शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

ममुराबाद परिसरात डेरेदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:14 IST

वन विभाग सुस्त: लाकूडतोडे, वखार चालकांना नाही धाक लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद: परिसरात निंब, भोकर, आंबा, चिंच, पिंपळ तसेच ...

वन विभाग सुस्त: लाकूडतोडे, वखार चालकांना नाही धाक

लोकमत न्यूज नेटवर्क

ममुराबाद: परिसरात निंब, भोकर, आंबा, चिंच, पिंपळ तसेच बाभळीसारख्या डेरेदार वृक्षांची सर्रास कत्तल सुरू असून, वन विभागाने त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने लाकूडतोड्यांसह वखार चालकांना कायद्याचा कोणताच धाक आता राहिलेला नाही. पर्यावरणप्रेमी नागरिकांनी त्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

झाडे कोणाचीही व कोणतीही असो, ती तोडायची म्हटल्यास वन विभागाची रीतसर परवानगी घ्यावी लागते. विनापरवानगी झाडे तोडल्यास तो गुन्हा समजला जातो. कायद्याने संबंधिताला शिक्षासुद्धा होते. स्वत:च्या मालकीची झाडेही विनापरवानगी तोडता येत नाहीत. महाराष्ट्र शासनाने फेलिंग ट्री (रेग्युलेशन) अ‍ॅक्ट १९६४ अन्वये झाडे तोडणेबाबत कायदेशीर तरतूद केली आहे. याशिवाय महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६६ अन्वये खासगी जागेवरील कोणत्याही झाडांना मालकी हक्क असतानासुद्धधा विनापरवानगी तोडता येत नाहीत. मात्र, झाड मृत्यू पावले असेल किंवा वादळाने पडले असेल, झाडाचा वाहतुकीला अडथळा होत असेल, याशिवाय आग, वीज, वादळी पाऊस किंवा अन्य नैसर्गिक कारणाने झाडाची नासधूस झाली असेल किंवा शेती करण्यास झाडामुळे अडथळा निर्माण होत असेल, तरच झाड तोडण्याची परवानगी वृक्ष अधिकारी देऊ शकतो. अर्थात, जेवढी झाडे तोडली जात आहेत तेवढी झाडे अन्यत्र लावण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्याकडून दिले जातात.

विनापरवानगीने झाडे तोडली, तर कायद्याने गुन्हा आहेच; परंतु ती झाडे जप्त करण्याचा अधिकार वन विभागाला आहे. केवळ झाडेच नव्हे, तर त्या तोडलेल्या झाडांपासून बनवलेल्या वस्तूदेखील कायद्याने जप्त होऊ शकतात आणि वृक्ष तोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होते. वृक्ष तोडण्याची परवानगी मागितल्यापासून साठ दिवसांत वृक्ष अधिकाऱ्याने काहीएक कळविले नाही किंवा निर्णय दिला नाही, तर त्याने परवानगी दिलेली आहे, असे समजणे ही तरतूद कायद्यात आहे. वृक्ष अधिकाऱ्याने परवानगी दिली नाही, तर ३० दिवसात जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील करण्याचा अधिकार कायद्याने दिला आहे. प्रत्यक्षात झाडे तोडणाऱ्यांकडून कोणतीच कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जात नसल्याचे दिसून येेते.

-------------------

झाडांची संख्या दिवसेंदिवस कमी

वृक्षतोडीबाबत कडक कायदा असताना अनेक वर्षे जुनी झाडे लाकूडतोडे व वखार चालकांकडून कत्तल केली जात आहेत. शेतीशिवारात झाडांची संख्या त्यामुळे दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. कोणतीच परवानगी न घेता रात्रंदिवस वृक्षतोड सुरू असतांना वन विभागानेही डोळ्यांवर कातडे ओढून घेतल्याचा आरोप होत आहे.

------------------------

फोटो-

ममुराबाद येथे वनविभागाच्या दुर्लक्षामुळे डेरेदार वृक्षांची सर्रास कत्तल सुरू असून, लाकूडतोडे व वखार चालकांनी कायदा अक्षरशः धाब्यावर बसवला आहे. (जितेंद्र पाटील)