शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
5
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
6
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
7
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
8
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
9
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
10
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
11
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
12
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
13
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
14
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
15
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
16
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
17
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
18
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
19
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
20
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य

लोकशाही हवी की हुकमशाही, हे ठरवणारी निवडणूक  - धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 7:48 PM

चाळीसगाव येथे महाआघाडीची सभा

चाळीसगाव - ही निवडणूक आणि तूमचे एक मत केवळ एका जिल्ह्याच्या उमेदवाराचे भवितव्य ठरवणारे नाही तर या देशातली लोकशाही टिकवायची का नरेंद्र मोदी यांची हुकूमशाही आणायची हे ठरवणारी निवडणूक आहे. त्यामुळेच विचारपूर्वक मतदान करा असे आवाहन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले आहे. तसेच भाजपचा जळगावचा उमेदवार हा हफ्तेखोर आहे, अवैध धंदे त्याच्या नावावर आहेत अशा हफ्तेखोरांच्या हाती जळगावची सत्ता द्याल का ? असा सवालही मुंडे यांनी उपस्थित केला.महाआघाडीचे जळगाव मतदारसंघाचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारार्थ चाळीसगाव येथे मुंडे यांची जाहीर सभा झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुंडे म्हणाले की, मी प्रचाराच्या निमित्ताने अवघा महाराष्ट्र फिरत आहे . मात्र मला कुठेही मोदींची लाट दिसत नाही, देशात सध्या लाट नाही महाआघाडीचे वादळ आहे. या वादळात कमळाच्या पाकळ्या अशा उडून जातील की अमित शाह आणि मोदी बसले तरी त्यांना पाकळ्या मोजता येणार नाही इतकी वाईट अवस्था सध्या भाजपची आहे. सरकारच्या धोरणांवर टीका करूय मोदी हे नैराश्यातून पवार यांच्यावर टीका करत आहेत, असे म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदींचा समाचार घेतला.शहीदांबद्दल चुकीचे बोलणाऱ्यांना लाज नाही का?भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह शहीद हेमंत करकरेंबाबत वाट्टेल ते बोलत आहे. आणि याचंं मोदींतर्फे समर्थन केले जात आहे. मोदींना लाज वाटत नाही का ? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.यावेळी आमदार हरिभाऊ राठोड, उमेदवार गुलाबराव देवकर, माजी आमदार राजीव देशमुख , अशोक खलाणे, आर.के.पाटील, समाधान पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर माजी आमदार मनीष जैन, दिलीप सोनवणे, रंगनाथ काळे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष रवींद्र पाटील, ओबीसीचे प्रदेश अध्यक्ष प्रमोद मोरे, शशिकांत साळुंखे, प्रदीप देशमुख, अनिल निकम, कल्पना पाटील, दिनेश पाटील, श्याम देशमुख, ईश्वर जाधव, विजय जाधव, सोनल साळुंखे,आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन रामचंद्र जाधव यांनी तर आभार दिनेश पाटील यांनी मान्ले. यावेळी खासदार ए.टी. पाटील यांचे साडू समाधान पाटील यांचे सह अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

टॅग्स :Politicsराजकारण