शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
7
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
8
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
9
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
10
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
11
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
12
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
13
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
15
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
16
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
17
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
18
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
20
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP

वडील जेवणासाठी घरी जाताना दिसले, आणि काही मिनिटांतच आला अपघाताचा फोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 20:40 IST

ट्रॅक्टरच्या धडकेत मनपा कर्मचारी ठार : शिवकॉलनी रेल्वे उड्डाण पुलावरील घटना

जळगाव : जेवणासाठी घरी निघालेल्या मनपा कर्मचारी नारायण मांगो हटकर (५८, रा. तांबापुरा, ह.मु. नंदनवन कॉलनी) यांचा ट्रॅक्टरच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास महामार्गावरील शिवकॉलनी रेल्वे उड्डाण पुलावर घडली. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच अपघातानंतर घटनास्थळावरून ट्रॅक्टरचालक पसार झाला.नंदनवन कॉलनीत नारायण मांगो हटकर हे कुटुंबीयांसह वास्तव्यास होते़ ते महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कार्यरत असल्यामुळे त्यांच्याकडे पाणी सोडण्याची जबाबदारी होती़ शनिवारी सकाळी कामावर हजेरी लावल्यानंतर त्यांनी दुपारी कोल्हेनगर परिसरातील नळांना पाणी सोडले. हे काम आटोपल्यानंतर ते दुचाकीने (क्र. एमएच.१९.बीई.३१०८) जेवणासाठी नंदनवन कॉलनीतील घरी जाण्यासाठी निघाले. शिवकॉलनी स्टॉप ओलांडल्यानंतर उड्डाण पुलावरून जात असताना त्यांना भरधाव ट्रॅक्टरने धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रॅक्टरचालक हा घटनास्थळावरून ट्रॅक्टर घेऊन पसार झाला.बहिणीसोबत जात असताना अपघाताचा आला फोन..मयत नारायण हटकर यांचा मुलगा पवन हटकर हा रिक्षा चालविण्याचा व्यवसाय करतो. दुपारी पवन हा सुद्धा शहरात काही कामानिमित्त येण्यासाठी बहिणीला घेऊन नंदनवन कॉलनीतून निघाला होता. शिवकॉलनी स्टॉपजवळून जात असताना त्यास वडील जेवणासाठी घरी जात असल्याचे दिसून आले. पण, काही अंतर कापल्यावर मुलगा पवन याला वडिलांचा अपघात झाल्याचा फोन आला. पवनने तातडीने रिक्षा वळवली व अपघातस्थळी धाव घेतली. वडील जखमी पडल्याचे दिसताच मुलगी आशा आणि मुलगा पवन यांनी त्वरित जखमी अवस्थेत त्यांना रिक्षात टाकून खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, त्यांची वाटेतच प्राणज्योती मालवली होती. जिल्हा शासकीय महाविद्यालयात मृतदेह आणण्यात आला आहे. रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.कुटुंबीयांचा आक्रोशमृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर नातेवाईकांनी त्या ठिकाणी गर्दी केली होती. त्यानंतर मृत्यू झाल्याचे कळताच, त्यांनी एकच हंबरडा फोडला. नारायण हटकर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.अपघातांची मालिका सुरूचशहरातून जाणारया महामागावर अपघातांची मालिका सुरूच आहे. त्यात महामार्गावरील रस्त्यांची झालेली दुर्दशा व खड्डे अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. गुरुवारी देखील बॉम्बे बेकरीजवळ ट्रकने चिरडल्याने महिलेचा मृत्यू झाला होता. एक दिवसानंतर पुन्हा आता शिवकॉलनी पुलावर अपघात होऊन मनपा कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. शहरातील रस्त्यांसह महामार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव