शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

सततच्या वाचनातून लिहिते झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 1:51 AM

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘माझी लेखन प्रेरणा’ या सदरात लिहिताहेत कथाकार अश्विनी करंके...

सन २००० साली पदवी घेऊन कॉलेज सोडलं, पण वाचनात खंड पडू दिला नाही. त्यातच २००३ साली माझ्या मिस्टरांचा लेख नियतकालिकात झळकला. तेव्हापासून मी थोडा लिखाणाचा प्रयत्न सुरू केला. ‘हुंडा’ या सामाजिक विषयावर एक लेख लिहिला. मात्र तो व्यवस्थित मांडलाय की नाही हे माझं मलाच कळत नव्हतं. मी घाबरत-घाबरतच लेख मिस्टरांना दाखविला. त्यांनी तो वाचून त्यातील थोडी शब्दरचना स्वत: करून लिखाणासाठी प्रोत्साहीत केलं. त्यानंतर गावातील वाचनालयातून पुस्तकं वाचायला उपलब्ध करून दिली. त्यात कादंबरी, कथासंग्रह होते. मला वाचनाची आवड तर होती, पण पुढे-पुढे नियमित विविध पुस्तके उपलब्ध होत असल्याने वाचनात विविधता आणली. यातच सन २००५ उजाडले आणि मिस्टरांनी लिखाणासाठी प्रयत्न करण्याविषयी सांगितलं. आधी तर मनात भीती होती की, मी लिखाण करू शकेन का? पण त्यांनी प्रोत्साहन दिलं की, तू लिहू शकतेस, प्रयत्न करून बघ. मी तुझ्यासोबत आहेच.’ मग काय? सतत चार महिने फक्त डोक्यात आलेले विचार माझ्या शब्दात कागदावर उतरविले. लेखणी चालत होती, शब्द उमटत होते, कागदं भरत होती. पण विषयाला धरुन हवं तसं लिखाण मात्र होत नव्हतं. एका विषयाला धरुन त्यात कथानक साकारण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यातच एक मनासारखा विषय मिळाला. निपुत्रिक असणाऱ्याला समाज कसा वागवतो? आणि मग पहिली कथा साकारली ‘दत्तक’. तोवर दिवाळी अंक कथा स्पर्धा जाहीर झालेली होती. मी ती कथा स्पर्धेसाठी पाठवली. माझी पहिलीच कथा द्वितीय पारितोषिक प्राप्त म्हणून प्रसिद्ध झाली. वाचकांना विषय आणि मांडणी खूपच आवडली. अनेक वाचकांनी दूरध्वनी तसेच पत्रव्यवहारच्या माध्यमातून माझ्या कथेचं कौतुक केलं. यातून प्रोत्साहन मिळत गेलं. नवीन काही तरी करण्याची ऊर्जा या प्रोत्साहनाच्या माध्यमातून मिळत गेली. त्यानंतर मात्र लिखाणाची गोडी लागली. विविध विषयांकडे मी चौकस दृष्टीने पाहून स्थानिक, ग्रामीण, सामाजिक विषयावर लिखाण सुरू केलं. आज माझ्या अनेक कथांना विविध स्पर्धांमध्ये पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत हे लिखाण असंच सुरू रहावं, अशी इच्छा आहे. कारण यातून सकारात्मक ऊर्जा मिळते. प्रोत्साहन मिळतं. यापेक्षा आणखी दुसरं काही पाहिजे?-अश्विनी करंके, मलोणी, ता.शहादा, जि.जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यnandurbar-pcनंदुरबार