शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

डेंग्यूनंतर स्वाईन फ्लूचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 17:40 IST

जळगाव : जिल्हाभरात अद्यापही डेंग्यू नियंत्रणात आलेला नसताना आता वातावरणामुळे स्वाईन फ्लूचा धोका बळावण्याची चिन्हे निर्माण झाली आहे़ विषाणूजन्य ...

जळगाव : जिल्हाभरात अद्यापही डेंग्यू नियंत्रणात आलेला नसताना आता वातावरणामुळे स्वाईन फ्लूचा धोका बळावण्याची चिन्हे निर्माण झाली आहे़ विषाणूजन्य आजारांचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत़ दरम्यान, मे महिन्यानंतर जिल्हाभरात एकही स्वाईन फ्लूचा रूग्ण नसल्याचा दावा आरोग्य विभागातर्फे करण्यात आला आहे़सप्टेंबर, आॅक्टोबरचा हा काळ विषाणूसाठी पोषक असतो़ त्यातच यंदा पावसाने दिवाळीपर्यंत मुक्काम ठोकला होता़या पावसामुळे दमट, थंड, कधी कडक उन असे तिहेरी वातावरण अनुभवायला मिळत आहे़ या वातावरणात मध्यतंरी सतत पाऊस असल्याने उनच पडले नव्हते. त्यामुळे निर्माण झालेला ओलावा व थंडावा हे वातावरण आजार पसरविण्यासाठी धोकादायक असते़ त्यामुळे विषाणूंपासून होणाऱ्या आजारांचे रूग्ण वाढत असल्याचे चित्र आहे़ शहरातील खासगी रूग्णालये थंडी, ताप, खोकल्याच्या रूग्णांनी भरलेली आहेत़ स्वाईन फ्लू हा देखील संसर्गजन्य रोग असल्याने आताचे वातावरण त्याला अधिकच पोषक असल्याने हा आजारही बळावण्याची चिन्हे निर्माण झाली आहे़ विषाणूजन्य आजारांसाठी हे वातावरण पोषक असल्याने यासाठी आधीच काळजी म्हणून आरोग्य विभागाने दक्षता घेतली असून सुटीच्या दिवशीही अधिकारी कर्मचारी कार्यालयात असून सर्व दवाखाने सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ दिलीप पोटोडे यांनी दिली़ शिवाय कुठल्या भागात असे संशयित रूग्ण आढळल्यास तत्काळ उपायोजना राबवा, अशा सूचनाही दिल्याचे त्यांनी सांगितले़दरम्यान, सर्दी, ताप, खोकला व घसा यासारख्या आजारांनीही डोके वर काढले असून खासगी व सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांची प्रचंड गर्दी होत आहे. अवकाळी पावसामुळे डासांची उत्पत्ती होत असल्याने आजार वाढत आहेत.या वातावरणात विषाणुजन्य आजारांची लागण अधिक होते़ ओलाव्यामुळे डासांचे प्रमाण अधिक होत असते़ खोकल्याचे रूग्णही अधिक आहेत़ त्यामुळे मच्छरांपासून सावधानता बाळगावी, तेलगट खाणे टाळावे, लक्षणे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.- डॉ़ परिक्षित बाविस्कर

टॅग्स :Medicalवैद्यकीयJalgaonजळगाव