शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
4
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
5
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
6
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
7
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
8
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
9
सलमान खान फायरिंग प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबाची मुंबई उच्च न्यायालयात धाव, सीबीआय चौकशीची मागणी
10
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
11
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
12
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
13
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
14
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
15
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
16
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

मुंबईहून जळगाव येणारे विमान दोन दिवसांपासून रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 10:23 PM

दाट धुक्यांचा परिणाम : अहमदाबादहून येणारे विमानही विलंबाने

जळगाव : दाट धुक्यांमुळे घावपट्टीवर विमान उतरवितांना मोठ्या प्रमाणावर अडचणी येत असल्यामुळे मुंबईकडून सायंकाळी जळगावला येणारे विमान दोन दिवसांपासून रद्द करण्यात येत आहे. तर अहमदाबादहूनही सकाळी येणारे विमान एक तास विलंबाने येत असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.गेल्या आठवड्यात अतिवृष्टी आणि खराब हवामानामुळे वारंवार विमानसेवा रद्द झाल्याचा प्रकार घडल्यानंतर, आता गेल्या दोन दिवसापासून वातावरणात अतिशय दाट धुके पडत असल्यामुळे याचाही विमान सेवेवर परिणाम झाला आहे. विमान धावपट्टीवर उतरतांना पायलटला किमान ५ किलोमीटर अंतरावरुन धावपट्टी दिसणे आवश्यक आहे. मात्र, जळगाव विमानतळ परिसरात अतिशय दाट धुके असल्यामुळे पायलटला ही धावपट्टी अस्पष्ट दिसत आहे. त्यामुळे अहमदाबादहून सकाळी १०. २५ मिनिटांनी येणारे विमान, सकाळी साडेअकराला येत आहे. तसेच मुंबईवरुन येतानांही सायंकाळी अतिशय दाट धुके असल्यामुळे जळगावला विमान न येता मुंबईहून अहमदाबादला रवाना होत आहे. दोन दिवसापासून हा प्रकार घडत आहे.अनेक प्रवाशांकडून तिकीट रद्दगेल्या दोन दिवसापासून दाट धुक्यामुळे मुंबईकडून येणारी विमान सेवा रद्द होत असल्यामुळे, अनेक प्रवाशांनी तिकीट रद्द केले जात असल्याची माहिती विमान कंपनीच्या सुत्रांनी दिली. तसेच यामुळे तिकीट विक्रीवर मोठा परिणाम झाला असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले.विमान कंपनीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या दोन दिवसापासून जळगावहून मुंबईला जाण्यासाठी विमानाला दोन तासांपर्यंत विलंब होत आहे. मुंबईला गेल्यानंतर पुन्हा कोल्हापूरला जातांना विलंब होतो. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याने, मुंबईहून कोल्हापूरसाठी स्वतंत्र विमान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ज्यामुळे मुंबईहून जळगावला लवकर विमान येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाJalgaonजळगाव