शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

Vidhan Sabha 2019 : १० लाखापेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांवर राहणार नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 11:18 IST

उमेदवारांच्या बँक खात्यावर बारकाईने लक्ष

जळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना २८ लाख रुपये खर्चाची मर्यादी ठरवून दिली असली तरी या काळात उमेदवाराच्या खात्यातून १० लाखापेक्षा जास्त रकमेचा व्यवहार झाल्यास त्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी, महाव्यवस्थापक, आयकर विभाग यांना कळवावे लागणार आहे. त्यामुळे उमेदवारांच्या मोठ्या व्यवहारावर प्रशासनाची करडी नजर राहणार असल्याचे संकेत जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीत दिले.‘निवडणूक काळात बँकांनी घ्यावयाची काळजी’ या विषयावर बँकांच्या प्रतिनिधीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी झाली, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आयकर विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल मलवाणी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा कोषागार अधिकारी प्र. सी. पंडित, जिल्हा उप निबंधक मेघराज राठोड, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र देशमुख, निवडणूक तहसीलदार बाबासाहेब गाढवे, नायब तहसीलदार मोरे, कळसकर यांच्यासह भारतीय रिझर्व बँकेचे प्रतिनिधी, जिल्ह्यातील राष्टीयकृत बँकांचे व्यवस्थापक व प्रतिनिधी उपस्थित होते.आगामी विधानसभेच्या निवडणुकीत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांसाठी निवडणूक आयोगाने २८ लाख रुपये खर्चाची मर्यादा ठरवून दिली आहे. तथापी निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या खर्चाच्या मर्यादेला छेद देण्यासाठी उमेदवारांकडून विविध क्लुप्त्या वापरण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी राष्ट्रीयकृत बँका, शेड्यूल बँका, सहकारी बँका तसेच पतसंस्थांनी निवडणूक काळात भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणेच आर्थिक व्यवहार होतील, यावर विशेष लक्ष केंद्रीत करणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे म्हणाले.खाते तातडीने उघडाजिल्हाधिकारी डॉ. ढाकणे पुढे म्हणाले की, निवडणुकी दरम्यान उमेदवार तसेच त्यांचे प्रतिनिधी मतदारांना प्रभावित करण्यासाठी पैशांव्यतिरिक्त वस्तू स्वरूपात अनेक प्रलोभने दाखवितात. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार निवडणूक लढविणाºया उमेदवारांनी निवडणुकीसाठी बँकेत स्वतंत्र खाते उघडणे आवश्यक आहे. जे उमेदवार खाते उघडण्यासाठी येतील त्यांचे खाते तातडीने उघडून द्यावे. निवडणुकीसाठी घालून दिलेल्या २८ लाख रूपयांच्या मर्यादेपेक्षा अधिक खर्च होणार नाही यावर लक्ष ठेवावे. तसेच निवडणूक खर्चासाठी लागणाºया रकमा या १० हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास अशा रकमा या धनादेशाद्वारेच दिल्या जातील याची दक्षता घ्यावी.मोठ्या रकमेच्या व्यवहारांची माहिती कळवाबँकांनी उमेदवारांची खाती प्राध्यान्यक्रमाने उघडून घेवून निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १० लाखापेक्षा जास्त रकमेच्या भरणा किंवा पैसे काढलेल्या व्यवहाराची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी व महाव्यवस्थापक, आयकर विभाग यांच्या पत्यावर नोंदवावी. निवडणूक कालावधीत उमेदवारांव्यतिरिक्त ज्या खात्यावरुन वारंवार रकमा काढल्या जात असल्यास त्याचीही माहिती द्यावी. अशा खात्यावर बॅकेच्या अधिकाऱ्यांनी करडी नजर ठेवण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाºयांनी संबंधितांना दिल्या. बँकांनी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करताना सर्वसामान्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाºयांनी उपस्थितांना दिल्यात. त्याचबरोबर ज्या बँकेचे अधिकारी, कर्मचारी यांची निवडणूकीसाठी नियुक्ती करण्यात आली आह, त्यांना तातडीने कार्यमुक्त करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाJalgaonजळगाव