शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

चहार्डी येथे पिण्याच्या पाण्याची समस्या बनली गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 22:01 IST

चोपडा तालुक्यातील चहार्डी येथे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई आहे. भर पावसाळ्यातही ग्रामस्थांना पिण्याचे पाणी पंधरा ते वीस दिवस मिळत नसल्याने भीषण टंचाई निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देगाव तसे चांगले पण वेशीला टांगलेअनेक पुरस्कार प्राप्त चहार्डी वाऱ्यावरगावकऱ्यांनी कारभार घेतला हातात

संजय सोनवणेचोपडा, जि.जळगाव : तालुक्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने नंबर दोन असलेले चहार्डी हे गाव. गाव तसे खूप चांगले; पण सध्या मात्र वेशीला टांगले आहे. येथे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई आहे. भर पावसाळ्यातही ग्रामस्थांना पिण्याचे पाणी पंधरा ते वीस दिवस मिळत नसल्याने भीषण टंचाई निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे चहार्डी या गावाला गेल्या काही वर्षांपूर्वी अनेक वेगवेगळया पुरस्कारांनी गौरवलेले आहे. मात्र तरीही ही स्थिती निर्माण झाली आहे.गेल्या तीन-चार वर्षांपासून नियोजनाचा, माहितीचा अभाव आणि संघटनाच्या अभावाने गावकºयांना पिण्याचे पाणी मिळू शकले नाही. गावकरी आपापल्या परिने जसे पिण्याचे पाणी उपलब्ध करता येईल त्या पद्धतीने करीत आहेत. भर पावसाळ्यातही या गावात पिण्याच्या पाण्याची ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीत सरपंचांसह १७ सदस्य निवडलेले आहेत. महिला सरपंच या कोणाला विश्वासात घेत नाहीत व इतर ग्रामपंचायत सदस्यांनी सुचवलेल्या कामांचा विचार होत नाही. म्हणून सदस्यांमध्ये गटबाजी निर्माण झाली आहे. मासिक सभा किंवा ग्रामसभा असते तेव्हा ग्रामपंचायत सदस्य मुद्दामहून गैरहजर राहतात. त्यामुळे सभा तहकूब होते. त्यानंतर आयोजित सभेला मात्र सर्वच ग्रामपंचायत सदस्य आवर्जून हजर असतात. सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या या गटबाजीत ग्रामस्थांचा मात्र रगडा होतोय.सरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य हे एकमेकांवर आरोप खाजगीरित्या आपापसात हजार रुपये किंवा दीड हजार रुपये गोळा करून स्वतंत्र कूपनलिका खोदून त्या पद्धतीने पाणी उपलब्ध करीत आहेत. याचा फटका मात्र ग्रामपंचायतीला निश्चित बसणार आहे. कारण ग्रामस्थ स्वत: खर्च करून मूलभूत समस्या सोडवित आहेत त्या वेळेस मात्र त्यांच्याकडे असलेली घरपट्टी आणि पाणीपट्टी भरण्याचा प्रश्न निर्माण होऊन ऐरणीवर येणार आहे. म्हणून गाव तसे खूप चांगले आहे पण सध्या मात्र वेशीला टांगले आह,े अशी अनुभूती येत आहे. अनेक ग्रामस्थ असे बोलूनही दाखवित आहेत. एवढेच नाही तर गावातील वयोवृद्ध ग्रामस्थ ‘लोकमत’कडे धाव घेऊन सांगत आहेत की, पाण्याच्या समस्येबाबत आवाज उठवा आणि तुमच्या माध्यमातून गावकºयांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत होईल, अशी अपेक्षाही अनेक गावकºयांनी व्यक्त केली आहे.ग्रामस्थ स्वत: सायकल, मोटारसायकल, टँकरने, बैलगाडीने, उपलब्ध होईल तेथून पिण्याचे पाणी व वापरण्यासाठी उपलब्ध करीत आहेत. मात्र ग्रामपंचायत सरपंच यांचा नियोजनाचा अभाव असल्याने सर्वांचे हालच हाल होत आहेत. गावाला पिण्याचा पाणीपुरवठा गावातीलच कूपनलिकांद्वारे केला जात होता. परंतु निम्म्यापेक्षा जास्त कूपनलिका जमिनीतील पाण्याची पातळी खोल गेल्याने बंद पडलेल्या आहेत. म्हणूनच पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे.एवढेच नाही तर चहार्डीकडून निमगव्हाणकडे जाणाºया रस्त्यालगत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होण्यासाठी कूपनलिका खोदलेल्या आहेत. त्या कूपनलिकांमधील पंप दुरुस्तीसाठी बाहेर काढला असता कोणीतरी अज्ञात ग्रामस्थांकडून त्या कूपनलिकेत दगड टाकण्याचे किंवा अ‍ॅसिड टाकण्याचे प्रकार झाले आहेत म्हणून गावात मोठ्या प्रमाणात तेढ निर्माण झाली आहे. गटबाजीचे सध्या दर्शन होत आहे. त्यात मात्र ग्रामस्थांचा रगडा होत आहे. अखेर ग्रामस्थांचा दोनशे ते तीनशे घरे मिळून कूपनलिका खोदत आहेत आणि स्वत: पाणी उपलब्ध करीत आहेत.गावाला मिळालेले पुरस्कार असे-२००३/०४ साली संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय द्वितीय पुरस्कार (तीन लाख रुपये),२००४ साली महात्मा फुले जलभूमी अभियान अंतर्गत प्रथम पुरस्कार,२००७ साली यशवंत पंचायत राज अभियान अंतर्गत विभागीय पातळीचा द्वितीय पुरस्कार (२ लाख),२००६/०७ साली महात्मा गांधी तंटामुक्त अभियान प्रथम पुरस्कार आणि विशेष शांतता पुरस्कार ( १० लाख + २.५ लाख)२०१०/११ साली राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार (१० लाख),२०११/१२ साली पंचायत सबलीकरण व उत्तरदायी अभियान अंतर्गत पुरस्कार (६ लाख), यशवंत पंचायत राज अभियान विभागीय पुरस्कार (३ लाख).

टॅग्स :water shortageपाणीटंचाईChopdaचोपडा