शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
5
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
7
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
8
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
9
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
10
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
11
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
12
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
13
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
14
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
15
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
16
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
17
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
18
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
19
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
20
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...

शाळेत न जाताही द्या दहावी-बारावीची परीक्षा !

By अमित महाबळ | Updated: August 23, 2023 19:58 IST

जळगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खासगीरीत्या १७ नंबरचा अर्ज ...

जळगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खासगीरीत्या १७ नंबरचा अर्ज भरून परीक्षा देता येते. त्यासाठी बारावीप्रमाणेच आता दहावीच्या खासगी विद्यार्थ्यांचेही अर्ज सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांमधून स्वीकारले जाणार आहेत. मार्च २०२४ परीक्षेपासून ही सुविधा लागू झाली आहे.

दहावीच्या परीक्षेला बाहेरून बसणाऱ्या विद्यार्थ्यांना संपर्क केंद्रामार्फत नोंदणी करावी लागत होती. आता ही पद्धत बंद करण्यात आली आहे. बारावीचे खासगी विद्यार्थी सर्व कनिष्ठ महाविद्यालयातून अर्ज भरतात, त्याच धर्तीवर दहावीचे खासगी विद्यार्थी नोंदणीचे अर्ज सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळेतून भरू शकणार आहेत. किमान शैक्षणिक पात्रता पाचवी उत्तीर्ण असून, अर्ज ऑनलाइन आहे.

यादीतून शाळा, कॉलेज निवडा

नाव नोंदणी करताना दहावी व बारावीच्या विद्यार्थ्याला त्याचा पत्ता व त्याने निवडलेले माध्यम यानुसार शाळांची यादी ऑनलाइन दिसेल. त्यामधील एका शाळेची निवड त्याने करायची आहे.

दिव्यांग असाल तर प्रमाणपत्र द्या

दिव्यांग विद्यार्थ्यांना खासगीरीत्या प्रविष्ट व्हायचे असेल तर त्यांनी दिव्यांगत्व प्रमाणपत्राची छायाप्रत प्रमाणित करून अर्जासोबत सादर करायची आहे. ही कागदपत्रे द्या..

शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत), नसल्यास द्वितीय पत्र व प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, पासपोर्ट आकारातील फोटो. ऑनलाइन अर्ज भरताना ही कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहेत. विद्यार्थ्याचा मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी द्यायचा आहे.

असा मिळवा अर्ज

अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रत विद्यार्थ्याला ई-मेलवर मिळेल. त्याची प्रिंटआऊट, शुल्क भरल्याची पावती, हमीपत्र दोन प्रतीत शाळा / महाविद्यालयात जमा करायचे आहे.

ही चूक दुरुस्त होईल; पण सशुल्क...

नाव नोंदणी अर्जातील माध्यम, शाखा, शाळा / महाविद्यालयाचे नाव व इतर दुरुस्ती करायची असेल तर विद्यार्थ्याला पुन्हा नावनोंदणी शुल्क द्यावे लागणार आहे. असे आहे वेळापत्रक- विद्यार्थ्यांची नावनोंदणी, ऑनलाइन शुल्क - ११ सप्टेंबरपर्यंत- अर्ज व इतर कागदपत्रे शाळेत जमा करणे - १३ सप्टेंबरपर्यंत - शाळांनी विद्यार्थ्यांची कागदपत्रे मंडळात देणे - दि.१५ सप्टेंबर 

पण, एवढा गॅप असावा लागतो

नववीनंतर लागलीच पुढील शैक्षणिक वर्षात दहावीसाठी १७ नंबरचा अर्ज भरता येत नाही. नववीनंतर गॅप असावी लागते. हे अर्ज भरलेल्यांनी शाळेत नियमित येण्याची गरज नसते, अशी माहिती नंदिनीबाई विद्यालयाच्या प्राचार्या चारुलता पाटील यांनी दिली. विद्यार्थी दरवर्षी शाळेतून १७ नंबरचा अर्ज भरतात. दहावी व बारावीची परीक्षा आधी दिली नसेल तर त्यांना १७ नंबरचा अर्ज भरता येतो. नववीनंतर किमान दोन वर्षांची गॅप असावी लागते, अशी माहिती श्री स्वामी समर्थ प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या (कुसुंबा) प्राचार्या प्रतीक्षा पाटील यांनी दिली.

टॅग्स :Jalgaonजळगाव