शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
4
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
5
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
6
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
7
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
8
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
9
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
10
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
11
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
12
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
13
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
14
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
15
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
16
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
17
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
18
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
19
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
20
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...

भुसावळात पावसाळ्यातही आठ-दहा दिवसांनी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 19:39 IST

शहराला सात दिवसाआड करण्यात येणारा पाणीपुरवठा आठ ते दहा दिवसांवर लोटला जातो. त्यामुळे शहरवासीयांना वारंवार पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देपाणीपुरवठा करणाऱ्या योजनेला होताहेत ६२ वर्षेअमृत योजनेची पाईपलाईन २१३ किलोमीटर

उत्तम काळेभुसावळ : शहराला पाणीपुरवठा करणाºया पाणीपुरवठा योजनेला तब्बल ६२ वर्षे झालेली आहेत. त्यामुळे ही पाईपलाईन जीर्ण झाली आहे. पाईपलाईन वारंवार फुटत असल्यामुळे त्याचप्रमाणे तापी नदीला पूर आल्यानंतर पाणी शुद्ध करण्यास अडचणी येत असल्यामुळे शहराला सात दिवसाआड करण्यात येणारा पाणीपुरवठा आठ ते दहा दिवसांवर लोटला जातो. त्यामुळे शहरवासीयांना वारंवार पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.दरम्यान, अमृत योजनेचे काम सुरू असून हे कामही ६५ टक्के झाले आहे. त्यामुळे शहरवासीयांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न लवकरच सुटण्याची शक्यता आहे.भुसावळ शहरात तापी नदी पाणीपुरवठ्यासाठी वरदान आहे. मात्र शहराला पाणीपुरवठ्यासाठी असलेली योजना ही १९५८ आणि १९८४ अशी दोन राबविण्यात आली आहे.वाढीव पाईपलाईनशहरांना त्यावेळी व त्यानंतर वाढीव अशी १५० किलोमीटर पाईपलाईन टाकण्यात आली आहे. तब्बल ६२ वर्षांपूर्वी पाईपलाईन टाकण्यात आली. त्यावेळी तीन इंच ते पाचशे एम.एम.पर्यंत पाईपलाईन टाकण्यात आली आहे, तर त्यावेळी यावल रोडवरच जल शुद्धीकरण केंद्रही बांधण्यात आले आहे.अद्यापही सिमेंटचे पाईप कायमशहरात त्याकाळी सिमेंटच्या पाईपांचा वापर करण्यात आला. बºयाच भागातून ते पाईप काढून त्या ठिकाणी पीव्हीसी पाइपचा वापर करण्यात आला आहे. मात्र अद्यापही बºयाच ठिकाणी सिमेंटचे पाईप कायम असल्याचेही सांगण्यात आले.अमृत योजनेची पाईपलाईन २१३ किलोमीटरशहराला शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी गेल्या दीड ते दोन वर्षापासून अमृत योजनेचे काम सुरू आहे. या योजनेचे काम जवळपास ६५ टक्के झाले आहे. या योजनेत तब्बल २१३ किलोमीटर पाइपलाइन टाकण्यात आले आहे. तर अजून काही परिसरांमध्ये पाईप लाईन वाढवण्यासाठी मंजुरी मागण्यात आली आहे. त्यामुळे तब्बल तीनशे किलोमीटरपर्यंत पाईपलाईन राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. या योजनेत नवीन जलशुद्धीकरण केंद्र असून या केंद्राची क्षमता ४८ एम.एल.डी. आहे. या फिल्टर प्लांटमध्ये तापी नदीवरून पाणी आणण्यासाठी वेगळी पाईपलाईन टाकण्यात येत आहे.या जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता २२ एम.एल.डी. आहे. मात्र सध्या या जलशुद्धीकरण केंद्रातून सतरा ते अठरा एम.एल.डी. पाणी शुद्ध होत आहे. त्याचप्रमाणे तापी नदीला पूर आल्यानंतर मात्र ३० ते ४० टक्के पाणी वाया जाते. त्यामुळे सात दिवसाआड करण्यात येणारा पाणीपुरवठा आठ ते दहा दिवसांवर जातो, तर जामनेर रोड परिसरात पाणीटंचाईची परिस्थिती मोठ्या प्रमाणात उद्भवत असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :WaterपाणीBhusawalभुसावळ