शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात मुख्य पदांवर प्रभारी राज, मग पदभरती का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:12 IST

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सर्वच मुख्यपदांवर प्रभारी राज सुरू असताना संविधानिक पदे व विद्यापीठ फंडातून ...

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सर्वच मुख्यपदांवर प्रभारी राज सुरू असताना संविधानिक पदे व विद्यापीठ फंडातून इतर पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. ही भरती प्रक्रिया संशयास्पद असून ती थांबविण्यात यावी व नियमित कुलगुरूंच्या नियुक्तीनंतरच विद्यापीठात पदभरती व्हावी, अशी मागणी विद्यापीठाच्या ११ अधिसभा सदस्यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.

राज्यातील सर्व अकृषिक विद्यापीठातील संविधानिक पदे भरण्यासाठी नुकतीच शासनाने परवानगी दिलेली आहे. त्यानुसार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने संविधानिक पदांसोबत, विद्यापीठ फंडातून करारांवर तात्पुरत्या स्वरूपातील पदांसाठीसुद्धा पदभरतीची प्रक्रिया सुरू केलेली आहे. ही भरती संशयास्पद असल्याचा आरोप अधिसभा सदस्यांनी केला आहे. तसेच तत्कालीन कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील यांच्या राजीनाम्यानंतर विद्यापीठातील कुलगुरू, प्र-कुलगुरू आणि अधिष्ठाता ही पदे रिक्त झालेली आहेत. प्रभारी कुलगुरू म्हणून कुलपती यांनी नाशिक येथील यशवंतराव मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. वायुनंदन यांची तर प्रभारी प्र-कुलगुरू म्हणून प्रा. बी. व्ही. पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे बी. व्ही. पवार यांची प्रभारी प्र-कुलगुरू म्हणून नियुक्ती झाल्याने प्रभारी कुलसचिवपदी प्रा. ए. बी. चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु, चौधरी यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ते वैद्यकीय रजेवर गेले असता डॉ. शामकांत भादलीकर यांची प्रभारी कुलसचिव पदी नेमणूक करण्यात आली. वैदयकीय रजेनंतर प्रा. चौधरी हे कामावर रुजू होऊनसुद्धा डॉ. भादलीकर हेच प्रभारी कुलसचिव म्हणून आजही काम बघत आहेत. त्यांच्याच मार्फत भरती प्रक्रिया राबविली जात आहे. तसेच त्यांच्यावरील गैरकारभाराची चौकशी सुरू आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीकडे हे पद देण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

मग ही भरती प्रक्रिया का?

विविध पदांसाठी विद्यापीठाने जाहिरात प्रक्रिया राबविली आहे. जाहिरातीतील काही संविधानिक पदांचा पदावधी हा प्रभारी कुलगुरुंच्या पदावधी इतकाच असल्याने अशी पदे केवळ ३ ते ४ महिन्यांसाठी भरून विद्यापीठाला काय साध्य करावयाचे आहे, असा सवाल अधिसभा सदस्यांनी उपस्थित केला आहे. शेवटी अशा पदांसाठी पुन्हा ३ ते ४ महिन्यानंतर नवीन भरती प्रक्रिया राबवावीच लागणार आहे. त्यामुळे नियमित कुलगुरूंच्या नियुक्तीनंतर विद्यापीठातील पदभरती करावी व तशा सूचना जारी कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. ही मागणी माजी पालकमंत्री तथा अधिसभा सदस्य डॉ. सतीश पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, डॉ. अनिल पाटील, प्रा. एकनाथ नेहते, प्राचार्या. डॉ. संध्या सोनवणे, प्रा. डॉ. किशोर कोल्हे, प्रा. डॉ. प्रकाश अहिरराव, प्रा. डॉ. मोहन पावरा, प्रा .डॉ. सुनील गोसावी, प्रा. डॉ. अजय सुरवाडे आदींनी केली आहे.