शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
3
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
4
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
5
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
6
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
7
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
8
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
9
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
10
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
11
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
12
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
13
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
14
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
15
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
16
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
17
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
18
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
19
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
20
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'

भुसावळात पावसाळ्यातही आठ-दहा दिवसांनी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 19:39 IST

शहराला सात दिवसाआड करण्यात येणारा पाणीपुरवठा आठ ते दहा दिवसांवर लोटला जातो. त्यामुळे शहरवासीयांना वारंवार पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देपाणीपुरवठा करणाऱ्या योजनेला होताहेत ६२ वर्षेअमृत योजनेची पाईपलाईन २१३ किलोमीटर

उत्तम काळेभुसावळ : शहराला पाणीपुरवठा करणाºया पाणीपुरवठा योजनेला तब्बल ६२ वर्षे झालेली आहेत. त्यामुळे ही पाईपलाईन जीर्ण झाली आहे. पाईपलाईन वारंवार फुटत असल्यामुळे त्याचप्रमाणे तापी नदीला पूर आल्यानंतर पाणी शुद्ध करण्यास अडचणी येत असल्यामुळे शहराला सात दिवसाआड करण्यात येणारा पाणीपुरवठा आठ ते दहा दिवसांवर लोटला जातो. त्यामुळे शहरवासीयांना वारंवार पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.दरम्यान, अमृत योजनेचे काम सुरू असून हे कामही ६५ टक्के झाले आहे. त्यामुळे शहरवासीयांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न लवकरच सुटण्याची शक्यता आहे.भुसावळ शहरात तापी नदी पाणीपुरवठ्यासाठी वरदान आहे. मात्र शहराला पाणीपुरवठ्यासाठी असलेली योजना ही १९५८ आणि १९८४ अशी दोन राबविण्यात आली आहे.वाढीव पाईपलाईनशहरांना त्यावेळी व त्यानंतर वाढीव अशी १५० किलोमीटर पाईपलाईन टाकण्यात आली आहे. तब्बल ६२ वर्षांपूर्वी पाईपलाईन टाकण्यात आली. त्यावेळी तीन इंच ते पाचशे एम.एम.पर्यंत पाईपलाईन टाकण्यात आली आहे, तर त्यावेळी यावल रोडवरच जल शुद्धीकरण केंद्रही बांधण्यात आले आहे.अद्यापही सिमेंटचे पाईप कायमशहरात त्याकाळी सिमेंटच्या पाईपांचा वापर करण्यात आला. बºयाच भागातून ते पाईप काढून त्या ठिकाणी पीव्हीसी पाइपचा वापर करण्यात आला आहे. मात्र अद्यापही बºयाच ठिकाणी सिमेंटचे पाईप कायम असल्याचेही सांगण्यात आले.अमृत योजनेची पाईपलाईन २१३ किलोमीटरशहराला शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी गेल्या दीड ते दोन वर्षापासून अमृत योजनेचे काम सुरू आहे. या योजनेचे काम जवळपास ६५ टक्के झाले आहे. या योजनेत तब्बल २१३ किलोमीटर पाइपलाइन टाकण्यात आले आहे. तर अजून काही परिसरांमध्ये पाईप लाईन वाढवण्यासाठी मंजुरी मागण्यात आली आहे. त्यामुळे तब्बल तीनशे किलोमीटरपर्यंत पाईपलाईन राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. या योजनेत नवीन जलशुद्धीकरण केंद्र असून या केंद्राची क्षमता ४८ एम.एल.डी. आहे. या फिल्टर प्लांटमध्ये तापी नदीवरून पाणी आणण्यासाठी वेगळी पाईपलाईन टाकण्यात येत आहे.या जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता २२ एम.एल.डी. आहे. मात्र सध्या या जलशुद्धीकरण केंद्रातून सतरा ते अठरा एम.एल.डी. पाणी शुद्ध होत आहे. त्याचप्रमाणे तापी नदीला पूर आल्यानंतर मात्र ३० ते ४० टक्के पाणी वाया जाते. त्यामुळे सात दिवसाआड करण्यात येणारा पाणीपुरवठा आठ ते दहा दिवसांवर जातो, तर जामनेर रोड परिसरात पाणीटंचाईची परिस्थिती मोठ्या प्रमाणात उद्भवत असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :WaterपाणीBhusawalभुसावळ