शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

लासूर येथे सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 13:06 IST

माळी यांना कर्जमाफीचा लाभ नाहीच

ठळक मुद्देझाडाला दोर बांधून गळफास घेऊन आपली संपवली जीवनयात्रा अकस्मात मृत्यूची नोंद

चोपडा, जि. जळगाव : चोपडा तालुक्यातील लासूर येथील वासुदेव बुधा माळी (महाजन, वय ६५) या शेतक-याने सततच्या नापिकीने व कर्जबाजारीपणामुळे शेतात गळफास घेत आत्महत्या केली.याबाबत प्राप्त वृत्त असे की, १६ रोजी रात्री ११ वाजता शेतात कापूस पिकाला पाणी भरण्यासाठी गेलेल्या वासुदेव बुधा माळी या शेतकºयाने १७ रोजी सकाळी ६ वाजेपूर्वी शेतातील झाडाला दोर बांधून गळफास घेतला. गतवर्षी आपल्या तीन एकर शेतात कापूस लावला मात्र तो बोंडअळीने फस्त केला. त्यावेळी कांदा पिकाला भाव चांगल्या प्रकारे होता म्हणून त्यांनी शेजारच्या शेतक-याकडून पाणी घेऊन कांदा पिकाचे उत्पादन घेतले. मात्र तो कांदा काढणीवर येताच दोन रुपये किलोच्या दराने त्यांना विकावा लागला. या सततच्या नापिकीने व उत्पादन खर्चही न निघाल्याने वासुदेव माळी कर्जबाजारी झाले. आपला संसार कसा भागणार अशा विवंचनेत ते नेहमी असायचे तरीही त्यांनी मोठ्या उमेदीने यावर्षी दुसºया शेतकºयाकडून पाणी घेऊन एक एकर कापूस लावला त्यास रात्री पाणी भरण्यासाठी ते गेलेले होते. तेथेच त्यांनी झाडाला दोर बांधून गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.माळी यांना कर्जमाफीचा लाभ नाहीचमोठा गाजावाजा करीत शासनाने कर्जमाफी केल्याचा दावा केला. त्या योजनेचा आपल्यालाही लाभ होईल म्हणून वासुदेव माळी यांनी कर्जमाफीचा आॅनलाईन अर्ज केला, मात्र त्यांच्यावर असलेले ४३ हजार रुपयांचे कर्ज माफ झाले नाही. कर्जमाफीचाही लाभ त्यांना मिळाला नसल्याने यावर्षीच्या नवीन कर्ज वितरणात त्यांचे नाव नसल्याने ते व्यथीत होते. आता पुढे शेती कसण्यासाठी पैसा कसा उभारावा या विवंचनेत त्यांनी आत्महत्या केली असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगा असा परिवार आहे.याबाबत विजय शिवराम माळी रा. लासूर यांच्या खबरीवरून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुरन २९/२०१८ सी आरपीसी १७४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस निरीक्षक भीमराव नंदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार काशिनाथ पाटील हे करीत आहेत.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याJalgaonजळगाव