शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

टप्प्या टप्प्याने रक्तदान केल्यास तुटवडा शुन्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:20 IST

रक्तपेढीच्या पदाधिका:यांना विश्वास : तरुण व महिलांनी रक्तदानासाठी पुढे यावे

ठळक मुद्दे50 ते 100 बाटल्याच रक्तदान व्हावे रक्तदानात युवक व महिला पिछाडीवररक्तदानाबाबत गैरसमज

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 29 -  रक्तदान चळवळीला मोठे यश येत असून दिवसेंदिवस रक्तदानाचे प्रमाण वाढत आहे. यामुळे जळगावात रक्ताचा तुटवडा भासणे नगण्य आहे. हा तुटवडा शून्यावर आणण्यासाठी एक सोबत 500 ते 1000 बाटल्या रक्तसंकलन करण्यापेक्षा ते प्रमाण 50 ते 100 बाटल्यांवर आणणे गरजेचे आहे. यासाठी टप्प्या-टप्प्याने रक्तदान शिबिर घेऊन त्यात सलगता ठेवणे महत्त्वाचे आहे, असा सूर रक्तपेढी पदाधिकारी व रक्तदात्यांच्या चर्चेतून उमटला. 1 ऑक्टोबर रोजी ऐच्छिक रक्तदान दिन व संपूर्ण महिना ऐच्छिक रक्तदान महिना म्हणून साजरा होणार असल्याने या पाश्र्वभूमीवर जिल्हा क्रीडा संकुलातील ‘लोकमत’ कार्यालयात शहरातील रक्तपेढी पदाधिकारी, रक्तदाते यांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या वेळी इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या रक्तपेढीचे चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, सचिव अनिल कांकरिया, जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीचे रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. उमेश कोल्हे, डॉ. अजरुन सुतार, माधवराव गोळवलकर रक्तपेढीचे सह प्रकल्प प्रमुख डॉ. रवी हिराणी, दीपक जोशी, तुफान शर्मा, वैद्यकीय संचालक तथा कर्करोगतज्ज्ञ डॉ. नितीन चौधरी, व्यवस्थापक भानुदास येवलेकर, जनसंपर्क अधिकारी पवन येपुरे, रक्तदाते संत निरंकारी मंडळाचे सुरेश तलरेजा, शैलेश वाणी, शीखा वाणी उपस्थित होते. रक्तदान शिबिर आयोजित केल्यानंतर त्यामध्ये जास्तीत जास्त रक्त बाटल्यांचे संकलन करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र तसे न करता केवळ 50 ते 100 बाटल्यांचे रक्त संकलन करून यात सातत्य ठेवल्यास मोठी मदत होणे शक्य आहे. कारण एक सोबत जेवढे रक्त जमा झाले त्याची मुदतही एकाच वेळी संपते. त्यामुळे ऐनवेळी एखादा रक्तदाता न भेटल्यास अडचणी येऊ शकतात. यासाठी रक्तदानात सलगता ठेवणे महत्त्वाचे असल्याचा सूर यावेळी उमटला. या सोबतच वाढदिवस, घरातील काही आनंदाचे क्षण, पुण्यतिथी अथवा इतर प्रसंगानुसार रक्तपेढय़ांमध्ये जाऊन रक्तदान केल्यास कायमस्वरुपी व मुदतीतील रक्तसाठा उपलब्ध राहू शकतो, असाही विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला. रक्तदानामध्ये देशात महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे. मात्र दुसरी धोकादायक बाब म्हणजे रक्तसंकलन करताना योग्य दक्षता न घेतल्याने एचआयव्हीचाही प्रसार महाराष्ट्रातच जास्त वाढला असल्याचीही दुसरी बाजू आहे. मात्र जळगावातील रक्तपेढय़ांच्या दक्षता व सतर्कतेमुळे जळगाव जिल्ह्यात रक्तदानातून एचआयव्हीचे प्रमाण शून्य असल्याचे या वेळी आवजरून सांगण्यात आले. या वेळी रक्तपेढय़ांमार्फत राबविण्यात येणा:या विविध उपक्रमांची माहिती देण्यात येऊन रक्तदाते सुरेश तलरेजा, शैलेश वाणी, शीखा वाणी यांनीही रक्तदानाचे फायदे यावेळी सांगितले. उन्हाळा असो की कोणताही ऋतू, त्यामध्ये सर्व जण रक्तदान करू शकतात. उन्हाळ्य़ात रक्तदान होत नाही व नेमके त्याचवेळी रक्त कमी पडते. उन्हाळ्य़ातही रक्तदान केल्यास शरीरावर कोणताही परिणाम होत नाही, असाही सल्ला देण्यात आला.रक्ताअभावी पाच वर्षात एकाचाही मृत्यू नाहीजळगावात रक्तदान चळवळीमुळे मोठा फायदा होत असून सर्वच रक्तपेढय़ांमध्ये पुरेसा रक्तसाठा उपलब्ध असल्याने गेल्या पाच वर्षात जळगाव जिल्ह्यात रक्ताअभावी एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. रक्तदानाबाबत अद्यापही गैरसमज आहे. अनेक महिला रक्तदान करण्यास तयार होत नाही. तरुणवर्गही याकडे फारसा लक्ष देत नाही. त्यामुळे महिलांचे व 18 ते 28 वयोगटातील तरुण वर्गाचे प्रमाण वाढणे आवश्यक  आहे.