शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

लासूर येथे सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 13:06 IST

माळी यांना कर्जमाफीचा लाभ नाहीच

ठळक मुद्देझाडाला दोर बांधून गळफास घेऊन आपली संपवली जीवनयात्रा अकस्मात मृत्यूची नोंद

चोपडा, जि. जळगाव : चोपडा तालुक्यातील लासूर येथील वासुदेव बुधा माळी (महाजन, वय ६५) या शेतक-याने सततच्या नापिकीने व कर्जबाजारीपणामुळे शेतात गळफास घेत आत्महत्या केली.याबाबत प्राप्त वृत्त असे की, १६ रोजी रात्री ११ वाजता शेतात कापूस पिकाला पाणी भरण्यासाठी गेलेल्या वासुदेव बुधा माळी या शेतकºयाने १७ रोजी सकाळी ६ वाजेपूर्वी शेतातील झाडाला दोर बांधून गळफास घेतला. गतवर्षी आपल्या तीन एकर शेतात कापूस लावला मात्र तो बोंडअळीने फस्त केला. त्यावेळी कांदा पिकाला भाव चांगल्या प्रकारे होता म्हणून त्यांनी शेजारच्या शेतक-याकडून पाणी घेऊन कांदा पिकाचे उत्पादन घेतले. मात्र तो कांदा काढणीवर येताच दोन रुपये किलोच्या दराने त्यांना विकावा लागला. या सततच्या नापिकीने व उत्पादन खर्चही न निघाल्याने वासुदेव माळी कर्जबाजारी झाले. आपला संसार कसा भागणार अशा विवंचनेत ते नेहमी असायचे तरीही त्यांनी मोठ्या उमेदीने यावर्षी दुसºया शेतकºयाकडून पाणी घेऊन एक एकर कापूस लावला त्यास रात्री पाणी भरण्यासाठी ते गेलेले होते. तेथेच त्यांनी झाडाला दोर बांधून गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.माळी यांना कर्जमाफीचा लाभ नाहीचमोठा गाजावाजा करीत शासनाने कर्जमाफी केल्याचा दावा केला. त्या योजनेचा आपल्यालाही लाभ होईल म्हणून वासुदेव माळी यांनी कर्जमाफीचा आॅनलाईन अर्ज केला, मात्र त्यांच्यावर असलेले ४३ हजार रुपयांचे कर्ज माफ झाले नाही. कर्जमाफीचाही लाभ त्यांना मिळाला नसल्याने यावर्षीच्या नवीन कर्ज वितरणात त्यांचे नाव नसल्याने ते व्यथीत होते. आता पुढे शेती कसण्यासाठी पैसा कसा उभारावा या विवंचनेत त्यांनी आत्महत्या केली असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगा असा परिवार आहे.याबाबत विजय शिवराम माळी रा. लासूर यांच्या खबरीवरून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुरन २९/२०१८ सी आरपीसी १७४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस निरीक्षक भीमराव नंदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार काशिनाथ पाटील हे करीत आहेत.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याJalgaonजळगाव