शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

चुकीच्या पद्धतींना प्रोत्साहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 01:47 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘आरसा मनाचा’ या सदरात जळगाव येथील लेखक विलास भाऊलाल पाटील यांनी सुधारणावादाच्या कथित प्रथा-परंपरांवर घेतलेले चिमटे...

अलिकडे समाज जीवन व सण समारंभामध्ये सुधारणावादाच्या नावावर चुकीच्या प्रथा आणि पद्धतींना प्रोत्साहन दिले जाताना दिसत आहे. चूक म्हणून चूक वागणे ही वेगळी गोष्ट आहे आणि सुधारणावादी दाखवून चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देणे ही वेगळी गोष्ट. चूक म्हणून चूक करणे आणि वागणे किंवा चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देणे हे तर गंभीर आहेच परंतु सुधारणावादाच्या नावाखाली चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देणे हे जास्त गंभीर आहे, असे मला वाटते. त्यासाठी एका गोष्टीचे उदाहरण देऊन अधिक स्पष्टीकरण करता येईल.ए क घोडेस्वार एका गावाहून दुसऱ्या गावाला जात असतो. त्याला रस्त्यात एका रुग्ण वाटसरू भेटतो. रुग्ण वाटसरू त्याला घोड्यावरून जाण्यासाठी घोडेस्वारास विनंती करतो. रुग्णाला मदत करण्याच्या हेतूने घोडेस्वार त्याला घोड्यावर बसवून घेतो. काही अंतर गेल्यावर निर्जनस्थळी रुग्ण सांगणारी व्यक्ती घोडेस्वाराजवळील चिजवस्तू लुटून घेते व त्यास जंगलातच फेकून निघून जाऊ लागले. त्यावेळी घोडेस्वार त्यास सांगतो, तू चोर दरोडेखोर, लुटारू आहेस आणि मला लुटले.माझा घोडा पळवला याचे मला वाईट वाटत नाही, परंतु तू रुग्णाईताचे सोंग घेऊन मला फसवले, याचे मला दु:ख आहे. कारण यापुढे अशा घटनेमुळे खºया व गरजू रुग्णाईतावरसुद्धा कुणी विश्वास ठेवणार नाही आणि त्याला मदतीची गरज असताना मदत मिळणार नाही. तद्वतच सुधारणावादाचे नाव घेऊन व महापुरुषांचे नाव घेऊन कुणी चुकीचे वागत असेल तर ती जास्त गंभीर गोष्ट आहे.एवढी सगळी प्रस्तावना करण्याचे कारण म्हणजे मागे एका ‘शिवविवाह’ पद्धतीने घडविलेल्या विवाहाला गेलो असताना आलेला अनुभव मन उद्विग्न करणारा आहे. छत्रपती शिवराय हे युगपुरुष होते. त्यांच्या नुसत्या नामोच्चारानेच आपण पवित्र होऊन जातो, एवढे सामर्थ्यपण त्याच महाराजांच्या नावाने घडविण्यात येणाºया विवाह कार्यक्रमात मी ‘प्रीवेडींग’ शुटिंग (विवाहपूर्व चित्रण) पाहिले आणि मन उद्विग्न झाले. ज्या पद्धतीने वधूवरांचे चित्रीकरण करण्यात आले होते त्यावरून कोणता संदेश त्यातून समाजाला द्यावयाचा आहे किंवा काय सुधारणा घडावयाची आहे न कळे? तसेच दुसरा अनुभव त्याच पद्धतीच्या विवाह समारंभात नेतेमंडळींचा सत्कार, भाषणे त्यातून वेळेचा अपव्यय. काय साध्य करावयाचे आहे आम्हाला?एका बाजूला बडेजाव, झकपकपणा, दिखावूपणा आणि दुसºया बाजूला वेळेचा अपव्यय, गैरव्यवस्था येणाºया पैपाहुण्यांची आणि आप्तेष्टांची होणारी गैरसोय आणि आबाळ. काय साध्य करावयाचे आहे आम्हाला न कळे? काय सुधारणा करू इच्छितो आम्ही? काय संदेश देऊ इच्छितो समाजाला.तसेच दुसरे उदाहरण- कार्पोरेट कल्चर आणि उच्चभ्रू संस्कृतीबाबतचे. आम्ही कार्पोरेट कल्चरमध्ये वावरतो किंवा उच्चभ्रू संस्कृतीत वावरतो म्हणजे आम्ही सुधारणावादी आहोत, मागास विचारांची कास आम्ही कधीच सोडली आहे, असे म्हणत कुटुंबातील वडीलधारी माणसे, तरुण मुले, मुली आणि सुना यांचे वागणे बेताल होत चालले आहे.उदाहरणार्थ या कार्पोरेट कल्चरच्या नावाखाली आॅफिसचा म्हातारा बॉस आणि त्याचा नुकतेच मिसरुड फुटलेला तरुण सहकारी हे तर एकत्र मद्यप्राशन करताय, परंतु आता वडील-मुलगा, काका-पुतणे, सासरा-जावई, भाऊ-भाऊ हे सर्रास एकत्र बसून मद्यप्राशन करतात. झिंगतात प्रसंगी नशेत भांडतातही आणि त्याला आम्ही नाव दिलं ‘कार्पोरेट कल्चर.’आम्ही सुधारणावादी आहोत, मुलींना, सुनांना सर्व प्रकारचे स्वातंत्र्य आम्ही देतो, असं म्हणत म्हणत वेशभूषा, केशभूषा याबाबतीत तर आमचा स्तर घसरलाच, पण आता अनेक कुटुंबामध्ये सण समारंभात आणि लग्नकार्यात महिलांचे रस्त्यावरचे नृत्यकामही कोणत्या थराला गेले याचा आपणच विचार करायला हवा आणि ‘कार्पोरेट कल्चरच्या’ नावाखाली आता उच्च मध्यमवर्गीय कुटुंबामध्येदेखील ‘महिला मद्यपानाला’ मान्यता मिळताना दिसत आहेत, ही फार मोठी धोक्याची घंटा आहे, असे मला वाटते.-विलास भाऊलाल पाटील, जळगाव

टॅग्स :SocialसामाजिकJalgaonजळगाव