइन दिसेल. त्यामधील एका शाळेची निवड त्याने करायची आहे.

दिव्यांग असाल तर प्रमाणपत्र द्या

दिव्यांग विद्यार्थ्यांना खासगीरीत्या प्रविष्ट व्हायचे असेल तर त्यांनी दिव्यांगत्व प्रमाणपत्राची छायाप्रत प्रमाणित करून अर्जासोबत सादर करायची आहे. ही कागदपत्रे द्या..

शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत), नसल्यास द्वितीय पत्र व प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, पासपोर्ट आकारातील फोटो. ऑनलाइन अर्ज भरताना ही कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहेत. विद्यार्थ्याचा मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी द्यायचा आहे.

असा मिळवा अर्ज

अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रत विद्यार्थ्याला ई-मेलवर मिळेल. त्याची प्रिंटआऊट, शुल्क भरल्याची पावती, हमीपत्र दोन प्रतीत शाळा / महाविद्यालयात जमा करायचे आहे.

ही चूक दुरुस्त होईल; पण सशुल्क...

नाव नोंदणी अर्जातील माध्यम, शाखा, शाळा / महाविद्यालयाचे नाव व इतर दुरुस्ती करायची असेल तर विद्यार्थ्याला पुन्हा नावनोंदणी शुल्क द्यावे लागणार आहे. असे आहे वेळापत्रक- विद्यार्थ्यांची नावनोंदणी, ऑनलाइन शुल्क - ११ सप्टेंबरपर्यंत- अर्ज व इतर कागदपत्रे शाळेत जमा करणे - १३ सप्टेंबरपर्यंत - शाळांनी विद्यार्थ्यांची कागदपत्रे मंडळात देणे - दि.१५ सप्टेंबर 

पण, एवढा गॅप असावा लागतो

नववीनंतर लागलीच पुढील शैक्षणिक वर्षात दहावीसाठी १७ नंबरचा अर्ज भरता येत नाही. नववीनंतर गॅप असावी लागते. हे अर्ज भरलेल्यांनी शाळेत नियमित येण्याची गरज नसते, अशी माहिती नंदिनीबाई विद्यालयाच्या प्राचार्या चारुलता पाटील यांनी दिली. विद्यार्थी दरवर्षी शाळेतून १७ नंबरचा अर्ज भरतात. दहावी व बारावीची परीक्षा आधी दिली नसेल तर त्यांना १७ नंबरचा अर्ज भरता येतो. नववीनंतर किमान दोन वर्षांची गॅप असावी लागते, अशी माहिती श्री स्वामी समर्थ प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या (कुसुंबा) प्राचार्या प्रतीक्षा पाटील यांनी दिली.

टॅग्स :Jalgaonजळगाव