शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
5
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
6
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
7
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
8
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
9
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
10
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
11
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
12
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
13
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
14
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
15
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
16
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
17
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
18
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
19
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
20
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

जळगाव येथे सामूहिक सामायिकने भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 13:29 IST

मनुष्याच्या कर्मानुसार मोक्षप्राप्ती - मुदीतप्रभाजी म.सा.

ठळक मुद्दे८५०हून अधिक समाजबांधव सहभागीभगवंतांची वाणी २६०० वर्षांनंतरही प्रासंगिक

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २६ - मनुष्य जीवन मिळाल्यानंतर व्यक्ती कसे कर्म करतो, यावर मोक्ष प्राप्ती अवलंबून असून जो भगवंताचा शिष्य नाही मात्र त्याने चांगले कर्म केले तर त्याला मोक्ष प्राप्ती होते, असे विचार महासतीजी मुदीतप्रभाजी म.सा. यांनी व्यक्त केले.भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवास २५ रोजी सकाळी सहपरिवार सामूहिक सामायिकने सुरुवात झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. गणपतीनगरातील रतनलाल बाफना स्वाध्याय भवनात सहपरिवार सामूहिक सामायिकचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. महासतीजी इंदूबालाजी म.सा., महासतीजी मुदीतप्रभाजी म.सा. आदी ठाणा १० यांच्या पावन सान्निध्यात झालेल्या समायिकमध्ये ८५०हून अधिक समाजबांधव सहभागी झाले होते.या वेळी भगवान महावीर यांच्या जीवन कार्याविषयी तसेच त्यांच्या भक्ती विषयी मार्गदर्शन करताना महासतीजी मुदीतप्रभाजी म.सा. यांनी भगवंतांविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.जो भगवंतांचा शिष्य आहे मात्र त्याचे कर्म चांगले नाही त्याला मोक्ष प्राप्ती शक्य नाही मात्र जो भगवंतांचा शिष्य नसूनही त्याचे कर्म चांगले असले तरी त्यास मोक्ष प्राप्ती होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. आपण भगवान महावीरांविषयी ऐकतो, मात्र त्यांचे ऐकत नाही, असे सांगून जीवनात भगवंताचे विचार अंमलात आणणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. भगवंतांची वाणी २६०० वर्षांनंतरही प्रासंगिक असून त्यांचे विचार अंगीकारा, असेही त्यांनी सांगितले.कंवरलाल संघवी यांनी गेल्या १८ वर्षांपासून दर रविवारी होणाऱ्या सामायिकबद्दल माहिती देत यात समाजबांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. या वेळी संघपती दलुभाऊ जैन, शाकाहार सदाचारचे प्रणेते रतनलाल बाफना, श्री सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीचे प्रमुख दिलीप गांधी, प्रवीण पगारिया, रिकेश गांधी, प्रितेश चोरडिया, प्रवीण छाजेड, आनंद चांदीवाल, संजय रेदासनी यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन कस्तुरचंद बाफना यांनी केले.२६ रोजी दुपारी ४.३० वाजता सद्भावना दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. धर्मनाथ जैन मंदिर ते खान्देश सेंट्रल मॉल या दरम्यान काढण्यात येणाºया या रॅलीद्वारे भगवंतांच्या जीवनाचा प्रचार व प्रसार करण्यासह बेटी बटाओ, रक्तदान, देहदान असे सामाजिक संदेशही दिले जाणार आहे. या सोबतच सहभागी दुचाकीस्वारांसाठी धार्मिक वेशभुषा स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धादेखील होणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव