शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

‘बदले की आग’ मुळे उफाळले गँगवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:19 IST

सुनील पाटील जळगाव : वर्चस्वासाठी होत असलेली जीवघेणी स्पर्धा, गँगवार व त्यातून होणारे खून आणि या खुनातून निर्माण झालेली ...

सुनील पाटील

जळगाव : वर्चस्वासाठी होत असलेली जीवघेणी स्पर्धा, गँगवार व त्यातून होणारे खून आणि या खुनातून निर्माण झालेली ‘बदले की आग’ घातक ठरत चालली आहे. भावाचा खून केला म्हणून बदल्याच्या भावनेतून दोन दिवसांपूर्वीच शेख समीर जाकीर याने रेहानुद्दीन उर्फ भांजा नईमोद्दीन (दोन्ही.रा.पंचशील नगर, भुसावळ) याच्या मदतीने धम्मप्रिय मनोहर सुरडकर हा कारागृहातून जामिनावर बाहेर सुटताच त्याचा खून केला. त्यानंतर गुरूवारी माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राकेश याचा खून केला म्हणून त्याच्या भावाने आकाश मुरलीधर सपकाळे याचाही खून करण्याचा प्रयत्न गुरुवारी केला. दोन्ही घटनांचे साम्य एकच आहे. आपल्या भावाच्या खुनाच्या बदल्यात खूनच करण्याचा निश्चय असल्याचेच दोन्ही घटनांमधून स्पष्ट झाले आहे.

गेल्या वर्षी ४ नोव्हेंबर २०२० रोजी रात्री शिवाजी नगरातील स्मशानभूमीजवळ माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राकेश याचा खून झाला होता. या खुनाच्या गुन्ह्यात आकाश मुरलीधर सपकाळेसह पाच जणांना अटक झाली होती. यातील सर्व संशयितांना जामीन मिळाला आहे. त्यानुसार आकाशही काही दिवसांपूर्वीच जामिनावर बाहेर आला होता. खरे तर राकेशच्या खुनाची घटना घडली तेव्हाच बाबू व सोनू या दोन्ही भावांनी या खुनातील मारेकऱ्यांना संपविण्याचा निर्धार केला होता. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी शनी पेठ पोलीस ठाण्यात बाबू सपकाळे याची चौकशी केली तेव्हा हेच मुद्दे समोर आले. बाबू याने तशी स्पष्ट कबुलीच पोलीस अधीक्षकांसमोर दिली. त्यामुळे आकाश कारागृहातून बाहेर केव्हा येतो व गेम करण्यासाठी कोणती वेळ व तारीख योग्य राहील याच्या शोधात सपकाळे बंधू होते. त्यानुसार बाबू याने पहाटे तीन वाजताच विक्कीला फोन करुन आकाशचा गेम वाजवायचा म्हणून सांगून आठ वाजता तयारीत राहण्याचे सूचित केले होते. ठरल्याप्रमाणे आकाशवर हल्लाही झाला, मात्र प्रत्युत्तरात आकाशनेही हल्ला केल्याने त्यात त्याचा जीव वाचला.

पिस्तूल सहज मिळत असल्याने वाढली हिंमत

नशिराबाद महामार्गावर धम्मप्रिया सुरडकर याच्या खुनात गावठी पिस्तुलाचा वापर झाला तर, गुरूवारी कांचन नगरातही दोन पिस्तुलाचा वापर झालेला आहे. त्याशिवाय याच भागात काही महिन्यापूर्वी गोळीबार झाला होता. त्या गुन्ह्यातील लिंबू राक्या या गुन्हेगाराला गेल्याच आठवड्यात पिस्तुलासह पोलिसांनी पकडले. स्थानिक गुन्हे शाखेने यावल तालुक्यात शिक्षण घेणाऱ्या एका मुलाकडे पिस्तूल पकडले होते. वर्षभरात पिस्तुलासह अनेक आरोपी पकडले गेले. याचाच अर्थ गावठी पिस्तुलाचा बाजार जिल्ह्यात जोरात आहे. ते सहज व अगदी कमी किमतीत उपलब्ध होत असल्याने गुन्हेगारांची हिंमत वाढत चालली आहे. जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेले उमर्टी (मध्य प्रदेश) हे पिस्तूल निर्मितीचे मुख्य केंद्र आहे. त्याशिवाय भुसावळ व जळगाव येथून रेल्वेची सुविधा असल्याने तस्करीला मोठा वाव आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक किंवा महासंचालक यांच्याकडून शस्त्राबाबत मोहीम राबविण्याचे आदेश येतात, तेव्हा मोठ्या प्रमाणात शस्त्र पकडले जातात, हे देखील तितकेच खरे आहे.

कायद्याचा धाक संपला की आणखी....

कुटुंबातील सदस्याच्या खुनाचा बदला खुनानेच घ्यायचा, हा दोन गट, कुटुंब व समूहाशी निगडित विषय आहे, त्यामुळे त्याची कल्पना पोलिसांना असेलच असे नाही. असे असले तरी गँगवारमधील घडामोडीची माहिती गुन्हे शोध पथक असेल किंवा स्थानिक गुन्हे शाखेला असू नये यापेक्षा दुर्दैव दुसरे नाही. या गुन्हेगारांना खरंच कायद्याचा धाक उरला नाही का?, असा देखील प्रश्न निर्माण होत आहे. खुनाच्या गुन्ह्यात वर्षभरात आरोपी जामिनावर बाहेर पडू लागले, शस्त्राच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींची देखील हीच गत आहे. न्यायव्यवस्था व पोलीस यंत्रणा यांचा धाक गुन्हेगारांना राहिला नसल्याचे या दोन घटनांमधून सिद्ध होत आहे.