शहरं
Join us  
Trending Stories
1
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
2
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
3
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
4
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
5
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
6
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
7
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
8
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
9
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
10
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
11
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
12
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
13
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
14
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
15
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
16
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
17
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
18
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
19
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
20
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 

जळगाव येथे सामूहिक सामायिकने भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 13:29 IST

मनुष्याच्या कर्मानुसार मोक्षप्राप्ती - मुदीतप्रभाजी म.सा.

ठळक मुद्दे८५०हून अधिक समाजबांधव सहभागीभगवंतांची वाणी २६०० वर्षांनंतरही प्रासंगिक

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २६ - मनुष्य जीवन मिळाल्यानंतर व्यक्ती कसे कर्म करतो, यावर मोक्ष प्राप्ती अवलंबून असून जो भगवंताचा शिष्य नाही मात्र त्याने चांगले कर्म केले तर त्याला मोक्ष प्राप्ती होते, असे विचार महासतीजी मुदीतप्रभाजी म.सा. यांनी व्यक्त केले.भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवास २५ रोजी सकाळी सहपरिवार सामूहिक सामायिकने सुरुवात झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. गणपतीनगरातील रतनलाल बाफना स्वाध्याय भवनात सहपरिवार सामूहिक सामायिकचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. महासतीजी इंदूबालाजी म.सा., महासतीजी मुदीतप्रभाजी म.सा. आदी ठाणा १० यांच्या पावन सान्निध्यात झालेल्या समायिकमध्ये ८५०हून अधिक समाजबांधव सहभागी झाले होते.या वेळी भगवान महावीर यांच्या जीवन कार्याविषयी तसेच त्यांच्या भक्ती विषयी मार्गदर्शन करताना महासतीजी मुदीतप्रभाजी म.सा. यांनी भगवंतांविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.जो भगवंतांचा शिष्य आहे मात्र त्याचे कर्म चांगले नाही त्याला मोक्ष प्राप्ती शक्य नाही मात्र जो भगवंतांचा शिष्य नसूनही त्याचे कर्म चांगले असले तरी त्यास मोक्ष प्राप्ती होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. आपण भगवान महावीरांविषयी ऐकतो, मात्र त्यांचे ऐकत नाही, असे सांगून जीवनात भगवंताचे विचार अंमलात आणणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. भगवंतांची वाणी २६०० वर्षांनंतरही प्रासंगिक असून त्यांचे विचार अंगीकारा, असेही त्यांनी सांगितले.कंवरलाल संघवी यांनी गेल्या १८ वर्षांपासून दर रविवारी होणाऱ्या सामायिकबद्दल माहिती देत यात समाजबांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. या वेळी संघपती दलुभाऊ जैन, शाकाहार सदाचारचे प्रणेते रतनलाल बाफना, श्री सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीचे प्रमुख दिलीप गांधी, प्रवीण पगारिया, रिकेश गांधी, प्रितेश चोरडिया, प्रवीण छाजेड, आनंद चांदीवाल, संजय रेदासनी यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन कस्तुरचंद बाफना यांनी केले.२६ रोजी दुपारी ४.३० वाजता सद्भावना दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. धर्मनाथ जैन मंदिर ते खान्देश सेंट्रल मॉल या दरम्यान काढण्यात येणाºया या रॅलीद्वारे भगवंतांच्या जीवनाचा प्रचार व प्रसार करण्यासह बेटी बटाओ, रक्तदान, देहदान असे सामाजिक संदेशही दिले जाणार आहे. या सोबतच सहभागी दुचाकीस्वारांसाठी धार्मिक वेशभुषा स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धादेखील होणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव