शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

नातू झाला तरी सासरी छळ सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:12 IST

स्टार ७९९ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत चाललेली आहे. बलात्कार, विनयभंग आत्महत्येस प्रवृत्त ...

स्टार ७९९

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत चाललेली आहे. बलात्कार, विनयभंग आत्महत्येस प्रवृत्त करणे यासारख्या घटनांपेक्षा कुटुंबात छळाच्या घटना अधिक आहेत. जळगाव जिल्ह्यात दीड वर्षात पती-पत्नी यांच्यातील वादाच्या १५९३ घटना घडलेल्या आहेत. त्यात भादंवि कलम ४९८ चे २१२ गुन्हे दाखल झालेले आहेत तर ११४ प्रकरणांमध्ये तडजोड घडवून आणण्यात आली आहे. १३० प्रकरणांमध्ये पती-पत्नी न्यायासाठी न्यायालयात गेले आहेत.

नॅशनल क्राईम रिपोर्ट नुसार विवाहानंतर महिलांवर हिंसाचार केल्याच्या तक्रारीचे राष्ट्रीय प्रमाण २८.९ इतके आहे. महाराष्ट्राचे प्रमाण २१.४ टक्के आहे.जळगाव जिल्ह्यात अंदाजे दोन टक्के हे प्रमाण आहे. खासकरून शहरी व सुशिक्षित लोकांमध्येच हे प्रमाण अधिक आहे. पती किंवा पत्नीचे बाहेर इतर लोकांशी असलेली जवळीक, मालमत्ता नावावर करणे, तुम्ही माझे लाड केलेच नाहीत, दागिने घेऊन दिले नाहीत. बाहेर फिरायला घेऊन जात गेले नाहीत. तारुण्यात देखील बाहेर कुठे घेऊन गेले नाहीत, आता नातू पणतूचे झालो. वेळ आहे तरीदेखील दुर्लक्ष करतात, दुसऱ्यांना मात्र वेळ देतात अशी कारणे पत्नीकडून सांगण्यात आलेली आहेत.

२०२० मध्ये जिल्ह्यात कलम ४९८ अंतर्गत दाखल गुन्हे : ९७

समझोते झालेले प्रकरणे : ५९

न्यायालयात गेलेले : ६०

२०२१ मध्ये जिल्ह्यात कलम ४९८ अंतर्गत दाखल गुन्हे : ११५

समझोते झालेले प्रकरणे : ५४

न्यायालयात गेलेले : ७०

बाॅक्स

पन्नाशी ओलांडली तरी छळ सुरुच

कौटुंबिक छळाच्या घटना या केवळ तरुण दाम्पत्यांमध्येच आहेत,असे नाही तर वयाची पन्नाशी ओलांडलेल्या दाम्पत्यात देखील आहेत. दोन दिवसापूर्वीच ७० वय असलेले वृद्ध महिला सहाय्य कक्षात आले होते. पत्नी व मुलांकडून आपला छळ होत असल्याची तक्रार त्यांनी दिली. यात पत्नीचे वय ६२ वर्ष आहे.

प्रतिक्रिया...

रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका दाम्पत्यात मालमत्ता व सोने चांदीचे दागिने घेण्यावरून वाद सुरू आहे. या प्रकरणावर नाशिकमध्ये तडजोड केली जात आहे. त्याशिवाय पती आपल्याकडे नेहमीच दुर्लक्ष करतो या कारणावरून पती-पत्नीत वाद सुरु आहेत. यापूर्वी वर्षभरात सात ते आठ प्रकरणांमध्ये तडजोड घडवून आणली.

- मंगला बारी, सामाजिक कार्यकर्त्या

प्रतिक्रिया...

गेल्या पाच वर्षात ५० व त्यापेक्षा जास्त वय असलेल्या दाम्पत्यांमधील वादाचे १४ प्रकरणे हाताळली. त्यात सहा ते सात प्रकरणांमध्ये यशस्वी तडजोड झाली. बहुतांश‌ प्रकरणात पती किंवा पत्नी यांचे बाहेर त्रयस्त व्यक्तीशी असलेली जवळीक व आर्थिक ही कारणे समोर आली आहे.

- निवेदिता ताठे, सामाजिक कार्यकर्त्या