शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
4
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
5
महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
6
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
7
"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे
8
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
9
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
10
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
11
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
12
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता
13
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
14
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
15
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
16
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
17
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
18
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
19
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
20
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव

भडगाव तालुक्यावर दुष्काळाचे सावट दाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 00:46 IST

यंदाच्या खरीप हंगामात पावसाने दगा दिल्याने भडगाव तालुक्यात दुष्काळाचे दाट सावट निर्माण झाले आहे. खरीप हंगाम हातातून गेल्याने अंतिम पीक पैसेवारी ५० पैशाच्या आत लावण्यासह तालुका पाणीटंचाईच्या वाटेवर असल्याने प्रशासनाने नियोजन करण्याची मागणी केली जात आहे.

ठळक मुद्देयंदा खरीप हंगाम निम्याने घटला रब्बीच्या आशेवर फिरणार पाणी

भडगाव : तालुक्यावर दुष्काळाचे घोंघावणारे सावट दाट झाले असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. तालुका आताच पाणी टंचाईच्या वाटेवर वाटचाल करू लागला असून यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या हाती काहीही उत्पन्न पडणार नसल्याने अंतिम पैसेवारी ५० पैशांच्या आत लावून तालुका दुष्काळी म्हणून जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.यंदा संपूर्ण गिरणा पट्ट्यात पावसाअभावी दुष्काळाची काळी छाया पसरू लागल्याने सर्वांचेच तोंडचे पाणी पळाले आहे. खरीप हंगाम तर वाया गेलाच परंतु पावसाळ्याची स्थिती जेमतेम सुद्धा न राहिल्याने नदी, नाले, पाझर तलाव बहुतांश कोरडे पडले आहेत, तर विहीरींनी आताच तळ गाठला आहे. परतीच्या पावसाची देखील आशा मावळल्यात जमा आहे.दरम्यान, भङगाव तालुक्यात फक्त ४०९ मि. मी. म्हणजे सरासरीच्या ६१ टक्के पाऊस बरसल्याची महसूल प्रशासनाने नोंद केली आहे. तालुक्यात चारही महसूल मंडळात महसूल विभागाने पावसाची केलेली ही नोंद परिस्थितीच्या विपरीत असल्याचे जाणकारांमध्ये बोलले जात आहे. पावसाअभावी पिके वाया गेलेली असून आताच पाणी टंचाई उग्ररुप धारण करीत आहे. जेथे पिण्याच्या पाण्याचेच वांधे होणार आहेत, तेथे रब्बी हंगामाची तर काडीमात्रही शाश्वती उरलेली नाही. दरम्यान, प्रशासनाने प्रथम पीक नजर पैसेवारी ५० पैशाच्या आत लावली असून अंतीम पैसेवारी ५० पैशाचे आत लावावी, आणि प्रशासनाने भङगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष दयावे, प्रशासनाने पाणी टंचाई रोखण्यासाठी आतापासूनची पावले उचलावी. अशी रास्त मागणी भङगाव तालुक्यातील नागरीक व शेतकरी वर्गातून होतांना दिसत आहे.खरीप हंगाम निम्याने घटलाया वर्षी तालुक्यात फारसा पाऊस झाला नाही. मात्र तो वेळेवर बरसल्याने पेरण्याही चांगल्या झाल्या. पिकेही कधी जोमात तर कधी कोमात अशी स्थिती राहिली. पावसाच्या बरसण्याच्या कमी अधिक चालीवर पिके वाढत, वाचत होती. अशात जोमात आलेल्या पिकांना दोन पावसांची गरज होती, मात्र तो गायब झाल्याने त्याचा फटका पिकांना बसला आणि खरीप हंगाम निम्याने घटल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. शेतीत टाकलेला पैसा वाया गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापङला आहे. त्यात जी काही पिके आली होती. त्या मालाला भावदेखील मिळत नसल्याने शेतकरी भरडला गेला आहे. त्यात शेतमजुरीचे वाढलेल्या दरामुळे शेती व्यवसायच धोक्यात आला आहे.पाणी टंचाईवर प्रशासनाने नियोजन करावेयंदा पाणी टंचाई वाढण्याची चिंता सतावत आहे. नागरीकांसह मुक्या जनावरांचाही पाणी प्रश्न गंभीर बनण्याचे संकेत मिळत आहेत. गावागावात पिण्याचे पाणी पुरवठा करणाºया विहीरी आतापासूनच तळ गाठत आहेत. पाझर तलाव, नदी कोरडी आहे. गिरणा धरणानेही चांगला पाऊस न बरसल्याने केवळ पन्नाशीच गाठली आहे. त्यामुळे गिरणाकाठावरच्या जनतेचा फक्त पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास हातभार लागणार आहे. त्यामुळे आता सध्या गिरणा नदीला पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी जोर धरीत आहे.रब्बीच्या आशेवर फिरणार पाणीभङगाव तालुक्यात पावसाळा चांगला न झाल्याने खरीप हंगाम कसाबसा निघाला. नंतर मात्र पावसाची कमतरता अन जमीनीतील ओल विहीरींची खालावलेली पाणी पातळी यामुळे त्या आताच आटू लागल्या असून पिकांना पाणी देतांना त्या टप्पा घेत आहेत. पुढे काय स्थिती राहील ही शेतकºयांना चिंता वाटत आहे. तालुक्यात केटी वेअर व ३१ पाझर तलावापैकी ४० टक्के पाझर तलाव कोरङे पङलेले आहेत. तर उर्वरीत पाझर तलावात सरासरी १० ते १५ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. सद्या आॅक्टोबर हीटमुळे पाण्याचे बाष्पीभवन जोरात होत असून ज्याच्यामध्ये जेमतेम पाणी आहे, ते पाझर तलावदेखील कोरडे पङण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे पाणी टंचाईचा फटका यंदा रब्बी हंगामाला बसणार असून रब्बीच्या पेरणीतही मोठी घट निर्माण होण्याची शेतकरी वर्गात चिंता व्यक्त होत आहे. केळी, ऊस, मोसंबी, लिंबु, यासह बागायती पिकांनाही फटका बसण्याची शेतकºयांना मोठी धास्ती वाटू लागली आहे.