शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

Sharad Pawar : "संविधानाची चिरफाड करण्याचा भाजपचा डाव"; शरद पवारांचा घणाघाती आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 13:45 IST

Maharashtra Assembly Election 2024 And NCP Sharad Pawar : भाजपला संविधानाची चिरफाड करायची होती. म्हणून त्यांना लोकसभेत 400 खासदार निवडून आणायचे होते, असा घणाघाती आरोप शरद पवारांनी केला.

प्रशांत भदाणे 

भाजपला संविधानाची चिरफाड करायची होती. म्हणून त्यांना लोकसभेत 400 खासदार निवडून आणायचे होते, असा घणाघाती आरोप शरद पवारांनी केला. ते जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथे आयोजित प्रचार सभेत बोलत होते. दरम्यान, संविधानाची चिरफाड करण्याचा भाजपचा हा डाव आम्ही हाणून पाडला, असेही ते म्हणाले.

या सभेला विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, पारोळ्याचे शरद पवार गटाचे उमेदवार डॉ. सतीश पाटील, काँग्रेसच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. 

शरद पवार पुढे म्हणाले की, या देशाला एकसंघ ठेवण्याचं काम संविधानाने केले. हेच संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलंय. हा देश आजपर्यंत एकसंघ राहिला तो संविधानामुळे. पण हेच संविधान बदलण्याचा प्रयत्न भाजपने केला. लोकसभेत आम्ही याच संदर्भात जागृती केली. इंडिया नावाची आघाडी काढली. घटनेची चिरफाड करण्याचा त्यांचा डाव आम्ही हाणून पाडला, असं त्यांनी सांगितलं.

नेमकं काय म्हणाले शरद पवार?

महाराष्ट्राची निवडणूक आलीय, आणि या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा कारभार कुणी आणि कसा करायचा याचा निर्णय घ्यायचाय.

महाराष्ट्राच्या राजकारणाला तुम्ही शक्ती द्याल.

घटना बदलण्याचा त्यांचा प्रयत्न होता, म्हणून लोकसभेत 400 खासदार मोदींना हवे होते.

या देशाला एकसंघ ठेवण्याचं काम संविधानाने केले.

हेच संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलं.

हा देश आजपर्यंत एकसंघ राहिला तो संविधनामुळे.

लोकसभेत आम्ही याच संदर्भात जागृती केली.

इंडिया नावाची आघाडी काढली.

घटनेची चिरफाड करण्याचा त्यांचा डाव आम्ही हाणून पाडला.

नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या मदतीने त्यांनी सत्ता स्थापन केली.

आज देशातल्या शेतकऱ्यांची, तरुणांची आज काय अवस्था आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत.

सोन्यासारखा जीव देण्याचा का त्यांनी निर्णय घेतला असावा, कारण शेतकऱ्यांच्या मालाला किंमत नाही.

माझ्याकडे देशाच्या कृषी खात्याचं काम होतं, तेव्हा यवतमाळ जिल्ह्यात एका शेतकऱ्याने आत्महत्या केली तेव्हा मला झोप आली नाही.

तेव्हा देशातल्या शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला.

हे करण्याची आवश्यकता होती, पण आज तिचं अवस्था असताना सरकार काहीही करायला तयार नाही.

आज देशात महिलांवर अत्याचार सुरू आहेत.

बदलापूरमध्ये लहान मुलांवर अत्याचार घडले, अशी किती तरी उदाहरण सांगता येतील.

लाडकी बहीण योजनेबद्दल हरकत नाही पण आज लाडक्या बहिणींची अवस्था काय?

9 हजार मुली बेपत्ता झाल्या आहेत, यासंदर्भात सरकार काय करतंय?

तरुणांची हीच अवस्था आहे.

आम्ही आमचं सरकार आलं तर पुढील पाच गोष्टी करणार.

लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर आम्हीही दर महिन्याला तीन हजार रुपये दिले जातील.

महिला आणि मुलींना एसटी प्रवास मोफत. 

शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करू, नियमित कर्ज फेडणाऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन अनुदान देऊ.

जातीनिहाय जनगणना करू.

बेरोजगार तरुणांना महिन्याला चार हजार देण्याचा प्रयत्न.

प्रत्येक व्यक्तीचा २५ लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा.

सतीश पाटलांनी थांबायचं की नाही हा निर्णय तुम्ही नाही पक्षाध्यक्ष म्हणून मी घेईल.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाJalgaonजळगाव