शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

वृद्ध होती तरणे रे....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 13:26 IST

‘निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, एकनाथ, नामदेव, तुकाराम’ या संतांचा जयघोष आजही अनेक शतकानंतर सर्वार्थाने केला जातो. हे खूपच वैशिष्टपूर्ण ...

‘निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, एकनाथ, नामदेव, तुकाराम’ या संतांचा जयघोष आजही अनेक शतकानंतर सर्वार्थाने केला जातो. हे खूपच वैशिष्टपूर्ण आहे. त्यातील मौलिक अर्थ असा आहे की, हे विश्वची माझे घर । ऐसी मती जयाची स्थीर । किंबहुना चराचर । आपण जाहला ।। या ज्ञानेश्वरीतील विशाल विचारांचा आदर्श घेत संत परंपरा अनेक आक्रमणे व आघात स्वीकारत आपले अस्त्तित्व अबाधित ठेवून जन प्रबोधन करीत शतकानुशतके विठ्ठल भक्तीचा संदेश देत आहे.‘ज्ञानदेवे रचिला पाया ...... तुका झालासे कळस’ या अभंगातील संत इमारत अनेक शतकांच्या वैचारिक पातळीत खोलवर वारकरी तत्व रुजवणारी आहे. आजही विठ्ठल भक्तीचा आनंद यात्रेत अर्थात पंढरीच्या वारीत अनेक धर्म, पंथ, जाती ह्या एकरूप झालेल्या असतात. या पंढरीच्या वारीचे अनेक संतांनी वर्णन केले आहे. त्यात संत नामदेवराय सांगतात की,पंढरीची वारी जयाचिये कुळी । त्याची पायधुळी लागो मज ।।संत ज्ञानोबाराय म्हणतात की,माझे जिवीची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ।।आणि त्याच वारीचे वर्णन संत तुकोबाराय करतात की,उदंड पाहिले, उदंड ऐकिले । उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ।।ऐसी चंद्रभागा, ऐसे भिमातीर । ऐसा विटेवर देव कोठे ।।ऐसे संत जन, ऐसे हरीदास । ऐसा नामघोष सांगा कोठो ।।याप्रमाणे वारीचे श्रेष्ठत्व विविध संतांनी अधोरेखित केले आहे.आता पंढरपूरकडे जाण्यासाठी वारकरी आतुर झालेले आहेत. म्हणून पंढरीची वारी आता आंतरराष्टÑीय वारी झालेली आहे. वारकरी आपले भौतिक वैभव विसरून वारीसाठी तळमळ करीत आहेत. म्हणूनच संपदा सोहळा नावडे मनाला। लागला टकळा पंढरिचा ।।आपल्या खान्देशातून अनेक दिंड्यांची परंपरा कायम आहे. आजही अनेक दिंडी सोहळे पंढरपूरला जात असतात.पंढरीच्या वारीचे वैशिष्ट- ज्याला भूक लागत नाही, त्याने वारीत यावे.- ज्याला झोप लागत नाही, त्याने वारीत यावे.-ज्याला शारीरिक व्याधी आहे, त्याने वारीत यावे.मंडळी आपल्या घरी अतिशय सुग्रास भोजन असूनही ज्यांना भूक लागत नाही अशी माणसं वारीत २-२ भाकरी खातात. आणि घरी झोपेची गोळी घेतल्याशिवाय झोपत नाही. अशी माणसं वारीत दिवसा विसाव्यामध्ये घोरतात. आणि विशेष म्हणजे विविध शारीरिक व्याधी, दु:ख, विसरून वारीतील लोक अक्षरश: नाचतात ! फुगड्या खेळतात, ‘वृद्ध होती तरणे रे’ याप्रमाणे वारीमध्ये कायिक, वाचिक, मानसिक तपश्चर्या घडते.-विजय नामदेव भामरे, अध्यक्ष, सुकेश्वर देवस्थान.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव