शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

Sharad Pawar : "संविधानाची चिरफाड करण्याचा भाजपचा डाव"; शरद पवारांचा घणाघाती आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 13:45 IST

Maharashtra Assembly Election 2024 And NCP Sharad Pawar : भाजपला संविधानाची चिरफाड करायची होती. म्हणून त्यांना लोकसभेत 400 खासदार निवडून आणायचे होते, असा घणाघाती आरोप शरद पवारांनी केला.

प्रशांत भदाणे 

भाजपला संविधानाची चिरफाड करायची होती. म्हणून त्यांना लोकसभेत 400 खासदार निवडून आणायचे होते, असा घणाघाती आरोप शरद पवारांनी केला. ते जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथे आयोजित प्रचार सभेत बोलत होते. दरम्यान, संविधानाची चिरफाड करण्याचा भाजपचा हा डाव आम्ही हाणून पाडला, असेही ते म्हणाले.

या सभेला विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, पारोळ्याचे शरद पवार गटाचे उमेदवार डॉ. सतीश पाटील, काँग्रेसच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. 

शरद पवार पुढे म्हणाले की, या देशाला एकसंघ ठेवण्याचं काम संविधानाने केले. हेच संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलंय. हा देश आजपर्यंत एकसंघ राहिला तो संविधानामुळे. पण हेच संविधान बदलण्याचा प्रयत्न भाजपने केला. लोकसभेत आम्ही याच संदर्भात जागृती केली. इंडिया नावाची आघाडी काढली. घटनेची चिरफाड करण्याचा त्यांचा डाव आम्ही हाणून पाडला, असं त्यांनी सांगितलं.

नेमकं काय म्हणाले शरद पवार?

महाराष्ट्राची निवडणूक आलीय, आणि या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा कारभार कुणी आणि कसा करायचा याचा निर्णय घ्यायचाय.

महाराष्ट्राच्या राजकारणाला तुम्ही शक्ती द्याल.

घटना बदलण्याचा त्यांचा प्रयत्न होता, म्हणून लोकसभेत 400 खासदार मोदींना हवे होते.

या देशाला एकसंघ ठेवण्याचं काम संविधानाने केले.

हेच संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलं.

हा देश आजपर्यंत एकसंघ राहिला तो संविधनामुळे.

लोकसभेत आम्ही याच संदर्भात जागृती केली.

इंडिया नावाची आघाडी काढली.

घटनेची चिरफाड करण्याचा त्यांचा डाव आम्ही हाणून पाडला.

नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या मदतीने त्यांनी सत्ता स्थापन केली.

आज देशातल्या शेतकऱ्यांची, तरुणांची आज काय अवस्था आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत.

सोन्यासारखा जीव देण्याचा का त्यांनी निर्णय घेतला असावा, कारण शेतकऱ्यांच्या मालाला किंमत नाही.

माझ्याकडे देशाच्या कृषी खात्याचं काम होतं, तेव्हा यवतमाळ जिल्ह्यात एका शेतकऱ्याने आत्महत्या केली तेव्हा मला झोप आली नाही.

तेव्हा देशातल्या शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला.

हे करण्याची आवश्यकता होती, पण आज तिचं अवस्था असताना सरकार काहीही करायला तयार नाही.

आज देशात महिलांवर अत्याचार सुरू आहेत.

बदलापूरमध्ये लहान मुलांवर अत्याचार घडले, अशी किती तरी उदाहरण सांगता येतील.

लाडकी बहीण योजनेबद्दल हरकत नाही पण आज लाडक्या बहिणींची अवस्था काय?

9 हजार मुली बेपत्ता झाल्या आहेत, यासंदर्भात सरकार काय करतंय?

तरुणांची हीच अवस्था आहे.

आम्ही आमचं सरकार आलं तर पुढील पाच गोष्टी करणार.

लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर आम्हीही दर महिन्याला तीन हजार रुपये दिले जातील.

महिला आणि मुलींना एसटी प्रवास मोफत. 

शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करू, नियमित कर्ज फेडणाऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन अनुदान देऊ.

जातीनिहाय जनगणना करू.

बेरोजगार तरुणांना महिन्याला चार हजार देण्याचा प्रयत्न.

प्रत्येक व्यक्तीचा २५ लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा.

सतीश पाटलांनी थांबायचं की नाही हा निर्णय तुम्ही नाही पक्षाध्यक्ष म्हणून मी घेईल.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाJalgaonजळगाव