शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

महसूलमंत्री साहेब, वाळू चोरी रोखण्यासाठी बाऊन्सर कधी नियुक्त करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 22:06 IST

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वर्षभरापूर्वी जळगावात दिले होते आश्वासन

ठळक मुद्देगिरणा नदी पात्रात तर रात्रीच्यावेळी वाळू चोरट्यांची जत्रानागरिक शांत झाल्यानंतर प्रशासन कारवाई थांबविते

विकास पाटीलराज्यभरात वाळूची मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याने बाऊन्सरची (खाजगी सुरक्षा रक्षक) नियुक्ती करण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे महसूलमंत्री तथा जळगाव जिल्ह्णाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वर्षभरापूर्वी जळगावात दिले होते. पालकमंत्र्यांनीदिलेल्या आश्वासनांपैकी हे एक आश्वासन. ते कदाचित विसरले असतील मात्र जळगावकर अजिबात विसरलेले नाही. जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित कार्यक्रमासाठी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘राज्यातील नदी पात्रांमधील वाळू शासनासाठी डोकेदुखी ठरली आहे. चोरी रोखण्यासाठी नदीपात्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील. वाळू चोरट्यांचा, माफियांशी मुकाबला करण्यासाठी बाऊन्सरची नियुक्ती करण्यात येईल....अशी अनेक आश्वासने महसूलमंत्र्यांनी त्या कार्यक्रमात दिली होती. दुदैव असे की, जळगाव जिल्ह्णात ना बाऊन्सरची नियुक्ती झाली ना नद्यांमध्ये कॅमेरे बसविण्यात आले. महसूलमंत्र्यांची आश्वासने हवेत विरली.वाळू ठेक्यांची मुदत ३० सप्टेंबर रोजीच संपली. त्यानंतर नदी पात्रातून वाळू वाहतूक बंद होणे आवश्यक होते, मात्र जणू महसूल प्रशासनाने परवानगी दिली आहे, अशा पद्धतीने गिरणा नदीपात्रातून वाळूचा उपसा सुरु आहे. आव्हाणे, खेडी गावालगतच्या गिरणा नदी पात्रात तर रात्रीच्यावेळी वाळू चोरट्यांची जत्रा भरते.गिरणा नदीच्या वाळू दर्जेदार असल्याने राज्यपरराज्यातून या वाळूला मोठी मागणी असते. त्यामुळे येथील वाळूचा प्रचंड उपसा होतो.असे असतानाही प्रशासन डोळे मिटून आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने आतापर्यंत अनेक निष्पापांचा बळी गेला आहे. अपघातानंतर संतप्त जमावाकडून वाहनाची तोडफोड होते. धडक देणाºया डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल होतो, मालक मात्र मोकाटच असतो. या घटनेनंतर प्रशासन थोडे दिवस कारवाईचे नाटक करते. नागरिक शांत झाल्यानंतर प्रशासनही कारवाई थांबविते अन् पुन्हा वाळू वाहतूक सुरु होते.गेल्या अनेक वर्षांपासूनहीच स्थिती आहे. आतापर्यंत अनेक निष्पापांचे बळी गेले मात्र प्रशासन वाळू चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात सपशेल अपयशी ठरली आहे. मोक्का, हद्दपारीचीही कारवाई करण्यात येईल, असेही आश्वासने आतापर्यंत देण्यात आली मात्र एक-दोन कारवाई वगळता कोणतीही ठोस कारवाई प्रशासनानेकेलेली नाही.धक्कादायक म्हणजे शहर पोलीस स्टेशनसमोरुन मनपाच्या चौबे शाळेमार्गे वाळूची वाहने भरधाव वेगाने जात असतानाही कोणतीही कारवाई होत नाही. महसूल, पोलीस व आरटीओ प्रशासन एकत्र आले व त्यांनी वाळू चोरी विरुद्ध जोरदार मोहिम राबविली, असे चित्र जिल्हावासीयांना कधीच दिसले नाही. एकत्र येवून कारवाई करण्यास त्यांना काय अडचण आहे?महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची स्वच्छ प्रतिमा असलेले मंत्री म्हणून ओळख असून जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकरही कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. असे असतानाही वाळू चोरटे जळगाव जिल्ह्णात शिरजोर झाले आहेत. महसूल, आरटीओ व पोलीस प्रशासनाने ठरविले तर वाळू चोरी नक्की बंद होईल, मात्र इच्छाशक्तीची आवश्यकता आहे.तसेच महसूलमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली तरी वाळू चोरी बंद होऊ शकते.

टॅग्स :sandवाळूJalgaonजळगाव