शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
4
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
5
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
6
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
7
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
8
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
9
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
10
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
11
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
12
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
13
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
14
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
15
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
16
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
17
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
18
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
19
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
20
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा

रस्त्याने जाणाऱ्या पोलिसाने हल्लेखोर मुलांना बेड्या ठोकल्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:15 IST

जळगाव : रविवारची वेळ सकाळी साडेदहा वाजेची... तालुका पोलीस ठाण्याचे वारंट ड्यूटीचे हवालदार श्यामकांत बोरसे दुचाकीने पोलीस ठाण्यात जात ...

जळगाव : रविवारची वेळ सकाळी साडेदहा वाजेची... तालुका पोलीस ठाण्याचे वारंट ड्यूटीचे हवालदार श्यामकांत बोरसे दुचाकीने पोलीस ठाण्यात जात असताना एक महिला दोन लहान मुलींना घेऊन घाबरलेल्या अवस्थेत रेल्वे गेटच्या रस्त्याने धावत सुटली... मिनिटा मिनिटाला ती मागे वळून पाहत होती... काय झालं असावं म्हणून बोरसेंनाही प्रश्न पडला. त्यांनी पुढे जाऊन पाहिले तर एक पुरुष रक्ताच्या थारोळ्यात पडला होता तर तेथेच एका मुलाच्या हातात चॉपर तर दुसऱ्याच्या हातात दांडकं होतं... बोरसेंनी क्षणाचाही विलंब न करता समयसूचकता दाखवत दुचाकीच्या डिक्कीतून बेड्या काढल्या अन् दोन्ही मुलांच्या हातात टाकून पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली.

या घटनेबाबत श्यामकांत बोरसे यांनी ‘लोकमत’ला घटनाक्रम सांगितला, निमखेडी शिवारात मुलांनीच बापाचा (प्रेमसिंग अभयसिंग राठोड) खून केला हे आपल्याला माहिती नव्हते. नेहमीप्रमाणे साध्या गणवेशात पोलीस ठाण्यात जात असताना एक महिला प्रचंड घाबरलेली व दोन्ही मुलांना घेऊन धावत असल्याचे दृश्य नजरेस पडले. ती सारखी सारखी मागे वळून पाहत होती. नक्कीच काही तरी गडबड असावी म्हणून ती ज्या रस्त्याने आली तिकडे काय आहे म्हणून नजर टाकली असता काही अंतरावर एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता.

एकाच्या हातात दांडकं, दुसऱ्याच्या हातात चॉपर

घटनास्थळावर तेथे एका मुलाने बोरसे यांच्या डोळ्यासमोर दांडकं बाजूला फेकले, तर दुसऱ्याने चॉपर फेकला. येथे खून झाल्याची खात्री पटली. दोन्ही मुले एक तर पळून जातील किंवा संतापाच्या भरात ते आईवर देखील वार करतील, अशी शंका मनात आली. त्यामुळे कुठलाच विचार न करता तातडीने दुचाकीच्या डिक्कीतून बेड्या काढल्या आणि दोन्ही मुलांच्या (गोपाल व दीपक) हातात त्या अडकविल्या. बेड्या पाहून या दोघांना आपण पोलीस असल्याची खात्री पटली. त्यामुळे त्यांनी कुठलीच हालचाल केली नाही. बोरसे यांनी लगेच तालुका पोलीस ठाण्यात घटनेची माहिती कळविली. पोलीस वाहनदेखील अवघ्या काही मिनिटांतच पोहोचले. या दोघं मुलांना घेऊन तातडीने पोलीस ठाण्यात हलविले. नंतर प्रेमसिंग राठोड याची पत्नी बसंती, मुलगी शिवानी व कविता या तिघांना बोरसे यांनी समयसूचकता दाखविली नसती तर कदाचित दोन्ही मुले फरार झाली असती किंवा दुसरी काही घटना घडली असती. दोन्ही मुलांच्या ताकदीपुढे बोरसे कमी पडले होते. त्यात बोरसे यांच्यावर देखील हल्ला होण्याची भीती होती. मात्र, त्यांनी जिवाची पर्वा न करता आरोपींना पकडून ठेवल्याने त्यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.