शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते...
2
"व्ही.के.सिंग याने कशी अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केली, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
3
धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार...
4
पश्चिम बंगालच्या निवडणुकीआधी वेगळीच खेळी; दारूच्या दुकानांबद्दल झाला मोठा निर्णय
5
महिला आरक्षण: सुप्रिया सुळेंनी CM फडणवीसांचे आव्हान स्वीकारले; म्हणाल्या, “वेळ-जागा सांगा”
6
गुरुपुष्यामृत योग २०२६: केवळ सोने खरेदीच नाही, तर आयुष्याला सोन्याची झळाळी देणारा 'गुरुपुष्य' योग!
7
नाशिक TCS प्रकरण: "लग्नानंतर रात्री कशात व्यस्त असतेस?" चौथ्या पीडितेचा थरकाप उडवणारा जबाब
8
गाडी खरेदी करताना शोरूममधूनच इन्शुरन्स घेणे बंधनकारक आहे का? काय आहे नियम?
9
जपानमध्ये ७.४ तीव्रतेचा भीषण भूकंप! उत्तर किनारपट्टीला 'सुनामी'चा तडाखा बसण्याची शक्यता; ३ मीटर उंच लाटांचा इशारा
10
प्रार्थना आणि अश्रू..., हवेत ४ तास मृत्यूशी सामना! हैदराबादहून हुबळीला जाणाऱ्या Fly91 मध्ये तांत्रिक बिघाड, सुदैवाने मोठा अनर्थ टळला!
11
एअरटेल ग्राहकांना महागाईचा शॉक! ८४ दिवसांचा प्लॅन महागला, ७९९ चा प्लॅनही हटवला; आता रिचार्जसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे
12
Bank Loan Rejection Reasons: पगार भक्कम असूनही बँक कर्ज नाकारतेय? 'या' ४ चुका ठरू शकतात कारणीभूत!
13
Sade Sati: साडेसातीचा विळखा की परिवर्तनाची संधी? मेष, कुंभ आणि मीन राशींसाठी आगामी काळ कसा असेल?
14
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
15
शेवटची इच्छा पूर्ण! 'स्वरस्वामिनी' आशा भोसले यांच्या अस्थींचे पवित्र गंगेत विसर्जन
16
इराण चर्चेसाठी पाकिस्तानात जाणार की नाही? इब्राहीम अजीजी म्हणाले, "प्रत्येक अट स्वीकारली जाणार नाही"
17
IPL 2026: रोहित शर्मा सलग दुसऱ्या सामन्यालाही मुकणार? GT vs MI मॅचआधी आली महत्त्वाची अपडेट
18
Latest Marathi News LIVE Updates: खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागण्या काय?
19
पश्चिम बंगालमध्ये ७ लाख नवीन मतदारांची भर; आगामी निवडणुकीत राजकीय गणिते बदलणार?
20
अमेरिकेचे सैन्य, इराणचे महाकाय जहाज; होर्मुझ सामुद्रधुनी सहा तास संघर्ष आणि घेतले ताब्यात; व्हिडीओ पहा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:58 IST

जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर तब्बल दहा महिन्यांनी बुधवारी इयत्ता पाचवी ते आठवीच्या वर्गांची घंटा वाजणार आहे. या ...

जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर तब्बल दहा महिन्यांनी बुधवारी इयत्ता पाचवी ते आठवीच्या वर्गांची घंटा वाजणार आहे. या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सज्ज आहेत. शाळेच्या भिंतींवर आकर्षक रंगरंगोटी केली असून, काही ठिकाणी कोरोनापासून बचाव व्हावा, म्हणून काय करावे, याबाबतच्या सुचना फळ्यांवर अक्षरात लिहिल्या होत्या. तर वर्गांची साफसफाई केल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत आढळून आले.

जळगाव जिल्ह्यात पाचवी ते आठवीची वर्ग असलेल्या दोन हजारांवर शाळा आहेत. या शाळांमध्ये ७ हजार ४६५ शिक्षक, तर २ हजार २९८ शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या वर्गांना प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ प्रतिनिधींनी सोमवारी खासगी व मनपा शाळांमध्ये पाहणी केली.

सॅनिटाईज, तापमापन मोजूनच प्रवेश

बळीराम पेठेतील मनपा शाळा क्रमांक १७मध्ये पाहणी केल्यावर त्याठिकाणी शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण साफसफाई करण्यात आली होती. सॅनिटाझर व थर्मल गन आणून ती ठेवण्यात आली होती. बुधवारी विद्यार्थ्यांना प्रवेशद्वारावर थांबवून त्यांचे तापमान मोजून व सॅनिटाईज करून वर्गात प्रवेश दिला जाईल, असे प्रभारी मुख्याध्यापिका फातिमा तडवी यांनी सांगितले. ४५ विद्यार्थी असून, त्यापैकी २० पालकांनी संमती दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या स्वागताला बोलक्या भिंती

मनपा चौबे शाळेतही विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे़ वर्गाबाहेर चित्र काढून त्याद्वारे अभ्यासक्रम देण्यात आला आहे. त्याचबरोबर ‘दो गज दुरी, मास्क है जरूरी, माझी शाळा माझी जबाबदारी, आता आमचं ठरलंय’ असेही भिंतीवर लिहिण्यात आले आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सज्ज असून, वर्गात निर्जंतुकीकरण फवारणी केली असून, विद्यार्थ्यांना संपूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे मुख्याध्यापक राजेंद्र राजपूत यांनी सांगितले.

बहुतांश पालकांचा ना!

चाळीस ते पन्नास टक्के पालकांनी पाल्यांना शाळेस पाठविण्यास संमती दर्शविली आहे. मात्र, अजूनही पन्नास टक्के पालकांचा पाल्यास पाठविण्यास नकार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष शाळेत आल्यावरच विद्यार्थ्यांची उपस्थिती संख्या समजणार आहे. जळगाव जिल्ह्यात ३ लाख १० हजार विद्यार्थी आहेत.