पाण्याच्या टँकरखाली चिरडून पादचारी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 18:47 IST2020-09-26T18:47:04+5:302020-09-26T18:47:20+5:30
असोदा येथील घटना : चालक फरार

पाण्याच्या टँकरखाली चिरडून पादचारी ठार
जळगाव : पाण्याच्या टँकरखाली आल्याने माधव तोताराम पाटील ( ५२रा. ढंढोरे नगर, असोदा) हे पादचारी ठार झाल्याची घटना शनिवारी दुपारी असोदा, ता. जळगाव येथे घडली. या घटनेनंतर चालक लगेच पसार झाला. दरम्यान, यावेळी मोठा जमाव जमल्याने तणाव निर्माण झाला होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धनराज जनार्दन सरोदे यांच्या मालकीचे उदय वाँटर सप्लायर्सचे पाण्याचे टँकर शनिवारी दुपारी असोदा गावात पाणी पोहोचविण्यासाठी आलेले होते. बसस्थानक परिसरात हे टँकर आले असता तेथून पायी जात असलेल्या माधव तोताराम पाटील यांना चालकाने जोरदार धडक दिली. यात ते मागील चाकाखाली आले. त्यांच्या डोक्याला जबर मार बसल्याने ते जागीच गतप्राण झाले. दरम्यान, यावेळी ग्रामस्थ धावून आल्यानंतर चालक तेथून पसार झाला. दरम्यान , माधव पाटील हे एका हॉटेलमध्ये कारागीर होते. माधव पाटील यांच्या पश्चात पत्नी, शेत मजूर असलेला दिव्यांग मुलगा, मुलगी, जावई असा परिवार आहे.