शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळात पावसाळ्यातही आठ-दहा दिवसांनी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 19:39 IST

शहराला सात दिवसाआड करण्यात येणारा पाणीपुरवठा आठ ते दहा दिवसांवर लोटला जातो. त्यामुळे शहरवासीयांना वारंवार पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देपाणीपुरवठा करणाऱ्या योजनेला होताहेत ६२ वर्षेअमृत योजनेची पाईपलाईन २१३ किलोमीटर

उत्तम काळेभुसावळ : शहराला पाणीपुरवठा करणाºया पाणीपुरवठा योजनेला तब्बल ६२ वर्षे झालेली आहेत. त्यामुळे ही पाईपलाईन जीर्ण झाली आहे. पाईपलाईन वारंवार फुटत असल्यामुळे त्याचप्रमाणे तापी नदीला पूर आल्यानंतर पाणी शुद्ध करण्यास अडचणी येत असल्यामुळे शहराला सात दिवसाआड करण्यात येणारा पाणीपुरवठा आठ ते दहा दिवसांवर लोटला जातो. त्यामुळे शहरवासीयांना वारंवार पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.दरम्यान, अमृत योजनेचे काम सुरू असून हे कामही ६५ टक्के झाले आहे. त्यामुळे शहरवासीयांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न लवकरच सुटण्याची शक्यता आहे.भुसावळ शहरात तापी नदी पाणीपुरवठ्यासाठी वरदान आहे. मात्र शहराला पाणीपुरवठ्यासाठी असलेली योजना ही १९५८ आणि १९८४ अशी दोन राबविण्यात आली आहे.वाढीव पाईपलाईनशहरांना त्यावेळी व त्यानंतर वाढीव अशी १५० किलोमीटर पाईपलाईन टाकण्यात आली आहे. तब्बल ६२ वर्षांपूर्वी पाईपलाईन टाकण्यात आली. त्यावेळी तीन इंच ते पाचशे एम.एम.पर्यंत पाईपलाईन टाकण्यात आली आहे, तर त्यावेळी यावल रोडवरच जल शुद्धीकरण केंद्रही बांधण्यात आले आहे.अद्यापही सिमेंटचे पाईप कायमशहरात त्याकाळी सिमेंटच्या पाईपांचा वापर करण्यात आला. बºयाच भागातून ते पाईप काढून त्या ठिकाणी पीव्हीसी पाइपचा वापर करण्यात आला आहे. मात्र अद्यापही बºयाच ठिकाणी सिमेंटचे पाईप कायम असल्याचेही सांगण्यात आले.अमृत योजनेची पाईपलाईन २१३ किलोमीटरशहराला शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी गेल्या दीड ते दोन वर्षापासून अमृत योजनेचे काम सुरू आहे. या योजनेचे काम जवळपास ६५ टक्के झाले आहे. या योजनेत तब्बल २१३ किलोमीटर पाइपलाइन टाकण्यात आले आहे. तर अजून काही परिसरांमध्ये पाईप लाईन वाढवण्यासाठी मंजुरी मागण्यात आली आहे. त्यामुळे तब्बल तीनशे किलोमीटरपर्यंत पाईपलाईन राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. या योजनेत नवीन जलशुद्धीकरण केंद्र असून या केंद्राची क्षमता ४८ एम.एल.डी. आहे. या फिल्टर प्लांटमध्ये तापी नदीवरून पाणी आणण्यासाठी वेगळी पाईपलाईन टाकण्यात येत आहे.या जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता २२ एम.एल.डी. आहे. मात्र सध्या या जलशुद्धीकरण केंद्रातून सतरा ते अठरा एम.एल.डी. पाणी शुद्ध होत आहे. त्याचप्रमाणे तापी नदीला पूर आल्यानंतर मात्र ३० ते ४० टक्के पाणी वाया जाते. त्यामुळे सात दिवसाआड करण्यात येणारा पाणीपुरवठा आठ ते दहा दिवसांवर जातो, तर जामनेर रोड परिसरात पाणीटंचाईची परिस्थिती मोठ्या प्रमाणात उद्भवत असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :WaterपाणीBhusawalभुसावळ