शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते...
2
"व्ही.के.सिंग याने कशी अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केली, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
3
धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार...
4
पश्चिम बंगालच्या निवडणुकीआधी वेगळीच खेळी; दारूच्या दुकानांबद्दल झाला मोठा निर्णय
5
महिला आरक्षण: सुप्रिया सुळेंनी CM फडणवीसांचे आव्हान स्वीकारले; म्हणाल्या, “वेळ-जागा सांगा”
6
गुरुपुष्यामृत योग २०२६: केवळ सोने खरेदीच नाही, तर आयुष्याला सोन्याची झळाळी देणारा 'गुरुपुष्य' योग!
7
नाशिक TCS प्रकरण: "लग्नानंतर रात्री कशात व्यस्त असतेस?" चौथ्या पीडितेचा थरकाप उडवणारा जबाब
8
गाडी खरेदी करताना शोरूममधूनच इन्शुरन्स घेणे बंधनकारक आहे का? काय आहे नियम?
9
जपानमध्ये ७.४ तीव्रतेचा भीषण भूकंप! उत्तर किनारपट्टीला 'सुनामी'चा तडाखा बसण्याची शक्यता; ३ मीटर उंच लाटांचा इशारा
10
प्रार्थना आणि अश्रू..., हवेत ४ तास मृत्यूशी सामना! हैदराबादहून हुबळीला जाणाऱ्या Fly91 मध्ये तांत्रिक बिघाड, सुदैवाने मोठा अनर्थ टळला!
11
एअरटेल ग्राहकांना महागाईचा शॉक! ८४ दिवसांचा प्लॅन महागला, ७९९ चा प्लॅनही हटवला; आता रिचार्जसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे
12
Bank Loan Rejection Reasons: पगार भक्कम असूनही बँक कर्ज नाकारतेय? 'या' ४ चुका ठरू शकतात कारणीभूत!
13
Sade Sati: साडेसातीचा विळखा की परिवर्तनाची संधी? मेष, कुंभ आणि मीन राशींसाठी आगामी काळ कसा असेल?
14
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
15
शेवटची इच्छा पूर्ण! 'स्वरस्वामिनी' आशा भोसले यांच्या अस्थींचे पवित्र गंगेत विसर्जन
16
इराण चर्चेसाठी पाकिस्तानात जाणार की नाही? इब्राहीम अजीजी म्हणाले, "प्रत्येक अट स्वीकारली जाणार नाही"
17
IPL 2026: रोहित शर्मा सलग दुसऱ्या सामन्यालाही मुकणार? GT vs MI मॅचआधी आली महत्त्वाची अपडेट
18
Latest Marathi News LIVE Updates: खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागण्या काय?
19
पश्चिम बंगालमध्ये ७ लाख नवीन मतदारांची भर; आगामी निवडणुकीत राजकीय गणिते बदलणार?
20
अमेरिकेचे सैन्य, इराणचे महाकाय जहाज; होर्मुझ सामुद्रधुनी सहा तास संघर्ष आणि घेतले ताब्यात; व्हिडीओ पहा
Daily Top 2Weekly Top 5

सुक्या नदीवरील पुलाला पडले छिद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:18 IST

सावदा : खान्देशची जीवनरेखा म्हणून ओळख असलेल्या बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील सावदा येथून जवळच असलेल्या सुक्या नदीवर असलेल्या पुलावर लहान-मोठी ...

सावदा : खान्देशची जीवनरेखा म्हणून ओळख असलेल्या बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील सावदा येथून जवळच असलेल्या सुक्या नदीवर असलेल्या पुलावर लहान-मोठी छिद्रे; तसेच खड्डे पडले आहेत. यामुळे हा पूल अत्यंत धोकादायक बनला असून वाहनधारकांना जीव मुठीत घालून प्रवास करावा लागत आहे. या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेविषयी प्रश्न निर्माण झाला असल्याने सावदा सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या तीन राज्यांना जोडणारा प्रमुख म्हणून या महामार्गाची ओळख आहे. रावेर व बऱ्हाणपूर येथून भुसावळ, जळगाव व पुढे जाण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा महामार्ग आहे. या पुलावरून केळीने व अन्य सामग्रीने भरलेल्या अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात रहदारी आहे. पुलाची अतिशय दुर्दशा झाली आहे. याकडे मात्र वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. पुलाच्या दुरवस्थेमुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पुलावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मुरूम टाकण्याचा प्रताप केला जात आहे. केळीने भरलेल्या ट्रक या ठिकाणाहून प्रवास करत असताना लहान-मोठे मुरुमाचे दगड उडत असतात. त्यामुळे प्रवाशांना इजा होण्याची शक्यता आहे. पुलावर पडलेल्या छिद्रांचे रूपांतर मोठ्या भगदाडात झाल्यावर एखादी दुर्घटना घडल्यानंतरच सार्वजनिक बांधकाम विभागाचे डोळे उघडतील का? असा संतप्त सवाल, आता परिसरातील नागरिक विचारू लागले आहेत.

पुलावर गवत व माती

या पुलावर दुतर्फा माती गोळा झाली असून, पावसाळ्यात या मातीवर मोठ्या प्रमाणात गवतही उगले आहे. पुलावर दुतर्फा माती साचल्याने पावसाळ्यातील पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळेच पुलावर मोठ-मोठे खड्डे पडत असतात.

केळीमुळे मोठी वाहतूक

रावेर तालुक्यातील सावदा शहराला केळीमुळे संपूर्ण देशात ओळख असून, तालुक्याच्या पूर्व भागातील व शेजारील मध्य प्रदेश राज्यात केळी निर्यातीसाठी शहरातून नेली जात असते. या पुलावरून केळीची शेकडो अवजड वाहने ये-जा करीत असतात. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी देखील या पुलाची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे.

काही वर्षांपूर्वी महाड तालुक्यातील सावित्री नदीवरील पूल खचल्याने मोठी जीवितहानी झाली होती. या पुलाकडे देखील दुर्लक्ष केल्यास सावित्री नदीवरील पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे, असे बोलले जात आहे.