शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

बुडालेल्यास २२ तासानंतर काढले बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 1:20 PM

रामदेववाडी शिवारातील घटना : नळांना पाणी आले नाही म्हणून आंघोळीला गेला अन् जीव गमावला

जळगाव : चार दिवसापासून नळांना पाणी येत नसल्याने गावाशेजारीच असलेल्या तलावात आंघोळीसाठी गेलेल्या चेतन साहेबराव राठोड (१८) या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रामदेववाडी, ता.जळगाव येथे घडली आहे. शनिवारी सकाळी ९ वाजता बुडालेल्या या तरुणाचा मृतदेह तब्बल २२ तासांनी म्हणजे रविवारी सकाळी ७ वाजता हाती लागला. मृतदेह शोधण्यासाठी महापालिकेचे पथक त्याशिवाय रामदेववाडी, शिरसोली, पाथरी, म्हसावद व गालापूर येथील पट्टीच्या पोहणाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदेववाडीसह परिसरातील वावडदा, वडली, जळके येथे बाराही महिने पाणी टंचाई असते. उन्हाळ्यात तीव्र स्वरुपाची पाणी टंचाई जाणवते. रामदेववाडी येथे चार दिवसापासून नळांना पाणी येत नसल्याने गावातील तरुण तलावात आंघोळीसाठी जातात. शनिवारी चेतन, नवल पांडूरंग राठोड व सागर धनराज राठोड असे तिघं जण तलावात आंघोळीसाठी गेले. नवल व सागर तलावाकाठी मोबाईलवर टिकटॉक व्हिडीओ तयारी करीत असताना चेतन आंघोळीसाठी उतरला. पोहता येत नसल्याने तो खोल खड्डयात गेला अन् जीव वाचविण्यासाठी आरडाओरड करायला लागला. हा प्रकार पाहून सागर व नवल दोघं जण मदतीला धावले, त्याशिवाय तलावाच्या दुसºया काठावर मासेमारी करीत असलेलेल हौसीलाल भोई हे देखील धावून आले. मात्र तलाव खोल व गाळ खूप प्रमाणात असल्याने चेतन हाती लागला नाही. त्यांनी हा प्रकार लागलीच गावात कळविला.पट्टीच्या पोहणाऱ्यांनी घेतला दिवसभर शोधचेतन पाण्यात बुडाल्याची माहिती रामदेववाडी व वावडदा गावात पसरल्यानंतर गावकºयांनी धाव घेऊन तलावात शोध कार्य राबविले. वावडदा येथील रवींद्र त्र्यंबक पाटील (कापडणे) यांनी एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती देऊन मनपाचे पथकही मागविले. उपनिरीक्षक विशाल सोनवणे, सचिन देशमुख व संदीप पाटील यांनीही प्रशासनाशी संपर्क साधून मदत मागविली. त्याशिवाय परिसरातील पट्टीच्या पोहणाºयांना पाचारण करण्यात आले. दिवसभरात ५० च्याव तरुणांनी तलावात चेतनचा शोध घेतला, मात्र काहीही उपयोग झाला नाही. रात्री उशिरा शोध मोहीम थांबविण्यात आली. त्यानंतर रविवारी सकाळी चेतनचे नातेवाईक नानाभाऊ जेरी चव्हाण (रा.तळवण तांडा, ता.भडगाव) यांनी परत तलावात उडी घेऊन शोध मोहीम राबविली असता सात वाजता चेतनचे डोक त्यांच्या हाताला लागले. त्यानंतर त्याला बाहेर काढण्यात आले. शनिवारी सकाळी ९ ते रविवारी सकाळी ७ असे २२ तास शोध कार्य चालले.कर्ता तरुण गेल्याने कुटुंबासमोर संकटचेतन हा कुटुंबातील कर्ता पुरुष होता. वडील साहेबराव हरी राठोड, आई द्वारकाबाई, व लहान भाऊ नितीन शेती व मजुरी करतात. कौटुंबिक व आर्थिक परिस्थित अत्यंत हलाकीची आहे. बहिण चैताली समाधान चव्हाण विवाहित आहे. चेतनच्या मृत्यूने कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. रवींद्र पाटील व म्हसावदचे पोलीस कर्मचारी सचिन देशमुख यांना सकाळी मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला. उपनिरीक्षक विशाल वाठोरे, सचिन मुंडे यांनी पंचनामा केला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.चेतन बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या शोध कार्यासाठी पंचक्रोशीतील पट्टीचे पोहणारे तसेच मनपाचे पथक बोलावले. दिवसभर व रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम राबविली. नळांना पाणी न आल्याने चेतन आंघोळीसाठी तलावात गेला होता. पाणी पुरवठा होत नसल्याने अनेक तरुण येथे आंघोळीसाठी जातात. कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी यासाठी पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहे.-रवींद्र त्र्यंबक पाटील (कापडणे), सामाजिक कार्यकर्ते, वावडदा

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव