शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

५६ लाखांच्या सिमेंट बंधाऱ्याला सहा महिन्यातच लागली गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 8:51 PM

निकृष्ट दर्जाचे काम : चहार्डी येथील साठवण बंधाऱ्याची स्थिती, त्वरित दुरुस्तीची गरज

चोपडा : तालुक्यातील चहार्डी येथील चंपावती नदीवर जलसंधारण व मृदा संधारण विभागातर्फे ५६ लाख रुपये खर्च करून बंधारा बांधण्यात आला. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे सहा महिन्यांपूर्वी बांधलेल्या या बंधाऱ्याला भिंतींमधूनच गळती लागली आहे.जलसिंचनासह जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध होईल, या उद्देशाने हा बंधारा बांधला होता. मात्र, निकृष्ट कामाने त्याचा उपयोग होत नसल्याचे दिसते. नदी पुनरुज्जीवन अंतर्गत तालुक्यात चहार्डी येथील चंपावती (चहार्डी-अकुलखेडा २) नदीवर सिमेंट साठवण बंधारा गेल्या सहा महिन्यांपूर्वी बांधण्यात आला. बांधकामासाठी तापी नदीची वाळू न वापरता याच नदीतील माती मिश्रीत वाळू वापरण्यात आल्याने या बंधाºयाला गळती लागली आहे. बंधाºयासाठी खर्च झालेले ५६.१७ लाख रुपये पाण्यात जातात की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे.याच नदीवर असाच आणि एवढ्याच खर्चाचा दुसरा बंधाराही अकुलखेडा शिवारात बांधण्यात आला आहे. बांधकामावेळी तापी नदीवरील वाळू लिलाव झालेला नव्हता. त्यामुळे कंत्राटदाराने याच नदीतील माती मिश्रीत वाळू वापरली. यामुळेच बंधाºयाला गळती लागली, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.या बंधाºयात यावर्षी पाऊस चांगला झाल्याने व अकुलखेडा येथे हतनूर कालव्याचे आऊटलेट असल्याने हतनूर धरणातून थेट कालव्याद्वारे या नदीत पाणी सोडले जाते. म्हणून पाणी चांगले अडविले गेले असते तर सिंचन होऊन भूगर्भातील पातळी वाढली असती. मात्र आता अडविलेले पाणी गळतीतून वाहून जात असल्याचे दिसत आहे.गेल्या वर्षापर्यंत चहार्डी आणि परिसरातील गावांना भीषण पाणी टंचाई सहन करावी लागली होती. टंचाई निवारण्यासाठी या दोन्ही बंधाऱ्यांमधील अडविलेले पाणी उपयोगात आले असते. त्यामुळे हा बंधारा दुरुस्त होणे गरजेचे आहे.