शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकरी मदतीचा मुद्दा गाजला; कृषिमंत्री आधी म्हणाले, ‘नाही’ नंतर म्हणाले, ‘हो, प्रस्ताव आला’
2
आजचे राशीभविष्य, ४ डिसेंबर २०२५: अचानक धनप्राप्ती अन् विविध फायदे होतील, ज्याने आनंदित व्हाल
3
Orange Gate Tunnel: सोळा मजली उंच इमारतीइतक्या खोल, ७०० इमारतींखालून जाणार ऑरेंज गेट बोगदा
4
लंकादहन: भाजप-शिंदेसेनेतील वाद गाजला, सत्तापक्षांतील वादांचे निवडणुकीत झाले प्रदर्शन
5
Indigo Flights Issue: ...म्हणून इंडिगोची सेवा ढेपाळली; १०० पेक्षा जास्त विमाने झाली रद्द
6
राज्यात सरासरी ६७.६३% मतदान; तळेगाव दाभाडे तळात, तर कोल्हापुरातील मुरगूड अव्वल 
7
नवी मुंबईतील शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
8
मुंबईसह देशभर विमानतळांवर गोंधळ, २०० विमाने झाली रद्द; बोर्डिंग पास हाताने लिहिण्याची आली वेळ 
9
महामुंबईतील १९ आरएमसी प्लांट बंद, तीन उद्योगांची प्रत्येकी पाच लाखांची बँकहमी जप्त
10
महाडमध्ये दोन गटांतील राड्याप्रकरणी विकास गोगावलेंसह २० जणांवर गुन्हा, परस्परविरोधी तक्रारी दाखल
11
इंडिगोची दोन्ही विमाने रद्द; १२ तास ताटकळले संभाजीनगरकर
12
IND vs SA : मार्करमच्या सेंच्युरीच्या जोरावर द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम; ऐतिहासिक विजयासह साधला बरोबरीचा डाव
13
“माझ्या भावाला BJPशी मैत्री हवी, पण मुनीर भारताशी युद्ध…”; इम्रान खानची बहीण नेमके काय म्हणाली?
14
IND vs SA Turning Point Of The Match : ती एक चूक नडली! यशस्वीमुळे टीम इंडिया ठरली अपयशी
15
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
16
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
17
IND vs SA : पंचांनी चेंडू बदलून दिला, पण... KL राहुलनं कोणावर फोडलं पराभवाचं खापर?   
18
नगर पंचायत-परिषदा निवडणुकीचा मुद्दा संसदेत; सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र, म्हणाल्या...
19
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
20
अजय देवगनकडे या कंपनीचे १०००००० शेअर, आता कंपनीने  घेतला मोठा निर्णय; दिलाय 6000% चा बंपर परतावा!
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव येथे सामूहिक सामायिकने भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 13:29 IST

मनुष्याच्या कर्मानुसार मोक्षप्राप्ती - मुदीतप्रभाजी म.सा.

ठळक मुद्दे८५०हून अधिक समाजबांधव सहभागीभगवंतांची वाणी २६०० वर्षांनंतरही प्रासंगिक

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २६ - मनुष्य जीवन मिळाल्यानंतर व्यक्ती कसे कर्म करतो, यावर मोक्ष प्राप्ती अवलंबून असून जो भगवंताचा शिष्य नाही मात्र त्याने चांगले कर्म केले तर त्याला मोक्ष प्राप्ती होते, असे विचार महासतीजी मुदीतप्रभाजी म.सा. यांनी व्यक्त केले.भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवास २५ रोजी सकाळी सहपरिवार सामूहिक सामायिकने सुरुवात झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. गणपतीनगरातील रतनलाल बाफना स्वाध्याय भवनात सहपरिवार सामूहिक सामायिकचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. महासतीजी इंदूबालाजी म.सा., महासतीजी मुदीतप्रभाजी म.सा. आदी ठाणा १० यांच्या पावन सान्निध्यात झालेल्या समायिकमध्ये ८५०हून अधिक समाजबांधव सहभागी झाले होते.या वेळी भगवान महावीर यांच्या जीवन कार्याविषयी तसेच त्यांच्या भक्ती विषयी मार्गदर्शन करताना महासतीजी मुदीतप्रभाजी म.सा. यांनी भगवंतांविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.जो भगवंतांचा शिष्य आहे मात्र त्याचे कर्म चांगले नाही त्याला मोक्ष प्राप्ती शक्य नाही मात्र जो भगवंतांचा शिष्य नसूनही त्याचे कर्म चांगले असले तरी त्यास मोक्ष प्राप्ती होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. आपण भगवान महावीरांविषयी ऐकतो, मात्र त्यांचे ऐकत नाही, असे सांगून जीवनात भगवंताचे विचार अंमलात आणणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. भगवंतांची वाणी २६०० वर्षांनंतरही प्रासंगिक असून त्यांचे विचार अंगीकारा, असेही त्यांनी सांगितले.कंवरलाल संघवी यांनी गेल्या १८ वर्षांपासून दर रविवारी होणाऱ्या सामायिकबद्दल माहिती देत यात समाजबांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. या वेळी संघपती दलुभाऊ जैन, शाकाहार सदाचारचे प्रणेते रतनलाल बाफना, श्री सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीचे प्रमुख दिलीप गांधी, प्रवीण पगारिया, रिकेश गांधी, प्रितेश चोरडिया, प्रवीण छाजेड, आनंद चांदीवाल, संजय रेदासनी यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन कस्तुरचंद बाफना यांनी केले.२६ रोजी दुपारी ४.३० वाजता सद्भावना दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. धर्मनाथ जैन मंदिर ते खान्देश सेंट्रल मॉल या दरम्यान काढण्यात येणाºया या रॅलीद्वारे भगवंतांच्या जीवनाचा प्रचार व प्रसार करण्यासह बेटी बटाओ, रक्तदान, देहदान असे सामाजिक संदेशही दिले जाणार आहे. या सोबतच सहभागी दुचाकीस्वारांसाठी धार्मिक वेशभुषा स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धादेखील होणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव