शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

Lok Sabha Election 2019 : बारामतीची जागा पाडली तर पुस्तक लिहावे लागेल - पालकमंत्री चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 13:02 IST

मतदान कमी झाल्यास भाजपाला धोक्याची घंटा

भुसावळ, जि. जळगाव : भाजपा -शिवसेना महायुतीचे उमेदवार निवडून येण्यासाठी वातावरण चांगले आहे. मात्र कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या दिवशी मतदारांना बाहेर काढून मतदानाची टक्केवारी वाढवून घ्यावी, असे आवाहन महसूल व कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. मतदानाची टक्केवारी कमी झाली तर भाजपाला फटका बसणार असून ती धोक्याची घंटा ठरणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.भाजप उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचार कार्यालयामध्ये आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. प्रसंगी आमदार संजय सावकारे , नगराध्यक्ष रमण भोळे, आरपीआयचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, नगरसेवक मनोज बियाणी, माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी नगरसेवक निर्मल कोठारी, प्रमोद सावकारे, शिवसेनेचे नगरसेवक मुकेश गुंजाळ , दीपक धांडे, हेमंत खंबायत यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझ्यावर पश्चिम महाराष्ट्रातील दहा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे मी त्या मतदारसंघात लक्ष घालावे, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मला सांगितले. मात्र जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यामुळे मी आलो असल्याचे त्यांनी सांगितले.यावल येथेही बैठकयावल येथे नेवे मंगल कार्यालयात तसेच भडगाव येथेही पालकमंत्री पाटील यांनी बैठक घेतली.बारामतीसारखा प्रचार कराजळगाव येथील सभेत पालकमंत्री म्हणाले की, सध्या आपण बारामतीवर जास्त लक्ष केंद्रीत केले आहे. तिथे जोमाने प्रचार सुरू आहे, बारामतीची जागा जर आपण पाडली तर आपण काय काय केले यासंदर्भात पुस्तक लिहावे लागेल, असे सांगत कार्यकर्त्यांनी तसा प्रचार प्रसार जळगावातही करावा, असे आवाहन केले़ पाटील यांनी भडगाव येथेही बैठक घेतली. माध्यमांच्या सर्व्हेंनुसार आपणच निवडून येऊ म्हणून झोपून राहू नका़ मतदानाची टक्केवारी कमी झाली तर भाजपासाठी ती धोक्याची घंटा ठरेल, असा इशाराही त्यांनी दिला.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJalgaonजळगाव