शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
3
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
4
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
5
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
6
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
7
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
8
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
9
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
11
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
12
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
13
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
14
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
15
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
16
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
18
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
19
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
20
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका

असे ‘मामा’ यापुढे पुन्हा होणे नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 12:25 AM

भय्यूजी महाराजांच्या ‘भाची’ला आठवणींचा हुंदका : महाराज खान्देशी खाद्य पदार्थांचे चाहते

ठळक मुद्देभय्यूजी महाराज हे चाळीसगावी आल्यानंतर श्यामल जाधव यांच्याकडे जेवणात खान्देशी मेनू असायचा. थालीपिठ, मिरचीचा ठेचा, वांग्याची भाजी, पिठलं आणि भाकरी असे खान्देशी खाद्यपदार्थ ते आवडीने खात.श्याम जाधव यांनी ‘सूर्र्याेदय’ अध्यात्मिक परिवारातर्फे चाळीसगाव तालुक्यात वेगवेगळे उपक्रम राबविले. अमळनेर येथे महाराजांनी आयोजित केलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात चाळीसगाव तालुक्यातील ५१ जोडप्यांचे विवाह अवघ्या सव्वा रुपयात महाराजांच्या ट्रस्टमार्फत झाले.३ जून रोजी श्यामल जाधव यांच्याशी भय्यूजी महाराज भ्रमणध्वनीवरुन बोलले. हा मामा आणि भाची यांच्यातला शेवटचा मोबाईल संवाद ठरला. ‘बरेच दिवस झाले. चाळीसगावला फेरी झाली नाही. श्यामल मी येतोय, लवकरच तुुझ्याकडे चाळीसगावला,’ असं सांगताना श्यामल जाधव यांना गहिवरुन आ

जिजाबराव वाघ ।चाळीसगाव (जि.जळगाव) : ‘श्यामल मी औरंगाबादला चाललोय. वाटेत तुझ्या घरी जेवण घेईल. छान पिठलं आणि भाकरी बनव... ‘मामा भय्यूजी महाराजांचा फोनवरचा हा निरोप ऐकला की, सगळं घर आनंदून जायचं. आता पुन्हा असा फोन येणार नाही. भय्यूजी महाराजांच्या आठवणींचा बांध फुटला अन् श्यामल जाधव यांना हुंदका अनावर झाला. भय्यूजी महाराज आणि श्यामल जाधव यांचे मामा - भाची असं नातं. महाराजांच्या मृत्यूची बातमी ऐकून संपूर्ण जाधव कुटूंबिय सुन्न झाले आहे.चाळीसगावच्या हनुमानवाडीत राहणाऱ्या श्याम आणि श्यामल जाधव यांच्या कुटुंबाशी भय्यूजी महाराजांचे गेल्या अनेक वर्षापासून ऋणानुंबध आहेत.२५ ते ३० वेळा भय्यूजी महाराज चाळीसगावी आपल्या भाचीला भेटण्यासाठी येऊन गेले आहेत. विशेष म्हणजे मुक्काम करुन महाराजांनी येथे गप्पांच्या मैफीलीही रंगवल्या आहेत. चाळीसगावात त्यांच्या ‘सूर्योदय’ परिवाराचे ३०हून अधिक साधक आहेत. त्यांच्यामार्फत परिसरात अध्यात्मिक व सामाजिक उपक्रम सुरू असतात.सांगोल्यात झाली नाती घट्टभय्यूजी महाराज यांची एक बहिण विजयालक्ष्मी साळुंखे ह्या सांगोल्यात (जि.सोलापूर) राहतात. विजयालक्ष्मी ह्या श्यामल जाधव यांच्या सख्ख्या काकू. बालपणापणासूनच भय्यूजी महाराज सांगोल्यात बहिणीकडे येतं. श्यामल यांचा विवाह चाळीसगाव येथील श्याम जाधव यांच्याशी झाल्यानंतर भय्यूजी महाराज आवर्जून येथे यायचे. मराठवाड्यात जाताना चाळीसगाव येथे भाचीच्या हातचे जेवण घेतल्याशिवाय महाराजांचा पुढचा प्रवास सुरू होत नव्हता.भय्यूजी महाराज यांच्याशी आमचे नातेसंबंध असले तरी ते आमच्या परिवाराचे अध्यात्मिक गुरुही होते. त्यांच्या जाण्याने आम्हाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या आठवणी तेवढ्या उरल्या आहेत- श्यामल व श्याम जाधव, चाळीसगाव. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपChalisgaonचाळीसगाव