शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
6
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
7
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
8
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
9
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
10
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
11
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
12
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
13
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
14
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
15
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
16
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
17
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
18
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
19
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
20
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश

परतीच्या पावसाचा खरिपाला फटका

By ram.jadhav | Updated: October 18, 2017 01:25 IST

कापूस व ज्वारी, काळी पडणार : मात्र रब्बीच्या अपेक्षा वाढल्या

ठळक मुद्देज्वारी पडली काळीपांढरं सोनं होतयं काऴं़़निसर्गानेही पुन्हा एकदा घेतला बळीराजाचा ‘बळी’

राम जाधव, आॅनलाईन लोकमतजळगाव, दि़ १८ - उशिरा आलेल्या परतीच्या पावसाने जिल्ह्यासह राज्यातील सर्वच भागात खरीप हंगामाचे नुकसान होत आहे़ मात्र काही भागात झालेल्या दमदार पावसाने रब्बी हंगामातील पिकांची अपेक्षा वाढत आहे़यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने खरिपाच्या हंगामाची बोंबाबोंब आहे़ तर शेवटच्या टप्प्यात होणाºया पावसाने मात्र रब्बी हंगामातील पिकांचे क्षेत्र वाढण्याची शेतकºयांना अपेक्षा आहे़ अजून पाऊस झाल्यास गव्हाच्या लागवडीचे क्षेत्र वाढू शकते़ तर हरभरा, दादर, करडई व रब्बीचा मका या पिकांचीही लागवड वाढेल़परतीच्या पावसाने खरीप हंगामाचे जरी नुकसान होऊन जरी आपला बळी जात असला, तरी रब्बी हंगामातील पीक मिळण्याची शक्यता या ‘बळीराजा’ला आहे़ अजून काही भागात जोरदार पाऊस झाल्यास व धरण, प्रकल्प क्षेत्रात पाणी पातळी वाढल्यास रब्बी पिकांची लागवड वाढणार आहे़ यामध्ये गहू, मका, हरभरा, दादर, करडई यासह इतर भाजीपाला पिके वाढतील़ मात्र थोडेफारच पाणी राहिल्यास शेतकरी कमी कालावधीचे पीक म्हणून भाजीपाल्याला महत्त्व देतील़ खरीप हंगामाच्या संपूर्ण कालावधीत पावसाने उघडझापच केली़ त्याचा परिणाम खरिपाच्या उत्पादनावर झाला आहे़ त्यातच जे आले ते हातचे जात आहे़ अनेक शेतकºयांनी ज्वारी, मकाच्या पिकाची सोंगणी केलेली आहे, तर काहींची पिके अजून उभीच आहे़ आडवा पडलेला मका व चारा सडत आहे़ आता तर जमिनीवर पडलेल्या कणसांना पावसामुळे कोंब फुटण्याची भीती आहे़ तसेच कणसातील दाणे पाण्यामुळे काळे पडत आहेत़गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण परिसरात थोड्या अधिक प्रमाणात लागवड केलेल्या ज्वारीची डोलदार कणसे दिसत होती़ मात्र आता अचानक आलेल्या परतीच्या पावसाने ज्वारीच्या कणसांना पाणी लागल्यामुळे ज्वारीचे दाणे काळे पडत आहेत़ त्यामुळे हातातोंडाशी आलेला ज्वारीचा पांढरा शुभ्र दाणा काळा पडून निकृष्ट झाला आहे़या पावसामुळे जिल्ह्यातील ५० हजार हेक्टर भागात हाती आलेलं शेतकºयाचं पांढर सोनं म्हणजे कापूस पिवळा पडत आहे़ या कापसाला पाणी लागल्यास व्यापारी या मालाची कमी दरात खरेदी करत आहेत़ पाणी लागलेला माल म्हणून पड्या भावात खरेदी केल्याने उत्पादन खर्चाइतकाही भाव शेतकºयांना मिळत नाही़ आता या खराब झालेल्या मालाचा दर संपूर्णपणे व्यापाºयाच्या मनमानीपणाने ठरणार आहेत़ मात्र याच व्यापाºयांनी हा कापूस खरेदी करून गाडी भरताना शेकडो लीटर पाणी फवारले, तरी ते चालते़ सर्रासपणे हा प्रकार सगळीकडे चालतो़ मात्र याबद्दल कुठेही काहीच वाच्यता होत नाही़ यावर्षी मोठ्या आशेने केलेला खर्च निघेल, अशी शेतकºयांना अपेक्षा असताना ऐनवेळी पाऊस आल्याने शेतकºयांच्या या स्वप्नांवर मात्र नक्कीच पाणी फिरले आहे़आठवडाभरापासून ज्वारी शेतात पडून आहे़ पाऊस पडत असल्याने ज्वारी काळी पडत आहे़ अजून पाऊस पडल्यास या ज्वारीला कोंब येतील़ कापूस पावसात भिजला आहे़ निसर्गानेही मारले आहे, त्यामुळे तारण्यासाठी कोणाकडे हाक मारणार?- धनजी धांडे, शेतकरी, खानापूर, ता़ रावेऱ