शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

महसूलमंत्री साहेब, वाळू चोरी रोखण्यासाठी बाऊन्सर कधी नियुक्त करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 22:06 IST

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वर्षभरापूर्वी जळगावात दिले होते आश्वासन

ठळक मुद्देगिरणा नदी पात्रात तर रात्रीच्यावेळी वाळू चोरट्यांची जत्रानागरिक शांत झाल्यानंतर प्रशासन कारवाई थांबविते

विकास पाटीलराज्यभरात वाळूची मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याने बाऊन्सरची (खाजगी सुरक्षा रक्षक) नियुक्ती करण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे महसूलमंत्री तथा जळगाव जिल्ह्णाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वर्षभरापूर्वी जळगावात दिले होते. पालकमंत्र्यांनीदिलेल्या आश्वासनांपैकी हे एक आश्वासन. ते कदाचित विसरले असतील मात्र जळगावकर अजिबात विसरलेले नाही. जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित कार्यक्रमासाठी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘राज्यातील नदी पात्रांमधील वाळू शासनासाठी डोकेदुखी ठरली आहे. चोरी रोखण्यासाठी नदीपात्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील. वाळू चोरट्यांचा, माफियांशी मुकाबला करण्यासाठी बाऊन्सरची नियुक्ती करण्यात येईल....अशी अनेक आश्वासने महसूलमंत्र्यांनी त्या कार्यक्रमात दिली होती. दुदैव असे की, जळगाव जिल्ह्णात ना बाऊन्सरची नियुक्ती झाली ना नद्यांमध्ये कॅमेरे बसविण्यात आले. महसूलमंत्र्यांची आश्वासने हवेत विरली.वाळू ठेक्यांची मुदत ३० सप्टेंबर रोजीच संपली. त्यानंतर नदी पात्रातून वाळू वाहतूक बंद होणे आवश्यक होते, मात्र जणू महसूल प्रशासनाने परवानगी दिली आहे, अशा पद्धतीने गिरणा नदीपात्रातून वाळूचा उपसा सुरु आहे. आव्हाणे, खेडी गावालगतच्या गिरणा नदी पात्रात तर रात्रीच्यावेळी वाळू चोरट्यांची जत्रा भरते.गिरणा नदीच्या वाळू दर्जेदार असल्याने राज्यपरराज्यातून या वाळूला मोठी मागणी असते. त्यामुळे येथील वाळूचा प्रचंड उपसा होतो.असे असतानाही प्रशासन डोळे मिटून आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने आतापर्यंत अनेक निष्पापांचा बळी गेला आहे. अपघातानंतर संतप्त जमावाकडून वाहनाची तोडफोड होते. धडक देणाºया डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल होतो, मालक मात्र मोकाटच असतो. या घटनेनंतर प्रशासन थोडे दिवस कारवाईचे नाटक करते. नागरिक शांत झाल्यानंतर प्रशासनही कारवाई थांबविते अन् पुन्हा वाळू वाहतूक सुरु होते.गेल्या अनेक वर्षांपासूनहीच स्थिती आहे. आतापर्यंत अनेक निष्पापांचे बळी गेले मात्र प्रशासन वाळू चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात सपशेल अपयशी ठरली आहे. मोक्का, हद्दपारीचीही कारवाई करण्यात येईल, असेही आश्वासने आतापर्यंत देण्यात आली मात्र एक-दोन कारवाई वगळता कोणतीही ठोस कारवाई प्रशासनानेकेलेली नाही.धक्कादायक म्हणजे शहर पोलीस स्टेशनसमोरुन मनपाच्या चौबे शाळेमार्गे वाळूची वाहने भरधाव वेगाने जात असतानाही कोणतीही कारवाई होत नाही. महसूल, पोलीस व आरटीओ प्रशासन एकत्र आले व त्यांनी वाळू चोरी विरुद्ध जोरदार मोहिम राबविली, असे चित्र जिल्हावासीयांना कधीच दिसले नाही. एकत्र येवून कारवाई करण्यास त्यांना काय अडचण आहे?महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची स्वच्छ प्रतिमा असलेले मंत्री म्हणून ओळख असून जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकरही कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. असे असतानाही वाळू चोरटे जळगाव जिल्ह्णात शिरजोर झाले आहेत. महसूल, आरटीओ व पोलीस प्रशासनाने ठरविले तर वाळू चोरी नक्की बंद होईल, मात्र इच्छाशक्तीची आवश्यकता आहे.तसेच महसूलमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली तरी वाळू चोरी बंद होऊ शकते.

टॅग्स :sandवाळूJalgaonजळगाव