शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

आयसीएमआरचे पथक संकलित करणार चारशे जणांचे रक्तनमुने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 12:14 IST

चेन्नईला होणार संशोधन : दहा पथकांचे आज दहा ठिकाणी सर्व्हेक्षण

जळगाव : जिल्ह्यातील कोरोना संसर्ग किती प्रमाणात आहे, कोणाला कोरोना होऊन गेलेला आहे का, त्यांच्या प्रतिकार क्षमता किती विकसित झाली आहे़, या सर्व बाबींच्या तपासणीसाठी आयसीएमआरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह पंधरा जणांचे पथक गुरूवारी जिल्हाभरात सर्व्हेक्षण करणार आहे़ हे पथक बुधवारीच जिल्ह्यात दाखल झाले. स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश असलेली दहा पथके जिल्ह्यातील दहा ठिकाणाहून प्रत्येकी चाळीस अशा चारशे जणांचे रक्तनमुने घेणार आहेत़ यावर चेन्नई येथे संशोधन होणार आहे.आरोग्य सेवा संचालनालय पुणे यांच्या अंतर्गत कोविडच्या पार्श्वभूमीवर नॅशनल सेरो सर्व्हे केला जाणार सहा जिल्ह्यांमध्ये हा सर्व्हे होणार आहे़ आयसीएमआरचे पथक हा सर्व्हे करणार आहे़ दरम्यान, आरोग्य संचालकांनी आधिच सर्व आढावा घेतला असल्याने पथकाकडून थेट सर्व्हेक्षणाचेच काम होणार असल्याची माहिती आहे़यांचा आहे समावेशजागतिक आरोग्य संघटनेचे समुपदेशक, आयसीएमआर (भारतीय आयुर्विज्ञान अनुसंशोधन परिषद) यांचे वैद्यकीय अधिकारी त्यांच्यासह तंत्रज्ञ यांचा पथकात समावेश राहणार असून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एऩ एस़ चव्हाण यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे़ यासह दहा ठिकाणचे दहा वैद्यकीय अधिकारी व स्थानिक दहा प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांचा पथकांमध्ये समावेश राहणार आहे़चैन्नईला होणार तपासणीरक्तनमुने संकलीत केल्यानंतर एक दोन दिवस स्थानिक रुग्णालयात सर्व प्रक्रिया करून मग हे सर्व नमुने चैन्नई येथे प्रयोगशाळेत पाठवण्यासाठी पाठविण्यात येणार आहे़ ही अ‍ॅन्टीबॉडी टेस्ट असणार आहे़ कोरोनाचा संसर्ग कोणाला झाला होता़ प्रतिकारशक्ती कशी आहे़ अशा काही तपासण्या यातून होणार आहे़ कोणाला कोरोना होऊन गेला आहे का? याचीही माहिती यातून समोर येणार आहे़ चैन्नईला यावर संशोधन होणार आहे़ अ‍ॅन्टीबॉडी कोणात तयार झाल्या आहेत, यावर तपासणी होऊन त्याचे अहवाल जिल्हा शल्यचिकित्सकांकडे येणार आहे़जिल्ह्यात झपाट्याने फैलावजिल्हाभरात कोरोना संसर्गाचा झपाट्याने फैलाव झाला असून एप्रिल अखेर व मेच्या आधिच्या आठवड्यांमध्ये कोरोना रुग्णांनी दोनशेचा आकडा पार केला होता़ रोज दहाच्यावरच रुग्ण आढळून येत आहेत़ त्यातच बुधवारी दिवसभरात २९ रुग्ण आढळून आल्याने ३४६ रुग्ण संख्या झाली आहे़ दुसरीकडे मृतांचा आकडाही चिंता वाढविणार आहे़ जिल्हाभरात बुधवारी सायंकाळपर्यंत ३८ जणांचा मृत्यू झालेला होता़ यातील अनेकांचे मृत्यूनंतर अहवाल प्राप्त झाले आहे़या ठिकाणी जाणार पथकयावल तालुक्यातील मोहराळे, रावेर तालुक्यातील तांदलवाडी, जळगाव तालुक्यातील कडगाव, धरणगाव, भडगाव तालुक्यातील वरखेडे, पाचोरा येथील नाईकनगर, जामनेर येथील गोराडखेडा, भुसावळ येथील वॉर्ड नं ४५, जळगाव येथील वॉर्ड नं ५७, चाळीसगाव येथील वॉर्ड नं २८ या ठिकाणच्या रँडमली दहा घरंची निवड करून प्रत्येकी चार अशा चाळीस जणांची प्रत्येक गावातून तपासणी केली जाणार आहे़ पंधरा दिवसानंतर पुन्हा तपासणी घेण्यात येणार आह़े त्यानंतर महिन्याच्या अंतराने ही तपासणी होणार असल्याची माहिती आहे़बरे होणाºयांचे प्रमाण समाधानकारकरुग्ण संख्या वाढत असली तरी कोरोनातून बरे होणाºयांचे प्रमाणही समाधानकारक असल्याचे जिल्ह्यात चित्र आहे़ बुधवारी सायंकाळपर्यंत प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यातील १३४ रुग्णांनी कोरोनावर मात केलेली आहे़ दहा दिवसांच्या नियमानुसार लक्षणे नसलेल्याना घरी सोडण्यात येत आहे़ त्यात या रुग्णांचा समावेश आहे़पथक बुधवारीच जिल्ह्यात दाखल झाले असून गुरूवार व शुक्रवार असे दोन दिवस जिल्ह्यात दहा ठिकाणी सर्व्हे करणार आहे़ त्यांच्यासोबत स्थानिक वैद्यकीय अधिकारी, स्थानिक आरोग्य कर्मचारी व प्रयोगशाळा तंत्रज्ञ राहणार आहे़ दहा पथके हा सर्व्हे करणार आहेत़ रक्तनमुने घेऊन त्यावर चैन्नई येथे संशोधन होणार आहे़-डॉ़ एऩ एस़ चव्हाण,जिल्हा शल्यचिकित्सक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव