शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

पालकांनो वेळीच लक्ष द्या; आपला मुलगा सतत एकटा राहतो, भाषा विकासाला विलंब होतो का?

By विजय.सैतवाल | Updated: April 1, 2023 16:18 IST

२ एप्रिल हा जागतिक ऑटिझम जनजागृती दिवस म्हणून साजरा केला जातो. या अवस्थेविषयी जनजागृती केली जाते, यासोबत पालकांनीही सजग होणे आवश्यक असल्याचा सल्ला दिला जात आहे.

जळगाव : शिकलेले शब्द, बडबडीचे आवाज किंवा सामाजिक कौशल्ये विसरणे, नजर देणे टाळणे,  सतत एकटे रहाणे इतर लोकांच्या भावना समजून घेण्यात अडचण येणे,  भाषाविकासाला विलंब लागणे, अशी लक्षणे आपल्या मुलांमध्ये आढळून आल्यास वेळीच लक्ष द्या. कारण ही लक्षणे ‘ऑटिझम’ (स्वमग्नता) या मेंदूच्या वेगळ्या अवस्थेची आहे. त्यांचे जलद निदान व उपचार झाल्यास आपली मुले त्यातून बाहेर पडू शकतात. 

२ एप्रिल हा जागतिक ऑटिझम जनजागृती दिवस म्हणून साजरा केला जातो. या अवस्थेविषयी जनजागृती केली जाते, यासोबत पालकांनीही सजग होणे आवश्यक असल्याचा सल्ला दिला जात आहे. ऑटिझम हा आजार नसून ती मेंदूची अशी अवस्था आहे, ज्यामध्ये व्यक्तीचे बोलणे संवाद साधणे, वागणे आणि काही वर्तने समाजात सामान्य मानल्या जाणाऱ्या वर्तनांपेक्षा वेगळे असू शकतात. ऑटिझम ही एक ‘न्यूरो डाएव्हर्जन्स’ (मानसिक विभिन्नता) म्हणजेच मेंदूची काम करण्याची वेगळी पध्दती, असे म्हटले जाते. 

मेंदूच्या पेशींची जोडणी वेगळ्या प्रकारचीऑटिझम हा न्युरो डेव्हलेपमेंटल डिसऑर्डर आहे. त्याची निश्चित कारण अजूनतरी समजू शकलेली नाही. गर्भावस्थेपासून या मुलांच्या मेंदूच्या पेशींची जोडणी वेगळ्या प्रकारची असल्याने मेंदूची वेगळी कार्यप्रणाली दिसून येते.  सर्वसाधारण मुलं जेव्हा इतर लोक जे बोलतात, वागतात त्याला समजून घेऊन त्याला प्रतिसादात्मक कृती करतात त्यासाठी आवाज, शब्द आणि हालचालीचा वापर करतात. पण ऑटीझम झालेल्या मुलांमध्ये या जाणिवा तितक्याशा विकसित झालेल्या नसतात म्हणूनच त्यांच्या वागण्यामध्ये वेगळेपणा जाणवतो. 

मिळून-मिसळून खेळण्यासाठी अनुत्सकतासंवाद सुरु कसा करावा आणि तो पुढे कसा न्यावा हे ऑटीझम झालेल्या मुलांना कळत नाही. या समस्यांमुळे ऑटिझम झालेली मुलं इतर मुलांमध्ये मिळून-मिसळून खेळण्यासाठी उत्सुक नसतात. 

मुलींपेक्षा मुलांमध्ये चार पटीने अधिक प्रमाणऑटीझमचे प्रमाण मुलींपेक्षा मुलांमध्ये चार पटीने अधिक असते. विशेष म्हणजे सर्व प्रदेशातील तसेच सर्व आर्थिक-सामाजिक स्थरातील मुलांमध्ये ऑटीझम आढळतो. 

बहुतेक मुलांचे निदान वयाच्या चौथ्या वर्षानंतर ऑटिझमचे निदान वयाच्या दुसऱ्या वर्षीच केले जाऊ शकते, तरीही बहुतेक मुलांचे निदान वयाच्या चौथ्या वर्षानंतर होते. 

जलद उपचार चांगल्या भवितव्याची गुरुकिल्लीआपल्याला जरी ऑटिझमची कारणे माहीत नसली तरी जलद निदान आणि उपचार ही मुलांच्या चांगल्या भवितव्याची गुरुकिल्ली आहे हे मात्र निश्चित आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

विकासात्मक आणि वर्तनात्मक पद्धतींचा वापर जर लवकरात लवकर मिळणाऱ्या उपचार सेवेमध्ये समाविष्ट केला तर सामाजिक संभाषण संवाद कौशल्य यांच्यामध्ये नक्कीच सुधारणा होऊ शकते. विशिष्ट थेरपीमुळे ऑटीझम झालेली मुलं ही चांगल्या तर्‍हेने आयुष्य जगू शकतात. फारच अवघड वर्तन दिसत असेल तर केवळ काही स्थितींमध्येच या समस्येवर औषधोपचारांची आवश्‍यकता पडू शकते. - डॉ. अविनाश भोसले, बालरोग तज्ज्ञ, जळगाव

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव