शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊत पुन्हा मैदानात, एकनाथ शिंदेंवर घणाघात! म्हणाले, "डिसेंबरनंतर काय होतं पाहा, शिंदेसेनेचा कोथळा..."
2
"पराभवाच्या निराशेतून बाहेर पडा", हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका
3
स्वस्त झाला सिलिंडर; आजपासून किती रुपयांना मिळणार, पाहा ATF च्या किंमतीत किती झाला बदल?
4
जाहीर सभेत अजित पवारांचा 'मुख्यमंत्री' म्हणून उल्लेख; दादा गालातल्या गालात हसले आणि म्हणाले...
5
काळीज हेलावणारी घटना! ७ वर्षांच्या लेकाला वाचवण्यासाठी धावली, आणि भरधाव बसने आईला चिरडले; तीन लेकरांसमोर मातेचा मृत्यू
6
वैभव सूर्यवंशीचा टीम इंडियात धमाका; बिहारमध्ये गेल्यावर बॅटला लागलं 'ग्रहण'
7
खळबळजनक! 'तो' वाद टोकाला गेला, लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशीच विवाहितेसोबत घडलं भयंकर
8
'तुम्ही चर्चा करत नाही, तो ड्रामा'; हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
9
SIP ला लावा 'टॉप-अप'चा बुस्टर! दरवर्षी रक्कम वाढवा आणि तुमचं आर्थिक लक्ष्य वेळेआधी पूर्ण करा!
10
अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक समायोजनाला बसला ब्रेक, समायोजन स्थगित; आता २०२५-२६ च्या संचमान्यतेनंतरच प्रक्रिया
11
हनिमूनच्या रात्री नवरी फक्त 'हे' म्हणाली, नवरदेव निघून गेला अन् परतलाच नाही; नेमकं काय घडलं?
12
नोकरी करणं गरज नाही तर केवळ छंद राहिल; Nikhil Kamath यांच्या पॉडकॉस्ट मध्ये Elon Musk यांची भविष्यवाणी
13
निवडणुका रद्द करण्याचा निर्णय चुकीचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवडणूक आयोगावर टीका
14
स्मृती मंधानाला चीट केल्याची चर्चा, लग्नही पुढे ढकललं; सर्व प्रकारानंतर पलाश मुच्छल पहिल्यांदाच दिसला
15
चायनामन कुलदीपची कमाल! शेन वॉर्नचा २३ वर्षांपूर्वीचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास
16
समांथा रुथ प्रभूने गुपचुप केलं दुसरं लग्न? 'द फॅमिली मॅन'च्या दिग्दर्शकासोबत संसार थाटल्याच्या चर्चा
17
वरमाला झाली, वधू स्टेजवरून उतरली... अन् थेट प्रियकरासोबत पळून गेली! सप्तपदीपूर्वीच लग्नात मोठा राडा
18
तंबाखू-सिगारेट महागणार तर विमा होणार स्वस्त! ९ मोठी आर्थिक विधेयकं संसदेत मांडली जाणार
19
भयंकर! विधवा सून बॉयफ्रेंडसह दिसली शेतात; संतापलेल्या सासऱ्याने दोघांना बांधलं अन् लावली आग
20
हे ठरवून करत आहेत की खरेच असे घडत आहे? राज आणि उद्धव यांची भूमिका अस्वस्थ करणारी
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याने जाणाऱ्या पोलिसाने हल्लेखोर मुलांना बेड्या ठोकल्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:15 IST

जळगाव : रविवारची वेळ सकाळी साडेदहा वाजेची... तालुका पोलीस ठाण्याचे वारंट ड्यूटीचे हवालदार श्यामकांत बोरसे दुचाकीने पोलीस ठाण्यात जात ...

जळगाव : रविवारची वेळ सकाळी साडेदहा वाजेची... तालुका पोलीस ठाण्याचे वारंट ड्यूटीचे हवालदार श्यामकांत बोरसे दुचाकीने पोलीस ठाण्यात जात असताना एक महिला दोन लहान मुलींना घेऊन घाबरलेल्या अवस्थेत रेल्वे गेटच्या रस्त्याने धावत सुटली... मिनिटा मिनिटाला ती मागे वळून पाहत होती... काय झालं असावं म्हणून बोरसेंनाही प्रश्न पडला. त्यांनी पुढे जाऊन पाहिले तर एक पुरुष रक्ताच्या थारोळ्यात पडला होता तर तेथेच एका मुलाच्या हातात चॉपर तर दुसऱ्याच्या हातात दांडकं होतं... बोरसेंनी क्षणाचाही विलंब न करता समयसूचकता दाखवत दुचाकीच्या डिक्कीतून बेड्या काढल्या अन् दोन्ही मुलांच्या हातात टाकून पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली.

या घटनेबाबत श्यामकांत बोरसे यांनी ‘लोकमत’ला घटनाक्रम सांगितला, निमखेडी शिवारात मुलांनीच बापाचा (प्रेमसिंग अभयसिंग राठोड) खून केला हे आपल्याला माहिती नव्हते. नेहमीप्रमाणे साध्या गणवेशात पोलीस ठाण्यात जात असताना एक महिला प्रचंड घाबरलेली व दोन्ही मुलांना घेऊन धावत असल्याचे दृश्य नजरेस पडले. ती सारखी सारखी मागे वळून पाहत होती. नक्कीच काही तरी गडबड असावी म्हणून ती ज्या रस्त्याने आली तिकडे काय आहे म्हणून नजर टाकली असता काही अंतरावर एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता.

एकाच्या हातात दांडकं, दुसऱ्याच्या हातात चॉपर

घटनास्थळावर तेथे एका मुलाने बोरसे यांच्या डोळ्यासमोर दांडकं बाजूला फेकले, तर दुसऱ्याने चॉपर फेकला. येथे खून झाल्याची खात्री पटली. दोन्ही मुले एक तर पळून जातील किंवा संतापाच्या भरात ते आईवर देखील वार करतील, अशी शंका मनात आली. त्यामुळे कुठलाच विचार न करता तातडीने दुचाकीच्या डिक्कीतून बेड्या काढल्या आणि दोन्ही मुलांच्या (गोपाल व दीपक) हातात त्या अडकविल्या. बेड्या पाहून या दोघांना आपण पोलीस असल्याची खात्री पटली. त्यामुळे त्यांनी कुठलीच हालचाल केली नाही. बोरसे यांनी लगेच तालुका पोलीस ठाण्यात घटनेची माहिती कळविली. पोलीस वाहनदेखील अवघ्या काही मिनिटांतच पोहोचले. या दोघं मुलांना घेऊन तातडीने पोलीस ठाण्यात हलविले. नंतर प्रेमसिंग राठोड याची पत्नी बसंती, मुलगी शिवानी व कविता या तिघांना बोरसे यांनी समयसूचकता दाखविली नसती तर कदाचित दोन्ही मुले फरार झाली असती किंवा दुसरी काही घटना घडली असती. दोन्ही मुलांच्या ताकदीपुढे बोरसे कमी पडले होते. त्यात बोरसे यांच्यावर देखील हल्ला होण्याची भीती होती. मात्र, त्यांनी जिवाची पर्वा न करता आरोपींना पकडून ठेवल्याने त्यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.