शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

चुकीच्या पद्धतींना प्रोत्साहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 01:47 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘आरसा मनाचा’ या सदरात जळगाव येथील लेखक विलास भाऊलाल पाटील यांनी सुधारणावादाच्या कथित प्रथा-परंपरांवर घेतलेले चिमटे...

अलिकडे समाज जीवन व सण समारंभामध्ये सुधारणावादाच्या नावावर चुकीच्या प्रथा आणि पद्धतींना प्रोत्साहन दिले जाताना दिसत आहे. चूक म्हणून चूक वागणे ही वेगळी गोष्ट आहे आणि सुधारणावादी दाखवून चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देणे ही वेगळी गोष्ट. चूक म्हणून चूक करणे आणि वागणे किंवा चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देणे हे तर गंभीर आहेच परंतु सुधारणावादाच्या नावाखाली चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देणे हे जास्त गंभीर आहे, असे मला वाटते. त्यासाठी एका गोष्टीचे उदाहरण देऊन अधिक स्पष्टीकरण करता येईल.ए क घोडेस्वार एका गावाहून दुसऱ्या गावाला जात असतो. त्याला रस्त्यात एका रुग्ण वाटसरू भेटतो. रुग्ण वाटसरू त्याला घोड्यावरून जाण्यासाठी घोडेस्वारास विनंती करतो. रुग्णाला मदत करण्याच्या हेतूने घोडेस्वार त्याला घोड्यावर बसवून घेतो. काही अंतर गेल्यावर निर्जनस्थळी रुग्ण सांगणारी व्यक्ती घोडेस्वाराजवळील चिजवस्तू लुटून घेते व त्यास जंगलातच फेकून निघून जाऊ लागले. त्यावेळी घोडेस्वार त्यास सांगतो, तू चोर दरोडेखोर, लुटारू आहेस आणि मला लुटले.माझा घोडा पळवला याचे मला वाईट वाटत नाही, परंतु तू रुग्णाईताचे सोंग घेऊन मला फसवले, याचे मला दु:ख आहे. कारण यापुढे अशा घटनेमुळे खºया व गरजू रुग्णाईतावरसुद्धा कुणी विश्वास ठेवणार नाही आणि त्याला मदतीची गरज असताना मदत मिळणार नाही. तद्वतच सुधारणावादाचे नाव घेऊन व महापुरुषांचे नाव घेऊन कुणी चुकीचे वागत असेल तर ती जास्त गंभीर गोष्ट आहे.एवढी सगळी प्रस्तावना करण्याचे कारण म्हणजे मागे एका ‘शिवविवाह’ पद्धतीने घडविलेल्या विवाहाला गेलो असताना आलेला अनुभव मन उद्विग्न करणारा आहे. छत्रपती शिवराय हे युगपुरुष होते. त्यांच्या नुसत्या नामोच्चारानेच आपण पवित्र होऊन जातो, एवढे सामर्थ्यपण त्याच महाराजांच्या नावाने घडविण्यात येणाºया विवाह कार्यक्रमात मी ‘प्रीवेडींग’ शुटिंग (विवाहपूर्व चित्रण) पाहिले आणि मन उद्विग्न झाले. ज्या पद्धतीने वधूवरांचे चित्रीकरण करण्यात आले होते त्यावरून कोणता संदेश त्यातून समाजाला द्यावयाचा आहे किंवा काय सुधारणा घडावयाची आहे न कळे? तसेच दुसरा अनुभव त्याच पद्धतीच्या विवाह समारंभात नेतेमंडळींचा सत्कार, भाषणे त्यातून वेळेचा अपव्यय. काय साध्य करावयाचे आहे आम्हाला?एका बाजूला बडेजाव, झकपकपणा, दिखावूपणा आणि दुसºया बाजूला वेळेचा अपव्यय, गैरव्यवस्था येणाºया पैपाहुण्यांची आणि आप्तेष्टांची होणारी गैरसोय आणि आबाळ. काय साध्य करावयाचे आहे आम्हाला न कळे? काय सुधारणा करू इच्छितो आम्ही? काय संदेश देऊ इच्छितो समाजाला.तसेच दुसरे उदाहरण- कार्पोरेट कल्चर आणि उच्चभ्रू संस्कृतीबाबतचे. आम्ही कार्पोरेट कल्चरमध्ये वावरतो किंवा उच्चभ्रू संस्कृतीत वावरतो म्हणजे आम्ही सुधारणावादी आहोत, मागास विचारांची कास आम्ही कधीच सोडली आहे, असे म्हणत कुटुंबातील वडीलधारी माणसे, तरुण मुले, मुली आणि सुना यांचे वागणे बेताल होत चालले आहे.उदाहरणार्थ या कार्पोरेट कल्चरच्या नावाखाली आॅफिसचा म्हातारा बॉस आणि त्याचा नुकतेच मिसरुड फुटलेला तरुण सहकारी हे तर एकत्र मद्यप्राशन करताय, परंतु आता वडील-मुलगा, काका-पुतणे, सासरा-जावई, भाऊ-भाऊ हे सर्रास एकत्र बसून मद्यप्राशन करतात. झिंगतात प्रसंगी नशेत भांडतातही आणि त्याला आम्ही नाव दिलं ‘कार्पोरेट कल्चर.’आम्ही सुधारणावादी आहोत, मुलींना, सुनांना सर्व प्रकारचे स्वातंत्र्य आम्ही देतो, असं म्हणत म्हणत वेशभूषा, केशभूषा याबाबतीत तर आमचा स्तर घसरलाच, पण आता अनेक कुटुंबामध्ये सण समारंभात आणि लग्नकार्यात महिलांचे रस्त्यावरचे नृत्यकामही कोणत्या थराला गेले याचा आपणच विचार करायला हवा आणि ‘कार्पोरेट कल्चरच्या’ नावाखाली आता उच्च मध्यमवर्गीय कुटुंबामध्येदेखील ‘महिला मद्यपानाला’ मान्यता मिळताना दिसत आहेत, ही फार मोठी धोक्याची घंटा आहे, असे मला वाटते.-विलास भाऊलाल पाटील, जळगाव

टॅग्स :SocialसामाजिकJalgaonजळगाव