शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

Lok Sabha Election 2019 : बारामतीची जागा पाडली तर पुस्तक लिहावे लागेल - पालकमंत्री चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 13:02 IST

मतदान कमी झाल्यास भाजपाला धोक्याची घंटा

भुसावळ, जि. जळगाव : भाजपा -शिवसेना महायुतीचे उमेदवार निवडून येण्यासाठी वातावरण चांगले आहे. मात्र कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या दिवशी मतदारांना बाहेर काढून मतदानाची टक्केवारी वाढवून घ्यावी, असे आवाहन महसूल व कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. मतदानाची टक्केवारी कमी झाली तर भाजपाला फटका बसणार असून ती धोक्याची घंटा ठरणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.भाजप उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचार कार्यालयामध्ये आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. प्रसंगी आमदार संजय सावकारे , नगराध्यक्ष रमण भोळे, आरपीआयचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, नगरसेवक मनोज बियाणी, माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी नगरसेवक निर्मल कोठारी, प्रमोद सावकारे, शिवसेनेचे नगरसेवक मुकेश गुंजाळ , दीपक धांडे, हेमंत खंबायत यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझ्यावर पश्चिम महाराष्ट्रातील दहा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे मी त्या मतदारसंघात लक्ष घालावे, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मला सांगितले. मात्र जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यामुळे मी आलो असल्याचे त्यांनी सांगितले.यावल येथेही बैठकयावल येथे नेवे मंगल कार्यालयात तसेच भडगाव येथेही पालकमंत्री पाटील यांनी बैठक घेतली.बारामतीसारखा प्रचार कराजळगाव येथील सभेत पालकमंत्री म्हणाले की, सध्या आपण बारामतीवर जास्त लक्ष केंद्रीत केले आहे. तिथे जोमाने प्रचार सुरू आहे, बारामतीची जागा जर आपण पाडली तर आपण काय काय केले यासंदर्भात पुस्तक लिहावे लागेल, असे सांगत कार्यकर्त्यांनी तसा प्रचार प्रसार जळगावातही करावा, असे आवाहन केले़ पाटील यांनी भडगाव येथेही बैठक घेतली. माध्यमांच्या सर्व्हेंनुसार आपणच निवडून येऊ म्हणून झोपून राहू नका़ मतदानाची टक्केवारी कमी झाली तर भाजपासाठी ती धोक्याची घंटा ठरेल, असा इशाराही त्यांनी दिला.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJalgaonजळगाव