शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

सोशल मीडिया सेल महिनाभरात जळगावात कार्यान्वित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 12:15 IST

अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांची माहिती

ठळक मुद्देसंवेदनशील घटनांवर पोलिसांचे बारीक लक्षगुन्हेगारांचे दहा वर्षांचे रेकॉर्ड तपासण्याचे काम सुरू

जळगाव : सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महिनाभरात सोशल मीडिया सेल कार्यान्वित केला जाणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी ‘लोकमत’ भेटीत दिली.अपर पोलीस अधीक्षकपदी जळगावात रुजू झाल्यानंतर पहिल्यांदाच मतानी यांनी गुरुवारी ‘लोकमत’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले. घरफोडी, चोºया, सायबर गुन्हे यासह नालासोपारा प्रकरणात साकळी येथील दोघांना झालेली अटक याबाबत तसेच पोलीस दलातर्फे राबविण्यात येणाºया विविध उपक्रमांची माहिती मतानी यांनी यावेळी दिली. त्यांच्याशी झालेला संवाद असा...जळगाव येथे नुकतेच सायबर पोलीस स्टेशन सुरू झालेले आहे. त्यासाठी स्वतंत्र अधिकारी व उच्चशिक्षित तथा संगणकाचे ज्ञान अवगत असलेल्या १६ कर्मचाºयांची मुलाखत घेऊन नियुक्ती करण्यात आली आहे. या पोलीस ठाण्यात आतापर्यंत दोन गुन्हे दाखल असून त्याचे कार्यक्षेत्र संपूर्ण जिल्हा आहे. यामुळे तांत्रिक पुरावे उपलब्ध होत असल्याने तपासाला गती मिळणार आहे. गुन्हे सिध्दीचे प्रमाणही वाढेल, असा विश्वास लोहित मतानी यांनी व्यक्त केला.अनुभवी व नव्या कर्मचाºयांचा मेळ घालून गुन्हे उघडकीस आणणारघरफोडी, चोºया या नियमित गुन्ह्यांच्या व्यतिरिक्त नवीन पद्धतीचे गुन्हे घडत आहेत. तसेच सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सहायक फौजदार, हवालदार यांचे अनुभव कौशल्य व नवीन भरती झालेले उच्चशिक्षित कर्मचारी यांच्यात मेळ घालून गुन्हे उघडकीस आणण्यासाठी नियोजन केलेले आहे. सायबर पोलीस ठाण्यात आवश्यक ती यंत्रसामग्री उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे आता यापुढे जिल्ह्यातील सर्व सायबरशी निगडित गुन्हे या पोलीस ठाण्यातच दाखल केले जाणार आहेत.गुन्हेगारांचे दहा वर्षांचे रेकॉर्ड तपासण्याचे काम सुरूजिल्ह्यात दुचाकी चोरी व घरफोडी यांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. या घटनांना रोखण्यासाठी पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांचे दहा वर्षांचे रेकॉर्ड तपासले जात आहे. या गुन्हेगारांना हेरल्यानंतर नवीन गुन्हेगारांवर आपोआप नियंत्रण मिळविणे शक्य होईल. या गुन्हेगारांच्या हालचाली टिपणे, रात्रीची गस्त वाढविली जाणार आहे. आरएएफआयडी या यंत्राच्या माध्यमातून पोलिसांची गस्त तपासली जाणार आहे. या यंत्रामुळे कर्मचाºयांवर अंकुश ठेवणे शक्य होते.ंलोकसंख्येच्या तुलनेत मनुष्यबळाची कमतरतालोकसंख्येच्या आधारावर पोलीस ठाण्यांना पदे मंजूर केली जातात. सध्याचे मनुष्यबळ १९९० मध्ये असलेल्या लोकसंख्येच्या आधारावर देण्यात आले आहे. रावेर, फैजपूर व वरणगाव येथे त्या तुलनेत कर्मचाºयांची संख्या अपूर्ण आहे. त्यासाठी संबंधित पोलीस निरीक्षकांकडून अहवाल मागविण्यात आला आहे. साकळी येथील दोन तरुणांना एटीएसने अटक केल्यानंतर जिल्ह्यात अशा घटनांमध्ये कोणाचा सहभाग आहे का? अशा व्यक्तींच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. अशा घटनांमधील संशयित एका दिवसात पुढे येत नाही. वर्षानुवर्षे त्यांचे कार्य सुरू असते, असेही मतानी म्हणाले.

टॅग्स :PoliceपोलिसJalgaonजळगाव