शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
2
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
3
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
4
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
6
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
7
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
8
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
9
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
10
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
11
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
12
National Jamboree: ६१ वर्षांनंतर लखनौत ऐतिहासिक 'राष्ट्रीय जंबोरी'; ३२,००० हून अधिक स्काउट्स होणार सहभागी
13
घरबसल्या पैसे दुप्पट कसे होतील? तेजस्वी प्रकाशने सांगितला फॉर्म्युला, मुलींना दिला आर्थिक सल्ला
14
Mumbai: मुंबई महापालिकेच्या ३०० कोटींच्या उद्यान देखभालीच्या निविदा प्रक्रियेत संशयाच्या भोवरा
15
बिहार निवडणूक; 'या' मतदारसंघात भाजप उमेदवाराचा अवघ्या 30 मतांनी पराभव
16
IPL 2026 : रवींद्र जडेजाच्या पगारात ४ कोटींची कपात होण्यामागचं कारण काय? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
17
Tata Sierra आता नव्या रुपता! मिळणार ट्रिपल स्क्रीन सेटअप अन् अ‍ॅडव्हॉन्स फीचर्स, किती असेल किंमत? जाणून घ्या सविस्तर
18
BMC Election: सर्वपक्षीय १२८ माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेला पालिकेत हव्या १२५ जागा!
19
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: कसे कराल व्रत? शिवशंकर देतील शुभाशिर्वाद, कल्याण-मंगलच होणार!
20
Cyber Security: सर्वांचा डेटा आता होणार सुरक्षित, पुढील १८ महिन्यांत नियम आणखी कडक होणार!
Daily Top 2Weekly Top 5

वडील जेवणासाठी घरी जाताना दिसले, आणि काही मिनिटांतच आला अपघाताचा फोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 20:40 IST

ट्रॅक्टरच्या धडकेत मनपा कर्मचारी ठार : शिवकॉलनी रेल्वे उड्डाण पुलावरील घटना

जळगाव : जेवणासाठी घरी निघालेल्या मनपा कर्मचारी नारायण मांगो हटकर (५८, रा. तांबापुरा, ह.मु. नंदनवन कॉलनी) यांचा ट्रॅक्टरच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास महामार्गावरील शिवकॉलनी रेल्वे उड्डाण पुलावर घडली. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच अपघातानंतर घटनास्थळावरून ट्रॅक्टरचालक पसार झाला.नंदनवन कॉलनीत नारायण मांगो हटकर हे कुटुंबीयांसह वास्तव्यास होते़ ते महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कार्यरत असल्यामुळे त्यांच्याकडे पाणी सोडण्याची जबाबदारी होती़ शनिवारी सकाळी कामावर हजेरी लावल्यानंतर त्यांनी दुपारी कोल्हेनगर परिसरातील नळांना पाणी सोडले. हे काम आटोपल्यानंतर ते दुचाकीने (क्र. एमएच.१९.बीई.३१०८) जेवणासाठी नंदनवन कॉलनीतील घरी जाण्यासाठी निघाले. शिवकॉलनी स्टॉप ओलांडल्यानंतर उड्डाण पुलावरून जात असताना त्यांना भरधाव ट्रॅक्टरने धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रॅक्टरचालक हा घटनास्थळावरून ट्रॅक्टर घेऊन पसार झाला.बहिणीसोबत जात असताना अपघाताचा आला फोन..मयत नारायण हटकर यांचा मुलगा पवन हटकर हा रिक्षा चालविण्याचा व्यवसाय करतो. दुपारी पवन हा सुद्धा शहरात काही कामानिमित्त येण्यासाठी बहिणीला घेऊन नंदनवन कॉलनीतून निघाला होता. शिवकॉलनी स्टॉपजवळून जात असताना त्यास वडील जेवणासाठी घरी जात असल्याचे दिसून आले. पण, काही अंतर कापल्यावर मुलगा पवन याला वडिलांचा अपघात झाल्याचा फोन आला. पवनने तातडीने रिक्षा वळवली व अपघातस्थळी धाव घेतली. वडील जखमी पडल्याचे दिसताच मुलगी आशा आणि मुलगा पवन यांनी त्वरित जखमी अवस्थेत त्यांना रिक्षात टाकून खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, त्यांची वाटेतच प्राणज्योती मालवली होती. जिल्हा शासकीय महाविद्यालयात मृतदेह आणण्यात आला आहे. रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.कुटुंबीयांचा आक्रोशमृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर नातेवाईकांनी त्या ठिकाणी गर्दी केली होती. त्यानंतर मृत्यू झाल्याचे कळताच, त्यांनी एकच हंबरडा फोडला. नारायण हटकर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.अपघातांची मालिका सुरूचशहरातून जाणारया महामागावर अपघातांची मालिका सुरूच आहे. त्यात महामार्गावरील रस्त्यांची झालेली दुर्दशा व खड्डे अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. गुरुवारी देखील बॉम्बे बेकरीजवळ ट्रकने चिरडल्याने महिलेचा मृत्यू झाला होता. एक दिवसानंतर पुन्हा आता शिवकॉलनी पुलावर अपघात होऊन मनपा कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. शहरातील रस्त्यांसह महामार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव