जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
By चुडामण.बोरसे | Updated: June 12, 2025 11:09 IST2025-06-12T11:08:35+5:302025-06-12T11:09:27+5:30
वीज पुरवठा १४ तासानंपेक्षाही जास्त काळ खंडित

जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
जळगाव: जिल्हयात बुधवारी रात्री झालेल्या वादळी पावसाने गिरणा पट्ट्यातील केळी बागांना तडाखा बसला आहे. अनेक ठिकाणी झाडे पडल्याने रस्ते बंद झाले आहेत. वीज पुरवठा १४तासानंतरही सुरु झालेला नाही. भडगाव तालुक्यात अनेक ठिकाणी केळी बागा आडव्या झाल्या आहेत. कजगाव-नागद ( ता. भडगाव ) मार्गावर मोठे वृक्ष उन्मळून पडले आहेत. रस्त्यावर झाड आडवे पडल्याने हा मार्ग रात्री नऊ वाजेपासून बंद आहे. दरम्यान, बुधवारी रात्री वादळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश पाचोरा प्रांत यांनी दिले आहेत.