शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
2
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
3
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
4
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
5
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
6
निर्मात्याकडून एका रात्रीची ऑफर, भररस्त्यात गोंधळ... सूर्याचं नाव घेणारी खुशी मुखर्जी कोण?
7
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
8
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
9
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
10
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
11
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
12
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
13
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
14
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
15
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
16
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
17
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
18
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
19
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
20
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
Daily Top 2Weekly Top 5

गीता - भागवत करीती श्रवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 20:12 IST

गीता व भागवत हे दोन पौराणिक ग्रंथ वारकरी परंपरेत महत्वाचे मानले जातात

सध्या मार्गशीर्ष मास सुरू आहे. १९ डिसेंबर, बुधवारी रोजी गीताजयंती साजरी होत आहे. गीतेची व्याख्या माऊलींनी १५ व्या अध्यायात केलेली आहे.साचचि बोलाचे नव्हे हें शास्त्र ! पै.संसारू जिणतें हे शस्त्र । आत्मा अवतरविते मंत्रा अक्षरे इये ।।खरोखरच गीता हे (नुसते) शब्द पांडित्याचे शास्त्र नाही. तर ही गीता संसार जिंकणारे शस्त्र आहे. (फार काय सांगावे) या गीतेची ही अक्षरे आत्म्याला प्रकट करणारे मंत्र आहेत. श्रीमद् भगवत गीता हा विश्ववंदनीय ग्रंथ आहे.वारकरी परंपरेत काही आचारसंहिता आहेत. एक ठराविक वाड:मयाला जास्त महती आहे. संत तुकारामांच्या भाषेतगीता भागवत करीती श्रवण ।अखंड चिंतन विठोबाचे ।।गीता व भागवत हे दोन पौराणिक ग्रंथ वारकरी परंपरेत महत्वाचे मानले जातात. या ग्रंथाचे श्रवण व विठोबाचे चिंतन महत्वाचे मानले जाते. भारत खंड हा खरोखरच भाग्यवान आहे की, या खंडात भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतला व विश्ववंदनीय गीतेचा जन्म झाला. आपल्या संस्कृती व परंपरेचे वर्णन करताना एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते, ती म्हणजे हजारो वर्षापासून या भूमीत ज्ञानाची पूजा केली जाते आणि अंतिम सत्याचा शोध घेतला गेला. संपूर्ण विश्वामध्ये ज्ञान हेच सत्य आहे. तसेच या विश्वाचे एक अंतिम चैतन्य स्वरुप हे सुद्धा ज्ञान स्वरुपच आहे. या महान ग्रंथावर संत ज्ञानेश्वरी माऊलींनी बाराव्या शतकात मराठीत भाष्य केले. संत ज्ञानेश्वरांच्या भाषेत.गीत अलंकार नाम ज्ञानेश्वरी ।ब्रह्मानंद लहरी हेलावली ।।ज्ञानेश्वर माऊलींनी या विश्ववंदनीय ग्रंथावर मराठी भाषेत आपल्यासाठी वैदीक तत्वज्ञान, धर्म संकल्पना, अध्यात्मशास्त्र यावर सखोल असे चिंतन केले. श्रीमद् भगवतगीता व त्यावर माऊलींचे केलेले भाष्य हे खरे म्हणजे धर्मकीर्तन आहे. धर्म म्हणजे कर्तव्य असा अर्थ बऱ्याच तत्ववेत्यांनी सांगितला आहे. यातील रहस्य उलगडून बघावे लागते.‘अहा बोलाची वालिफ फेडिजे’असे स्पष्ट ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटले आहे. गीतेतील किंवा ज्ञानेश्वरीतील शब्दांच्या बाहेरील आवरण म्हणजे साली काढून शब्दांच्या मूळ अर्थाचा गर पाहणे आवश्यक आहे. म्हणूनच वरीलप्रमाणे गीतेची व्याख्या माऊलींनी केली आहे. आपल्या देशात सर्वसमावेशक अशी ‘वसुधैव कुटुंबकम’-संपूर्ण जग हे एक कुटुंबच आहे. जीवनप्रणाली आहे.श्रीमद् भगवतगीता हा ‘जीवनग्रंथ’ म्हणून ओळखला जातो. प्राचीनकाळी धर्मयुद्धासाठी कौरव-पांडव उभे ठाकले असताना आपले आत्मस्वकीय, गुरूजन, ऋषिमुनींनी हत्या करण्याच्या कल्पकतेने अत्यंत व्यथित झालेल्या महापराक्रमी अर्जुनाला नैराश्याच्या आणि वैफल्याच्या गर्तेत सापडलेल्या आपल्या परम मित्रास त्याच्या धर्मकर्तव्याची, अधर्माविरूद्ध कृती करण्याची जाणीव, भगवान श्रीकृष्णाने आपल्या दिव्य वाणीतून करून दिली, त्याच दिव्य आणि ज्ञान विज्ञानधिष्ठित अशा उपदेशाला ‘श्रीमद् भगवत गीता’ असे संबोधले जाते.- डॉ. कैलास पाटील, डेप्युटी जनरल मॅनेजर - एच.आर.,चॅसिस ब्रेक्स इंटरनॅशनल.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव