शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

तृप्त झाले मन.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 10:40 PM

संत आत्मज्ञानी असतात म्हणून त्यांना ईश्वराचे यथार्थ रुप ज्ञान असते. निसर्ग आणि दृश्य जग यांच्याबद्दलच्या चुकीच्या कल्पना संत नाहीशा ...

संत आत्मज्ञानी असतात म्हणून त्यांना ईश्वराचे यथार्थ रुप ज्ञान असते. निसर्ग आणि दृश्य जग यांच्याबद्दलच्या चुकीच्या कल्पना संत नाहीशा करतात. मोठे ध्येय साधण्यासाठी मोठे श्रम लागतात. ईश्वरप्राप्ती हे फार मोठे ध्येय आहे. अर्थात् त्याच्या दर्शनासाठी फार श्रम करणे अवश्य आहे. म्हणून पुष्कळ लोक तीर्थयात्रा करीत असतात. समर्थ रामदास स्वामींच्या मते देव कसा आहे, याचा शोध घेणारा पुरुष हजारोंमध्ये एखादाच निघतो. ईश्वराचे स्वरुप समजून घेताना एक ध्यानात ठेवावे की, ईश्वर हा काही एखादी व्यक्ती नव्हे. त्याला मानवशरीर व मानवधर्म नाही. अवताराला मानव शरीर असते पण त्याचे त्या शरीराशी तादात्त्म्य नसते. अवतार मानव देहात राहतो पण देहाला तो सीमीत होत नाही. सर्व देहांमध्ये समर्पणाने राहणाऱ्या देहबुद्धी नसते. आत्मबुद्धी असते. ईश्वर सर्व कर्ता आहे. त्याच्या संकल्पाने निर्माण झालेले जग त्याच्या ईशाºयावर चालते. तोच विश्वाचा नियंता व संचालक आहे. तो विश्वाचा आधी होता, सध्या विश्वामध्ये विद्यमान आहे, आणि निरंतर राहणार आहे. जीवांच्या हृदयात तो आत्मरुपाने विलसतो. विश्वाच्या अंर्तयामी तोच ईश्वर म्हणून संचालन करतो आणि सद्रुप परब्रह्म परमात्मा म्हणून तोच विश्व पार करुन राहतो.खरा देव निश्चल आहे. तो सर्वगुण संपन्न, सर्वज्ञ व सर्वशक्तीमान आहे. त्या व्यतिरिक्त कोणासही ईश्वर मानणे हा अविद्याजन्य भ्रम समजावा.- दादा महाराज जोशी, जळगाव.

 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव