शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
2
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
3
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
4
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
5
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
6
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
7
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
8
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
9
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
10
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
11
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
12
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
13
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
14
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
15
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
16
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
17
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
18
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
19
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
20
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
Daily Top 2Weekly Top 5

आयसीएमआरचे पथक संकलित करणार चारशे जणांचे रक्तनमुने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 12:14 IST

चेन्नईला होणार संशोधन : दहा पथकांचे आज दहा ठिकाणी सर्व्हेक्षण

जळगाव : जिल्ह्यातील कोरोना संसर्ग किती प्रमाणात आहे, कोणाला कोरोना होऊन गेलेला आहे का, त्यांच्या प्रतिकार क्षमता किती विकसित झाली आहे़, या सर्व बाबींच्या तपासणीसाठी आयसीएमआरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह पंधरा जणांचे पथक गुरूवारी जिल्हाभरात सर्व्हेक्षण करणार आहे़ हे पथक बुधवारीच जिल्ह्यात दाखल झाले. स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश असलेली दहा पथके जिल्ह्यातील दहा ठिकाणाहून प्रत्येकी चाळीस अशा चारशे जणांचे रक्तनमुने घेणार आहेत़ यावर चेन्नई येथे संशोधन होणार आहे.आरोग्य सेवा संचालनालय पुणे यांच्या अंतर्गत कोविडच्या पार्श्वभूमीवर नॅशनल सेरो सर्व्हे केला जाणार सहा जिल्ह्यांमध्ये हा सर्व्हे होणार आहे़ आयसीएमआरचे पथक हा सर्व्हे करणार आहे़ दरम्यान, आरोग्य संचालकांनी आधिच सर्व आढावा घेतला असल्याने पथकाकडून थेट सर्व्हेक्षणाचेच काम होणार असल्याची माहिती आहे़यांचा आहे समावेशजागतिक आरोग्य संघटनेचे समुपदेशक, आयसीएमआर (भारतीय आयुर्विज्ञान अनुसंशोधन परिषद) यांचे वैद्यकीय अधिकारी त्यांच्यासह तंत्रज्ञ यांचा पथकात समावेश राहणार असून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एऩ एस़ चव्हाण यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे़ यासह दहा ठिकाणचे दहा वैद्यकीय अधिकारी व स्थानिक दहा प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांचा पथकांमध्ये समावेश राहणार आहे़चैन्नईला होणार तपासणीरक्तनमुने संकलीत केल्यानंतर एक दोन दिवस स्थानिक रुग्णालयात सर्व प्रक्रिया करून मग हे सर्व नमुने चैन्नई येथे प्रयोगशाळेत पाठवण्यासाठी पाठविण्यात येणार आहे़ ही अ‍ॅन्टीबॉडी टेस्ट असणार आहे़ कोरोनाचा संसर्ग कोणाला झाला होता़ प्रतिकारशक्ती कशी आहे़ अशा काही तपासण्या यातून होणार आहे़ कोणाला कोरोना होऊन गेला आहे का? याचीही माहिती यातून समोर येणार आहे़ चैन्नईला यावर संशोधन होणार आहे़ अ‍ॅन्टीबॉडी कोणात तयार झाल्या आहेत, यावर तपासणी होऊन त्याचे अहवाल जिल्हा शल्यचिकित्सकांकडे येणार आहे़जिल्ह्यात झपाट्याने फैलावजिल्हाभरात कोरोना संसर्गाचा झपाट्याने फैलाव झाला असून एप्रिल अखेर व मेच्या आधिच्या आठवड्यांमध्ये कोरोना रुग्णांनी दोनशेचा आकडा पार केला होता़ रोज दहाच्यावरच रुग्ण आढळून येत आहेत़ त्यातच बुधवारी दिवसभरात २९ रुग्ण आढळून आल्याने ३४६ रुग्ण संख्या झाली आहे़ दुसरीकडे मृतांचा आकडाही चिंता वाढविणार आहे़ जिल्हाभरात बुधवारी सायंकाळपर्यंत ३८ जणांचा मृत्यू झालेला होता़ यातील अनेकांचे मृत्यूनंतर अहवाल प्राप्त झाले आहे़या ठिकाणी जाणार पथकयावल तालुक्यातील मोहराळे, रावेर तालुक्यातील तांदलवाडी, जळगाव तालुक्यातील कडगाव, धरणगाव, भडगाव तालुक्यातील वरखेडे, पाचोरा येथील नाईकनगर, जामनेर येथील गोराडखेडा, भुसावळ येथील वॉर्ड नं ४५, जळगाव येथील वॉर्ड नं ५७, चाळीसगाव येथील वॉर्ड नं २८ या ठिकाणच्या रँडमली दहा घरंची निवड करून प्रत्येकी चार अशा चाळीस जणांची प्रत्येक गावातून तपासणी केली जाणार आहे़ पंधरा दिवसानंतर पुन्हा तपासणी घेण्यात येणार आह़े त्यानंतर महिन्याच्या अंतराने ही तपासणी होणार असल्याची माहिती आहे़बरे होणाºयांचे प्रमाण समाधानकारकरुग्ण संख्या वाढत असली तरी कोरोनातून बरे होणाºयांचे प्रमाणही समाधानकारक असल्याचे जिल्ह्यात चित्र आहे़ बुधवारी सायंकाळपर्यंत प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यातील १३४ रुग्णांनी कोरोनावर मात केलेली आहे़ दहा दिवसांच्या नियमानुसार लक्षणे नसलेल्याना घरी सोडण्यात येत आहे़ त्यात या रुग्णांचा समावेश आहे़पथक बुधवारीच जिल्ह्यात दाखल झाले असून गुरूवार व शुक्रवार असे दोन दिवस जिल्ह्यात दहा ठिकाणी सर्व्हे करणार आहे़ त्यांच्यासोबत स्थानिक वैद्यकीय अधिकारी, स्थानिक आरोग्य कर्मचारी व प्रयोगशाळा तंत्रज्ञ राहणार आहे़ दहा पथके हा सर्व्हे करणार आहेत़ रक्तनमुने घेऊन त्यावर चैन्नई येथे संशोधन होणार आहे़-डॉ़ एऩ एस़ चव्हाण,जिल्हा शल्यचिकित्सक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव