शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर
2
ठरले! स्लीपर वंदे भारत ‘या’ तारखेपासून प्रवासी सेवेत, तिकीट दरही आले; PM मोदी करणार लोकार्पण
3
आयटी रिटर्नची मुदत संपली तरी आशा कायम! 'या' मार्गाने मिळवू शकता रखडलेला टॅक्स रिफंड
4
शौचालयाच्या खाली असलेल्या पाण्याच्या मुख्य पाईपलाईनमध्ये गळती, दूषित पाण्यामुळे ७ जणांचा मृत्यू, १४९ जण गंभीर; अधिकारी निलंबित
5
बाथरुममध्ये गेली अन् जीव गमावून बसली; वाढदिवसाच्या आदल्या दिवशी तरुणीसोबत काय घडलं?
6
खामेनेईंची सत्ता धोक्यात! इराणमध्ये लोक रस्त्यावर का उतरले? जाणून घ्या कारण...
7
नील सोमय्यांविरोधात दोन्ही ठाकरे, काँग्रेसने उमेदवारच दिला नाही?, किरीट सोमय्यांनी मानले देवाचे आभार
8
Team India ODI Schedule 2026: रोहित-विराटची क्रेझ! नव्या वर्षात टीम इंडिया किती वनडे खेळणार?
9
वॉरेन बफेंची 'एनर्जी मशीन' आज पासून अ‍ॅक्शन मोडमध्ये, कोण आहेत ग्रेग एबेल, ज्यांच्या हाती आलीये बर्कशायर हॅथवेची धुरा
10
चमत्कार! ११ वर्षांच्या मुलावरून गेले मालगाडीचे ४० डबे, साधं खरचटलंही नाही
11
जळगावमध्ये ठाकरेंच्या उमेदवाराची माघार अन् शिंदेसेनेचं खातं उघडलं! आमदार पुत्र गौरव सोनवणे बिनविरोध
12
भारतीय अर्थव्यवस्थेची भरारी! बँकांचा पाया भक्कम, एनपीए घटला; RBI च्या अहवालात नेमकं काय म्हटलंय?
13
वडील आणि भावाला गमावलं, दु:खाचा डोंगर कोसळला, पण खचला नाही, आता कमबॅकसाठी सज्ज झालाय हा भारतीय गोलंदाज
14
Malegaon Election 2026: 'इस्लाम' पार्टीने खाते उघडले; मुनिरा शेख बिनविरोध निश्चित, अपक्ष उमेदवाराने घेतली माघार
15
Ai व्हिडिओद्वारे 'या' भारतीय युट्यूब चॅनेलने एका वर्षात केली तब्बल 38 कोटी रुपयांची कमाई
16
Malegaon Municipal Corporation Election : मालेगाव मनपा उमेदवारी छाननीत १५ अर्ज ठरले बाद; अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम
17
अखेर मुंबईत ‘या’ ठिकाणी ठाकरे बंधू आमने-सामने; मनसे-उद्धवसेनेने अर्ज भरले, कोण माघार घेणार?
18
Vastu Tips: २०२६ मध्ये नशीब सोन्यासारखं चमकेल, फक्त कॅलेंडरच्या प्रत्येक पानावर करा 'हा' छोटा बदल!
19
हातात बिअरची बाटली घेऊन गोव्यातील रस्त्यावर फिरताना दिसली सारा तेंडुलकर, फोटो झाला व्हायरल   
20
रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 'या' कंपनीचे आहेत १७ लाखांपेक्षा अधिक शेअर्स; मोठी अपडेट, आता शेअरमध्ये हेवी बाईंग
Daily Top 2Weekly Top 5

गिरणा धरण रब्बी आवर्तनात निम्मे खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 01:51 IST

संजय हिरे खेडगाव, ता. भडगाव : गिरणा धरणातून मागील तीन महिने रब्बीत सिंचनासाठी आवर्तन देण्यात आले. यंदा २१५०० द.ल.घ.फु. ...

संजय हिरेखेडगाव, ता.भडगाव : गिरणा धरणातून मागील तीन महिने रब्बीत सिंचनासाठी आवर्तन देण्यात आले. यंदा २१५०० द.ल.घ.फु. म्हणजे १०० टक्के जलसाठा झाला होता. आजमितीस धरणात १२५९१ द.ल.घ.फु. इतका अर्थात मृतसाठा धरुन जवळजवळ ५०-५१ टक्के जलसाठा शिल्लक आहे.रब्बीसाठी गिरणा लाभक्षेत्रातील पाझंण, जामदा डावा-उजवा व दहीगाव कालव्यांना तीन आवर्तन देण्यात आले. ५ डिसेंबर रोजी गिरणा धरणातून आवर्तन सुरू झाले. रब्बी आवर्तनाचा कालावधी २८ फेब्रुवारीपर्यंत असतो. यात तीन आवर्तन देण्यात आले जवळजवळ ८-९ हजार द.ल.घ.फु. जलसाठा यात वापरला गेला. रब्बीसाठी सुरू असलेले आवर्तन दहिगाव व जामदा उजवा कालव्यातून थांबविण्यात आले आहे तर जामदा डावा व पांझण कालव्याचे आवर्तन शेवटच्या टप्प्यात आहे. दोन-चार दिवसात आवर्तनाचा शेवट होईल. गिरणा धरणातून मंगळवारपासून आवर्तनाचे पाणी कमी करण्यात येवून ५०० क्युसेसने सोडले जात आहे. ते जामदा डावा कालव्यातून तळई फाट्याच्या शेवटच्या सिंचनासाठी वापरले जात आहे. ते आटोपताच गिरणा धरणातून आवर्तन बंद होईल.उन्हाळी हंगाच्या नियोजनाअभावी पाणी मागणीत घटमागील व यावर्षी असे लागोपाठ दोन वर्षात गिरणा धरणात १०० टक्के जलसाठा झाला. त्याचप्रमाणे गिरणा लाभक्षेत्रातदेखील चांगला पावसाळा झाल्याने, विहिरींना जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत पाणी टिकेल, अशी स्थिती होती. हे पाहता पालकमंत्री, पाटबंधारे विभाग, कालवा समिती यांनी उन्हाळी हंगामाचे नियोजन करायला हवे होते. उन्हाळ्यात विहीरींचे पाणी कमी होते.यामुळे कालव्याचे पाणी मागणीत निश्चितच वाढ अपेक्षित होती.निदान मागील वर्षाच्या अनुभवानुसार तरी यावर्षी उन्हाळी हंगामाचे नियोजन करण्याची गरज होती.परंतु मागील पानावरुन पुढे चालू या पध्दतीने रब्बीचाच २८फेब्रुवारीचाच पाढा वाचला गेला.मागील वर्षी २७००० हेक्टरवर क्षेत्र भिजल्याचे (पाणी मागणी अर्ज आल्याचे) सांगितले गेले. यावर्षी तीस-या पाण्यानंतरची शाखा परत्वे मागणी क्षेत्राची आकडेवारी उपलब्ध झाली नसली तरी २१०००-२२००० हजार हेक्टर क्षेत्रासाठी पाणी मागणी आजवर झाल्याचा अंदाज आहे. गिरणा धरणाची रब्बीत एक लाख हेक्टरवर प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष सिंचनक्षमता असतांना दुप्पट -तिप्पट पाणी मागणी का घटली? यावरुन उन्हाळी हंगामाचे नियोजन सुरवातीलाच व्हायला हवे होते. याचा विचार नियोजन कर्त्यांनी करायला हवा.५० टक्के पाण्याचे काय करायचे?गिरणा धरणात जवळजवळ ५० टक्के जलसाठा शिल्लक आहे. पुढील चार-पाच महिने पिण्यासाठी राखीव ठेवूनही पाणी शिल्लक राहणार आहे. गहू, हरभरा आता पक्व झालेला आहे. पाच तालुक्यात उशिराने पेरणी झालेल्या पिकांना पाण्याची गरज खरोखर आहे काय?ते क्षेत्र किती? त्या शेतक-यांनी पाणी मागणी अर्ज भरलेले आहेत काय? हे तपासणे आवश्यक आहे. विहिरींची सोय असलेल्यांनीच रब्बी-उन्हाळी ज्वारी, बाजरी घेण्याची रिस्क घेतली आहे. यातील निन्म्या शेतक-यांनी पाणी मागणी अर्जच भरलेले नाहीत. कालव्यांना सोडलेल्या पाण्याचा आपसुक लाभ या शेतक-यांना होतो मग अर्ज भरण्याची तसदी ते घेत नाही.आता गिरणा धरणातील शिल्लक जलसाठा मागे ठेवायचा की या शेतक-यांसाठी सोडायचा? का २००६-२००८ या सालाप्रमाणे मे-जून असा उन्हाळी कपाशीचा फाँर्म्युला अंमलात आणायचा त्याप्रमाणे नियोजन आता करणे गरजेचे आहे.

टॅग्स :WaterपाणीBhadgaon भडगाव