शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

वरातीपुढून घोडे

By admin | Updated: May 29, 2017 14:00 IST

वीकेण्ड स्पेशलमध्ये अनुभव या सदरात डॉ.मिलींद बागुल यांनी केलेले लिखाण.

 उन्हाळातल्या उन्हाबद्दल तीव्र प्रतिक्रिया बहुसंख्येने किंबहुना प्रत्येक व्यक्ती व्यक्त करीत असते. तेवढय़ाच अधिकाधिक प्रमाणातील विवाह उन्हाळ्यात केले जातात. विवाहाला जाणा:या प्रत्येकाला काही नाचणा:या मंडळीचा अपवाद वगळता विवाह वेळेवर लागेल का? असा प्रश्न असतो. हा प्रश्न सोडविण्यासाठी काही समाजांनी मनोमन पुढाकार घेऊन प्रश्न सोडविला सुद्धा.  त्या समाजातल्या तरुण मुलांनी फारच चांगला आदर्श निर्माण केला. ब:याचशा समाजात लग्न वेळेवर लागत नाही. त्यामुळे ताटकळत बसण्याशिवाय अनेकांना पर्याय नसतो. यापुढची गंमत म्हणजे जेवणंसुद्धा लग्नविधी झाल्यावरच सुरू करतात आणि त्या गोडसं नाव सुद्धा देतात. कुँवारी पंगत देऊ नये. पण जरा वेगळाच अनुभव दोन विवाहांना उपस्थिती देताना येऊन गेला. फैजपूरला  लग्नानिमित्ताने गेलो. सोनवणे आणि तायडे परिवारातला हा विवाह सोहळा विवाह सोहळ्याच्या अर्धा तास अगोदर धरणगावहून फैजपूरला नवरदेव पोहोचला. मंडपात भोजनावळी सुरू होत्या. पारावरचा नवरदेव आणि विवाहस्थळ तसं बरचं लांब होते.  आता बॅण्ड सुरू होणार आणि लग्न चार वाजता लागणार असे वाटू लागले.  बॅण्ड सुरू झाला. लहान मुलांनी ताल धरला अन् हळूहळू तरुणांची गाण्यांची फर्माईश वाढू लागली. सारं कसं ङिांगाट होवू लागलं. हळूहळू वरात पुढे सरकू लागली. पंधरा-वीस मिनिटानंतर बॅण्ड आणि वरात अध्र्यावर येऊन पोहोचली. पाच मिनिटानंतर  वरात मंडपाच्या काही अंतरावर पोहचलीसुद्धा.  हे अंतर पार करण्याची किमया काही लक्षात येईना.. वर पित्याला  शोधत होतो. तरुण बेधुंद नाचत होते. वर-पित्यानं नवरदेवाचा घोडा वरातीच्या पुढे घेऊन थेट मंडपाजवळच थांबवला. समजुतदारपणा आणि तरुणांची समजूत यांचा सुरेख संगम साधत वरपित्याने विवाह वेळेवर लावून सा:यांनाच सुखद आनंद दिला. असाच दुसरा विवाह नेमाडे आणि पाटील परिवारातला. जळगावातील  रणरणत्या उन्हात सावली शोधणा:या मंडळींना वेळेवर विवाह लागल्याने सुखद गारवा देऊन जाताना आनंदाचा प्रत्यय देखील येत असतो.

जळगावच्या विवाहात सा:या नातेवाईक मंडळीत अर्थात महिलांनी देखील फेटे बांधून वरातीत आपल्या आनंदाला वाट करून देत बॅण्डच्या दोन-चार गाण्यातच नवरदेवाला लग्न मंडपात आणून विवाह वेळेवर लावला. या दोनही विवाह सोहळ्याची वैशिष्ठय़े ही होती की, वेळेवर विवाह लागल्यानंतर मंडपाच्या बाहेर पडताना येणारी मंडळी आवजरून विचारायची अजून लग्नाला किती उशीर आहे? लग्न लागल्याचे समजताच त्यांनाच उशिरा आल्याचा पश्चाताप होत होता. पालकांचा समजूतदारपणा आणि तरुणांची मानसिकता यांची सांगड घालत असताना विवाहामध्ये अनेक तर्क आणि विचार देखील ऐकायला मिळतात. ‘मगं का? लग्न पुन्हा पुन्हा होतं? नाचू द्या? आणि मगं सारं काही मूक संमतीनं सहन करावं लागतं. काही लग्नामध्ये तर सत्कार समारंभाचा भार सुद्धा सहन करावा लागतो. परवा  एका लग्नात कहरच झाला. मंगलाष्टके सुरू असतानाच एका महनीय व्यक्तीचा (कुटुंबासही) लग्न मंडपात प्रवेश झाला. मंगलाष्टके थांबविण्यात आली. त्या व्यक्तीचा सत्कार करण्यात आला. त्यापुढचा कहर म्हणजे त्या व्यक्तीला भाषणाचा आग्रह झाला आणि त्यांनी तो आग्रह पूर्ण देखील केला. विवाह सोहळा मंगल आणि मांगल्याचा सोहळा असतो. वरातीमागून येणारा घोडा आता वरातीचा पुढे येऊ लागलाय. समज आणि समाज, बांधिलकी याचा समन्वय साधत असताना लहान मुले, स्त्रिया आणि आपण सा:या मंडळीचा आनंदमयी विचार आपण करू या! आणि लगA वेळेवर लावण्यासाठी आग्रही राहू या.. नाही का.?