शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
3
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
4
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
5
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
6
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
7
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
8
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
9
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
10
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
11
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
12
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
13
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
14
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
15
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
16
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
17
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
18
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
19
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
20
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन

खान्देशात पावणेदोन लाख शेतकºयांनी उतरविला पीक विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 12:27 AM

जळगाव/धुळे/ नंदुरबार : शेवटच्या क्षणापर्यंत शेतकºयांची धावपळ, बॅँका, कृषी विभागाच्या मदतीमुळे अडचणी दूर

ठळक मुद्दे जळगाव, धुळे, नंदुरबारातील शेतकºयांचा समावेशबँकामध्ये होती गर्दीमुदत वाढ मिळण्याची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव / धुळे / नंदुरबार : पंतप्रधान पीक विमा हप्ता भरण्याच्या शेवटच्या दिवशी ३१ जुलै रोजी जिल्हाभरातील बॅँकांमध्ये मोठी गर्दी झाली होती. खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात जवळपास पावणेदोन लाख शेतकºयांनी पीक विमा उतरविल्याची माहिती आहे.जळगाव जिल्ह्यात ६८ हजार शेतकºयांनी पीक विमा उतरविला. धुळे जिल्ह्यात अंदाजे ७० हजार तर नंदुरबार जिल्ह्यात यंदा ४२ हजार शेतकºयांनी पीक विमा काढल्याची माहिती आहे़पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची ३१ जुलै अखेरची मुदत होती. यासाठी ३० जुलै रोजी रविवारीदेखील बँका सुरू ठेवण्यात आल्या होत्या.जळगाव जिल्ह्यात ६८ हजार ३८४सोमवारी अखेरच्या दिवशी जळगाव जिल्ह्यातील शेतकºयांची संख्या कृषी विभागाकडून एकत्रित करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यात ९० हजार ६७३.२९ हेक्टरसाठी ६८ हजार ३८४ शेतकºयांनी पीक विमा उतरविला.मुदतवाढीचा प्रतीक्षाया योजनेचा जास्तीत जास्त शेतकºयांना लाभ व्हावा यासाठी कृषी विभागाच्या वतीने मुदतवाढीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. मात्र अद्याप त्याला मंजुरी मिळालेली नाही. मुदतवाढ मिळण्याची प्रतीक्षा केली जात आहे.दरम्यान, सोमवारी आलेली आकडेवारी ही उद्या आणखी बदलण्याची शक्यता आहे. कारण अखेरचा दिवस असल्याने जिल्हा बँक रात्री उशिरापर्यंत हे अर्ज स्वीकारणार असल्याने १ आॅगस्ट रोजी नेमकी आकडेवारी स्पष्ट होईल, असेही सांगण्यात आले.धुळ्यात शेवटच्या दिवशी गर्दीपीक विमा हप्ता भरण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी जिल्हाभरातील बॅँकांमध्ये मोठी गर्दी झाली होती. कोणी शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा व राष्टÑीयीकृत बॅँकांनी विशेष व्यवस्था केली होती. कृषी विभागाच्या कर्मचाºयांनी बॅँकांमध्ये जाऊन अर्ज भरण्यास शेतकºयांना मदत केली. जिल्हा बॅँकेच्या धुळे व नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यात एकूण ९० शाखांमध्ये सर्व काउंटर्सवर पीक विमा हप्त्याची रक्कम स्वीकारण्यात येत होती.उशिरापर्यंत थांबून कामकाजजिल्हा बॅँकेचे धुळे व नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यात सर्वाधिक कर्जदार शेतकरी सभासद आहेत. त्यामुळे त्यांची गैरसोय टाळण्यासाठी आपल्या सर्व ९० शाखा कार्यालयांमध्ये कोणत्याही काउंटरवर पीक विमा हप्त्याची रक्कम स्वीकारण्याच्या सूचना शाखाधिकाºयांना यापूर्वीच देण्यात आल्या होत्या, अशी माहिती जिल्हा बॅँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.अर्जासाठी कर्मचाºयांची मदतशेवटच्या दिवशी प्रत्यक्ष बॅँकांमध्ये काय परिस्थिती आहे, यासाठी आपण स्वत: पथकासह शिंदखेडा तालुक्यातील शिंदखेडा, चिमठाणे, वीरदेल आदी विविध ठिकाणी असलेल्या बॅँकांमध्ये जाऊन माहिती घेतली.कृषी विभागाचे कर्मचारी बॅँकांमध्ये थांबून शेतकºयांना अर्ज भरण्यासाठी तसेच काही अडचण उद्भवल्यास मार्गदर्शनासाठी उपस्थित होते, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे यांनी दिली.पीक विम्यास प्राधान्यजिल्ह्यात राष्टÑीयकृत बॅँकांमध्येही शेतकºयांची पीक विमा हप्ता भरण्यासाठी तुरळक गर्दी होती. शेवटचा दिवस असल्याने या कामास प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे कामकाज सुरू असल्याने कुठेही शेतकºयांना अडचण आली नाही, अशी माहिती अग्रणी (लीड) बॅँकेचे व्यवस्थापक प्रदीप गिलाणकर यांनी दिली.३१ जुलै हा अनेक कारणांसाठी सर्वांच्याच लक्षात राहिल. कारण आयकर रिटर्नसाठी ही शेवटची तारीख होती. शेतकºयांच्या पीक विम्यासाठी ३१ जुलैची डेडलाईन होती. तसेच सध्या नवमतदारांची नोंदणी सुरू आहे. त्यासाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीखही ३१ जुलैच होती.