शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

जळगाव जिल्ह्यातील हतनूर जलाशयावर पानमांजरीचे अस्तित्व

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 12:08 PM

खान्देशात पहिलीच नोंद, वन्यजीव संरक्षण संस्थेच्या अभ्यासकांना आढळला प्राणी

विजयकुमार सैतवाल

जळगाव : जिल्ह्यातील हतनूर जलाशय परिसरात पानमांजर हा संकटग्रस्त प्राणी असल्याचे सिद्ध झाले असून त्याची दखल आंतरराष्ट्रीय ‘इला जर्नल’ या आंतराष्ट्रीय पुस्तिकानेही घेतली आहे. खान्देशात प्रथमच हा प्राणी आढळून आला असून जळगाव जिल्ह्याच्या जैवविविधता समृद्धतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असल्याचे सांगितले जात आहे.

जळगावातील वन्यजीव संरक्षण संस्थेचे अभ्यासक वर्षभर जिल्ह्यातील विविध पानवठ्यांचे निरीक्षण करून वनस्पती, वन्यजीव आणि पक्षांची नोंद घेत असतात. याच नोंदीमध्ये आता ‘आॅटर’ अर्थात पानमांजर या संकटग्रस्त वन्यजीवांची भर पडली आहे.हतनूर धरणाच्या बॅक वॉटर भागात १८ जानेवारी २०१९ रोजी पक्षी निरीक्षण करीत असताना वन्य जीव संरक्षण संस्थेचे राहुल सोनवणे व प्रसाद सोनवणे यांना काहीतरी वेगळी हालचाल जाणवली. त्या वेळी त्यांनी बारीक निरीक्षण केले असता सदर प्राणी पानमांजर असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर या भागात वेळोवेळी भेट देत सदर प्राण्यांच्या नोंदी घेत त्याचे निरीक्षण करून अभ्यास केला. या दरम्यान त्याचे छायाचित्रेदेखील घेतले.

ही माहिती वन्यजीवांविषयी काढण्यात येणाऱ्या ‘इला जर्नल’ या आंतरराष्ट्रीय पुस्तकासाठी पाठविण्यात आली. यावर पूर्ण माहिती घेत ‘इला जर्नल’ने ही माहिती प्रसिद्धी केली. या पूर्वी संस्थेचे वनस्पती, पक्षी, सर्प यावर शोध निबंध प्रकाशित झाले आहेत. यात पानमांजर या प्राण्याची नोंद महत्त्वपूर्ण ठरली आहे. मुक्ताई भवानी व्याघ्र संवर्धन क्षेत्रातदेखील सदर प्राण्यांची नोंद वनरक्षक रहीम तडवी यांनी घेतली आहे.

पहिलीच नोंद

जळगाव जिल्ह्यात तसेच खान्देशात या प्राण्याचे अस्तित्व आहे की नाही, याची माहिती घेण्यासाठी संस्थेच्या अभ्यासकांनी विविध गॅझेटचा अभ्यास केला. मात्र त्यात कोठेही पानमांजराची नोंद आढळली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ही पहिलीच ‘फोटोग्राफीक’ नोंद असल्याची माहिती अभ्यासकांनी दिली.

सदर नोंदीसाठी उप वनसंरक्षक दिगंबर पगार यांचे मार्गदर्शन लाभल्याचे वन्यजीव संरक्षण संस्थेच्यावतीने सांगण्यात आले. संस्थेचे रवींद्र सोनवणे, बाळकृष्ण देवरे, रवींद्र फालक, वासुदेव वाढे, सतीश कांबळे, योगेश गालफडे, गौरव शिंदे, सुरेंद्र नारखेडे, वनरक्षक रहीम तडवी, डोलारखेडा ग्रामस्थ यांनी पुढाकार घेतला.

संकटग्रस्त प्राणी

जगात कोणते वन्यजीव संकटात आहे, याची नोंद घेत दरवर्षी माहिती प्रसिद्ध करणाºया ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेषन आॅफ नेचर’ (आययुसीएन) या संस्थेने त्यांच्या यादीमध्ये पानमांजराची नोंद संकटग्रस्त प्राणी म्हणून नोंद केली आहे. प्रदूषण, पाणथळ जागा नष्ट होणे, शिकार, अनियंत्रित मासेमारी, भक्षाची कमतरता याकारणांमुळे ही प्रजाती जागतिक स्तरावर धोक्यात आली आहे. अशा स्थितीत हा संकटग्रस्त पाणी जळगाव जिल्ह्यात आढळून आल्याने हतनूर जलाशयाला आणि वाढोदा व्याघ्र संवर्धन क्षेत्रास आणखी महत्त्व प्राप्त होईल, असा विश्वास वन्यप्रेमींकडून व्यक्त होत आहे.वन्यजीव संरक्षण संस्थेच्या अभ्यासकांना वन विभागाच्यावतीने नेहमी सहकार्य केले जाते. त्यांच्या अभ्यासादरम्यान अनेक प्राणी, वनस्पती आढळून आल्या असून त्याची नोंद वनविभागाकडे आहे. आता पानमांजर प्राण्याचा अहवाल अद्याप आलेला नाही.

- दिगंबर पगार, उप वनसंरक्षकवेळोवेळच्या निरीक्षण आणि अभ्यासावरून आता पानमांजराचे आपल्या भागात अधिवास आहे हे सिद्ध झाले आहे. अशा प्रकारचे अनेक दुर्मिळ संकटग्रस्त प्राणी, पक्षी, जलचर, जिल्ह्यात अधिवास करून आहेत हे आपले भूषण असून हतनूर जलाशयाला आणि वाढोदा व्याघ्र संवर्धन क्षेत्रास आणखी महत्त्व प्राप्त होईल.

- राहुल सोनवणे, वन्यजीव अभ्यासक, वन्यजीव संरक्षण संस्था

 

टॅग्स :environmentपर्यावरणJalgaonजळगाव