शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पालकांनो वेळीच लक्ष द्या; आपला मुलगा सतत एकटा राहतो, भाषा विकासाला विलंब होतो का?

By विजय.सैतवाल | Updated: April 1, 2023 16:18 IST

२ एप्रिल हा जागतिक ऑटिझम जनजागृती दिवस म्हणून साजरा केला जातो. या अवस्थेविषयी जनजागृती केली जाते, यासोबत पालकांनीही सजग होणे आवश्यक असल्याचा सल्ला दिला जात आहे.

जळगाव : शिकलेले शब्द, बडबडीचे आवाज किंवा सामाजिक कौशल्ये विसरणे, नजर देणे टाळणे,  सतत एकटे रहाणे इतर लोकांच्या भावना समजून घेण्यात अडचण येणे,  भाषाविकासाला विलंब लागणे, अशी लक्षणे आपल्या मुलांमध्ये आढळून आल्यास वेळीच लक्ष द्या. कारण ही लक्षणे ‘ऑटिझम’ (स्वमग्नता) या मेंदूच्या वेगळ्या अवस्थेची आहे. त्यांचे जलद निदान व उपचार झाल्यास आपली मुले त्यातून बाहेर पडू शकतात. 

२ एप्रिल हा जागतिक ऑटिझम जनजागृती दिवस म्हणून साजरा केला जातो. या अवस्थेविषयी जनजागृती केली जाते, यासोबत पालकांनीही सजग होणे आवश्यक असल्याचा सल्ला दिला जात आहे. ऑटिझम हा आजार नसून ती मेंदूची अशी अवस्था आहे, ज्यामध्ये व्यक्तीचे बोलणे संवाद साधणे, वागणे आणि काही वर्तने समाजात सामान्य मानल्या जाणाऱ्या वर्तनांपेक्षा वेगळे असू शकतात. ऑटिझम ही एक ‘न्यूरो डाएव्हर्जन्स’ (मानसिक विभिन्नता) म्हणजेच मेंदूची काम करण्याची वेगळी पध्दती, असे म्हटले जाते. 

मेंदूच्या पेशींची जोडणी वेगळ्या प्रकारचीऑटिझम हा न्युरो डेव्हलेपमेंटल डिसऑर्डर आहे. त्याची निश्चित कारण अजूनतरी समजू शकलेली नाही. गर्भावस्थेपासून या मुलांच्या मेंदूच्या पेशींची जोडणी वेगळ्या प्रकारची असल्याने मेंदूची वेगळी कार्यप्रणाली दिसून येते.  सर्वसाधारण मुलं जेव्हा इतर लोक जे बोलतात, वागतात त्याला समजून घेऊन त्याला प्रतिसादात्मक कृती करतात त्यासाठी आवाज, शब्द आणि हालचालीचा वापर करतात. पण ऑटीझम झालेल्या मुलांमध्ये या जाणिवा तितक्याशा विकसित झालेल्या नसतात म्हणूनच त्यांच्या वागण्यामध्ये वेगळेपणा जाणवतो. 

मिळून-मिसळून खेळण्यासाठी अनुत्सकतासंवाद सुरु कसा करावा आणि तो पुढे कसा न्यावा हे ऑटीझम झालेल्या मुलांना कळत नाही. या समस्यांमुळे ऑटिझम झालेली मुलं इतर मुलांमध्ये मिळून-मिसळून खेळण्यासाठी उत्सुक नसतात. 

मुलींपेक्षा मुलांमध्ये चार पटीने अधिक प्रमाणऑटीझमचे प्रमाण मुलींपेक्षा मुलांमध्ये चार पटीने अधिक असते. विशेष म्हणजे सर्व प्रदेशातील तसेच सर्व आर्थिक-सामाजिक स्थरातील मुलांमध्ये ऑटीझम आढळतो. 

बहुतेक मुलांचे निदान वयाच्या चौथ्या वर्षानंतर ऑटिझमचे निदान वयाच्या दुसऱ्या वर्षीच केले जाऊ शकते, तरीही बहुतेक मुलांचे निदान वयाच्या चौथ्या वर्षानंतर होते. 

जलद उपचार चांगल्या भवितव्याची गुरुकिल्लीआपल्याला जरी ऑटिझमची कारणे माहीत नसली तरी जलद निदान आणि उपचार ही मुलांच्या चांगल्या भवितव्याची गुरुकिल्ली आहे हे मात्र निश्चित आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

विकासात्मक आणि वर्तनात्मक पद्धतींचा वापर जर लवकरात लवकर मिळणाऱ्या उपचार सेवेमध्ये समाविष्ट केला तर सामाजिक संभाषण संवाद कौशल्य यांच्यामध्ये नक्कीच सुधारणा होऊ शकते. विशिष्ट थेरपीमुळे ऑटीझम झालेली मुलं ही चांगल्या तर्‍हेने आयुष्य जगू शकतात. फारच अवघड वर्तन दिसत असेल तर केवळ काही स्थितींमध्येच या समस्येवर औषधोपचारांची आवश्‍यकता पडू शकते. - डॉ. अविनाश भोसले, बालरोग तज्ज्ञ, जळगाव

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव