शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

"३५ वर्ष वडापाव खावून शिवसेनेचे काम केले आणि जनतेमधून निवडून न येणारे आम्हाला त्यागाची भाषा शिकवता"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 19:38 IST

गुलाबराव पाटीलांची राऊत, सावंतावर टीकास्त्र ; आमचे बंड शिवसेना फोडण्यासाठी नाही तर शिवसेना वाचविण्यासाठी - पाटील

अजय पाटील

जळगाव - कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मनात घेवून, शालेय जीवनापासून शिवसेनेसाठी काम केले आहे. ३५ वर्ष वडापाव खावून मुंबईला बाळासाहेब ठाकरे यांचे भाषणं ऐकली, संघटनेचे काम केले. तेव्हा कुठे मंत्रीपद मिळाली. आज जे आमच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत,असे संजय राऊत जनतेमधून कधिही निवडून आलेले नाहीत. ज्यांची जनतेमधून निवडून येण्याची हिंमत यांची होत नाही, ते आम्हाला आज त्यागाची भाषा शिकवत आहेत, अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारत सेनेचे ३९ आमदार आपल्या बाजूने खेचले आहेत. त्यात शिवसनेचे निष्ठावंत नेते व खान्देशची मुलुखमैदान तोफ समजले जाणाऱ्या गुलाबराव पाटील यांचाही समावेश आहे. गुलाबराव पाटील यांनीही शिवसेनेविरोधात बंड पुकारल्याने त्यांच्यावर शिवसेनेच्या नेत्यांकडून टीका केली जात आहे. तसेच त्यांच्या निष्ठेवर देखील प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. या सर्व आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्यात पहिल्यांदाच गुलाबराव पाटील यांनी आपली भूमिका ‘लोकमत’व्दारे मांडली आहे. या सर्व घडामोडींवर व बंडाच्या कारणांबाबत गुलाबराव पाटील  ‘लोकमत’कडे व्यक्त झाले आहेत.

४० आमदार सोडून गेले, तरी शरद पवारांना सोडायला तयार नाही

शिवसेनेतून एकटा गुलाबराव पाटील फुटला असता तर मान्य केले असते की स्वार्थासाठी पक्ष सोडला. मात्र, या बंडात एकटा गुलाबराव पाटील नसून, शिवसेनेचे ४० आमदार आहेत. त्यापैकी अनेक आमदार गेल्या ४० वर्षांपासून शिवसेनेचे काम करत आहेत. ४० आमदारांवर शिवसेना सोडण्याची वेळ का आली ? याचा विचार पक्ष नेतृत्वाकडून होणे गरजेचे असताना, शिवसेनेचे प्रवक्ते या आमदारांवर खालच्या भाषेत टीका करत आहेत. आमची व सर्व आमदारांची मागणी एकच आहे. मविआतून बाहेर निघा, मात्र पक्षप्रमुख ४० आमदारांना सोडू शकतात, वर्षा बंगला सोडला, शिवसेना फुटू द्यायला तयार आहेत. मात्र, शरद पवारांना सोडायला तयार नाहीत, हे शिवसेनेचे दुर्देव असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

२ महिन्यांपूर्वीच नाराजीची मुख्यमंत्र्यांना दिली होती कल्पनाशिवसेनेतील मंत्र्यांची कामे होतात. मात्र, शिवसेनेच्या आमदारांची छोटी-छोटी कामे देखील होत नाहीत. यामुळे आमदार नाराज असल्याची माहिती पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली होती. मात्र, पक्ष प्रमुखांनी या माहितीकडे दुर्लक्ष केले. जर पक्ष प्रमुख राज्यात फिरू शकत नाहीत. तर आदित्य ठाकरे यांना राज्यात फिरून संघटनेचे मेळावे घ्यावेत असा ही सल्ला दिला. मात्र, आदित्य ठाकरेंनी देखील याकडे दुर्लक्ष केले. ८ महिन्यांपुर्वी संजय राऊत यांनाही आमदारांच्या नाराजीबाबत कल्पणा दिली. मात्र, तेव्हाही लक्ष दिले गेले नसल्यानेच आज ही वेळ शिवसेनेवर आली असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

मला विचारूनच गुलाबराव वाघ सेनेच्या मेळाव्याला गेलेसहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी केलेल्या टीकेबद्दल विचारले असता, गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, सोमवारी शिवसेनेच्या मेळाव्यात जाण्याबाबत गुलाबराव वाघ यांनी मला फोन केला. तसेच मी मेळाव्यात जात आहे, याबाबत त्यांनी सांगितले. गुलाबराव वाघ हे भावासारखे असून, त्यांनी आतापर्यंत मला मदतच केली आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या टीकेला मी उत्तर देऊ शकत नसल्याचे सांगितले.

संजय राऊतांना योग्य वेळी चूना लावूसंजय राऊत यांना माहिती नाही, पान टपरीवाल्याला चांगला चूना देखील लावता येतो. संजय राऊतांना योग्य वेळी चूना लावण्याचेही काम करू असा इशारा गुलाबराव पाटील यांनी बुधवारी गुवाहाटी मध्ये उपस्थित आमदारांच्या बैठकीत दिला आहे. आमची स्टोरी  राऊतांना सांगितली तर १९९२ च्या दंगलीत आम्ही तीघं भाऊ आणि आमचा बाप जेल मध्ये होतो. त्यावेळी संजय राऊत कुठे होते ते माहिती नाही..? राऊतांना कलम ५६ काय असते, ३०२ काय असते हे माहिती नाही. दंगलीच्या वेळेत पायी चालण काय असते , तडीपार काय असते  हे त्यांना माहिती नाही, आणि आम्हाला त्यागाच्या गोष्टी शिकवता आहेत असा टोला या बैठकीत गुलाबराव पाटील यांनी लगावला.काय म्हणाले गुलाबराव पाटील

१. आमचे बंड शिवसेना वाचविण्यासाठीच आणि आम्ही शेवटपर्यंत शिवसेनेतच

२. आमची निष्ठा ‘ठाकरे’ आडनावाशी सदैव कायम राहिल, मातोश्री आमच्यासाठी देव्हाऱ्यासारखेच राहिल.

३. शिवसेनेने आमच्या नक्कीच उपकार केले हे आम्ही मान्य करुच, मात्र आम्ही केलेल्या संघर्षाचे काहीच मोल नाही ..?

४. जिल्ह्यातील १५०० पैकी १ हजार गावांमध्ये शिवसेनेच्या शाखा सुरु केल्या, त्याचा विसर आम्हाला गद्दार ठरविले जात आहे.

५. आम्ही शिवसेनेचे काम केले, संघर्ष केला. म्हणूनच तर आम्हाला पदं मिळाली.

६. घरात तुळशीपत्र ठेवून, बाहेर शिवसेनेचे काम केले. अनेकवेळा तुरूंगात गेलो,आमच्यावर अजूनही असंख्य केसेस आहेत

टॅग्स :Gulabrao Patilगुलाबराव पाटीलShiv SenaशिवसेनाMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ