शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

खान्देशात सव्वा लाख विद्यार्थी घेताहेत स्वावलंबनाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 15:53 IST

'तुम्हाला एका वर्षाची बिदागी हवी असेल तर धान्य पेरा, तुम्हाला १०० वर्षांची बिदागी हवी असेल तर माणसे पेरा आणि तुम्हाला हजारो वर्षाची बिदागी हवी असेल तर विचार पेरा,' कर्मवीर भाऊराव पाटील या शिक्षण महषीर्चे हे विचार. स्वावलंबी शिक्षणाचा पाया रोवणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जयंती. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बहुजन समाजासाठी त्यांनी शिक्षणाची द्वारे खुली केली. कमवा आणि शिका योजनेतून तळागाळातील मुले शिक्षणाच्या प्रवाहात येत आहे. खान्देशातील तिन्ही जिल्ह्यातील सव्वा लाख विद्यार्थी स्वावलंबनाचे धडे घेताहेत. त्याविषयी ‘लोकमत’च्या ‘मंथन’ पुरवणीत लिहिताहेत जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभागाचे संचालक संचालक प्रा.डॉ.सत्यजित साळवे....

पुस्तक एके पुस्तक असे शिक्षण भाऊरावांना अभिप्रेत नव्हते. समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी ही मूल्ये शिक्षणातून हरपली पाहिजेत. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे रयत शिक्षण संस्थेचे घोषवाक्य आहे. विद्यार्थ्यांनी स्वत:च्या पायावर उभे रहावे आणि शिक्षण घ्यावे, असे त्यांना वाटे. म्हणून त्यांनी कमवा व शिका योजना सुरू केली. शिक्षण हे माणसाच्या विकासाचे मूळ आहे. शिक्षणाने माणूस बहुश्रुत व विवेकी बनतो.आज खेड्यापाड्यातील बहुसंख्य मुले कमवा आणि शिका या योजनेच्या आधाराने शिकली आणि शिकत आहेत. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमध्ये ही योजना राबविली जाते. ग्रामीण आणि दुर्गम भागातील मुलांना उच्च शिक्षणात ही योजना संजिवनी ठरत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांने परिसरातीलच छोटी मोठी कामे केली पाहिजेत. त्या कामाचा मोबदला त्याला दिला जातो. एकविसाव्या शतकात ह्या योजनेची कामे स्मार्ट बनली आहेत. गं्रथालय, प्रयोगशाळा, कार्यालय वाचनकक्ष याठिकाणी संगणकाच्या साह्याने कामे करणे यासाठी योजनेची मदत घेतली जाते.कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ही योजना सन १९९३-९४ पासून राबविली जात आहे. आज या योजनेची अडीच कोटी रुपए एवढी तरतूद केली आहे़. ग्रामीण भागातील अथवा आदिवासी क्षेत्रातील कोणत्याही विद्यार्थ्यांला पैशांअभावी शिक्षण घेता येऊ नये, ही बाब स्वस्थ समाजासाठी लाभदायी नाही. फस्ट लरनर असणाऱ्या अनेक पिढ्या आजही उच्च शिक्षणात गती घेताना आर्थिक ओज्याने कोलमडून पडताना दिसताहेत. त्यांच्यासाठी अर्थसाह्याची योजना त्यांच्या शिक्षणात बळ भरण्याचे काम करीत असते. आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू हे ग्रामीण भागातील मुलांचे खºया अथार्ने प्रतिनिधित्व आहे. आपल्या विद्यापीठातील कमवा आणि शिका योजनेबद्दल सांगायचे झाल्यास एक लाख ३० हजार एवढे विद्यार्थी आपल्या विद्यापीठात दरवर्षी नियमित प्रवेश घेतात. त्यापैकी मुलाखतीच्या आधारावर अडीच हजार विद्यार्थ्यांची या योजनेत निवड होते. उरलेल्यांना आर्थिक दुर्बल घटकांना अर्थसहाय योजनेत मदत केली जाते.महाविद्यालय आणि परिसरात विद्यार्थ्यांने दिवसाला किमान तीन तास काम करावे, असे अभिप्रेत आहे. तासाला ४० रुपयेप्रमाणे १२० रुपए त्याला दिवसाला मिळतात. महिन्याला त्याला तीन ते साडेतीन हजार रुपए या योजनेत काम केल्याने मिळू शकतात. म्हणजेच विद्यार्थ्यांने जास्तीत जास्त वेळ महाविद्यालयात असावे. अभ्यास व अभ्यासेतर कार्यक्रमात भाग घ्यावा आणि सक्रिय पद्धतीने उच्च शिक्षणाच्या प्रवाहाचा आनंद घ्यावा. बाहेर कुठेही अर्ध वेळ काम करण्याची आवश्यकता नाही. विविध शिष्यवृत्या आणि अर्थ-सहाय योजनेतून त्याचा उच्च शिक्षणाचा प्रवास सुखकर होतो.संघर्षात यशाचे मूळ दडलेले असते. ज्याच्या वाट्याला संघर्ष नाही त्याला जीवन सपक वाटते. विद्यार्थी दशेपासून अशा योजनेत काम केल्यामुळे श्रमप्रतिष्ठा, सामाजिक भान, व्यवहार, चातुर्य आणि संभाषण कला ही मूल्ये व्यक्तिमत्वाला आकार देतात. आज या योजनेमुळे शिकलेली आणि मोठी झालेली मुले भेटली की, डोळे आपोआप पाणावतात. तीही प्रचंड भावूक होऊन योजनेच्या मदतीविषयी भरभरून बोलतात. कर्मवीर भाऊराव पाटलांचे आज स्मरण करताना हजारो विद्यार्थ्यांच्या तोंडून भाऊरावाबद्दलचे कृतज्ञतेचे शब्द बाहेर पडतात. हीच तर या समाजपुरूषाला खरी आदरांजली आहे़.-प्रा.डॉ.सत्यजित साळवे, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव