शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

बीएचआरच्या नावाखाली राजकीय सुपारी घेऊन बहुजन लोकप्रतिनिधींना संपविण्याचा प्रयत्न - आमदार मंगेश चव्हाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 20:06 IST

बीएचआर पतसंस्था अपहार प्रकरणाच्या सुनावणीवेळी आमदार मंगेश चव्हाण यांच्याशी झालेल्या व्यवहाराचा उल्लेख आल्याचे समोर आल्यानंतर या विषयी आमदार मंगेश चव्हाण यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी वरील दावा करीत संबंधितांवर आपण अब्रुनुकसानाचा दावा दाखल करणार असल्याचेही सांगितले. 

जळगाव- बीएचआर पतसंस्था अपहार प्रकरणाशी कोणताही संबंध नसताना त्यात आपल्याला गोवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप आमदार मंगेश चव्हाण यांनी शनिवारी जळगावात केला. बीएचआर या गोंडस नावाखाली राजकीय सुपारी घेऊन तसेच सरकारी यंत्रणेला हाताशी धरत बहुजन लोकप्रतिनिधींना संपविण्याचा हा प्रयत्न असल्याचेही आमदार चव्हाण या वेळी म्हणाले. 

बीएचआर पतसंस्था अपहार प्रकरणाच्या सुनावणीवेळी आमदार मंगेश चव्हाण यांच्याशी झालेल्या व्यवहाराचा उल्लेख आल्याचे समोर आल्यानंतर या विषयी आमदार मंगेश चव्हाण यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी वरील दावा करीत संबंधितांवर आपण अब्रुनुकसानाचा दावा दाखल करणार असल्याचेही सांगितले. 

कोणतीही ‘सेटलमेंट’ न करता पूर्ण कर्ज भरलेजिल्ह्यातील विजेचा प्रश्न असो की अवैध धंदे असो यांच्याविषयी आवाज उठविल्याने आक्रमकता वाढत असल्याचे पाहून मला संपविण्याचा डाव सुरू असल्याचा दावा या वेळी आमदार चव्हाण यांनी केला. ११ ऑगस्ट रोजी बीएचआर प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान माझ्या नावाचा उल्लेख आलेला नसताना तशा बातम्या छापून आल्या. प्रत्यक्षात बीएचआर, सुनील झवर यांच्याशी माझा कोणताही संबंध नसताना विनाकारण नाव गोवण्यात येत असल्याचे ते म्हणाले. २०१२मध्ये मी बीएचआर पतसंस्थेतून कर्ज घेतले व ते २०१४मध्येच कोणतीही तडजोड न करता पूर्ण कर्ज भरल्याचे त्यांनी सांगितले.  

चौकशीला घाबरुन पळणारा आमदार नाहीतपास यंत्रणेने माझ्याशी संबंधित काही गैरव्यवहार झाले असल्यास तशी चौकशी करावी व काही आढळल्यास कारवाई करावी, असे आव्हानही त्यांनी दिले. चौकशी होणार म्हणून घाबरुन पळून जाणारा व लांब राहणारा आमदार मी नाही, असाही टोला त्यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला. या प्रकरणाची माहिती मी मागविली असून ती पूर्ण मिळालेली नाही. ती मिळाल्यानंतर विधीमंडळात सादर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

जळगावातच कारवाई का?बीएचआर पतसंस्था ही मल्टीस्टेट संस्था असल्याने तिचे कार्यक्षेत्र देशभर आहे. असे असताना जळगाव जिल्ह्यातीलच मंडळींवर कारवाई का केली जात आहे, इतर ठिकाणी का कारवाई होत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :JalgaonजळगावMLAआमदारBJPभाजपा