शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
3
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
4
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
5
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
6
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
7
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
8
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
9
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
10
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
11
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
12
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
13
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
14
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
15
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
16
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
17
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
18
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
19
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
20
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

समाजाने ठरवलं अन् कुटुंब पुन्हा उभं राहिलं! दिव्यांग मुलांना मिळाला आधार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 6:29 AM

कोरोनामुळे रोजगार बुडाल्याने पातोंडा येथील गोकुळ भिल आणि कदमबाई भिल यांच्यासमोर संकटांचे डोंगर निर्माण झाले होते. एक वेळ अशी आली की, घरातील तीनही मुले भुकेने व्याकुळ होत. मात्र घरात काहीच नसल्याने चार दिवस चूल पेटली नाही.

- जिजाबराव वाघलोकमत न्यूज नेटवर्कचाळीसगाव ( जळगाव) : समाजाने दातृत्वाची ओंजळ धरली तर कोरोना महामारीतही कुटुंब पुन्हा उभे राहू शकते, याचा प्रत्यय चाळीसगावपासून अवघ्या आठ किमी अंतरावर असणाऱ्या पातोंडा या गावातील कुटुंबाला आला. अनेकांच्या दातृत्वामुळे येथील गोकुळ भिल व कदमबाई भिल या दांपत्यासह तीन दिव्यांग मुलांचेही पुनर्वसन करण्यात यश आले आहे. पिचलेल्या या कुटुंबाला हक्काचा निवारा तर मिळालाच, सोबत रोजगारही उपलब्ध झाला आहे. सोमवारी भिल दांपत्याला दहा शेळ्या सुपुर्द करण्यात आल्या.

 कोरोनामुळे रोजगार बुडाल्याने पातोंडा येथील गोकुळ भिल आणि कदमबाई भिल यांच्यासमोर संकटांचे डोंगर निर्माण झाले होते. एक वेळ अशी आली की, घरातील तीनही मुले भुकेने व्याकुळ होत. मात्र घरात काहीच नसल्याने चार दिवस चूल पेटली नाही. ही स्थिती कळताच या कुटुंबासाठी स्वयंदीप दिव्यांग भगिनी मंडळाच्या प्रमुख मीनाक्षी निकम यांनी सोशल माध्यमावर मदतीचे आवाहन केले. याला प्रतिसाद देत बीडीओ नंदकुमार वाळेकर यांनी भिल कुटुंबाचे पुनर्वसन करत त्यांना दत्तक घेतले.  वाळेकर यांनी या कुटुंबाला शासनाच्या मदतीची गरज पडू नये असा प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी समाजही पुढे आला. सैनिकांच्या ग्रुपने भिल कुटुंबाचे पडके घर उभारून दिले, तर दीपक निकम या वीज कर्मचाऱ्याने थकीत वीजबिल भरून घरात विजेचा प्रकाश पसरवला. काहींनी धान्य व किराणा भरून दिला. वर्षभर पुरेल इतके किराणा सामानही मिळाले आहे.

‘लोकमत’चाही खारीचा वाटागोकुळ भिल यांच्या दयनीय परिस्थितीचा आढावा ‘लोकमत’नेही मांडला होता. त्यामुळे समाजमनाच्या संवेदना पाझरल्या. कुटुंबाच्या पुनर्वसनात ‘लोकमत’चाही खारीचा वाटा आहे, अशी प्रतिक्रिया नंदकुमार वाळेकर व मीनाक्षी निकम यांनी व्यक्त केली.मी माणसांच्या रूपात आज देव पाहत आहे. कोरोनात रोजगार बुडाल्यानंतर निराश झालो होतो. तीन दिव्यांग मुलांसह पत्नीचे पोट कसे भरायचे, हा प्रश्न डोंगराएवढा झाला होता. घर पडून गेले होते. वीज नव्हती. आज देवरूपी माणसांनी आम्हाला नव्याने जगण्याची ऊर्जा दिली आहे.    - गोकुळ भील, पातोंडा, ता. चाळीसगाव.