शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे विमान सेवेची प्रवासी संख्या ८० टक्क्यांनी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:17 IST

अल्प प्रतिसाद : कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतरच मुंबईची विमान सेवा नियमित होणार जळगाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे विमान सेवेच्या ...

अल्प प्रतिसाद : कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतरच मुंबईची विमान सेवा नियमित होणार

जळगाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे विमान सेवेच्या प्रवासी संख्येवर मोठा परिणाम झाला असून, तब्बल ८० प्रवासी संख्या घटली असल्याची माहिती विमान कंपनीतर्फे देण्यात आली, तसेच कोरोना रुग्णसंख्येचे प्रमाण कमी झाल्यानंतरच मुंबईची विमानसेवा नियमित होणार असल्याचेही सांगण्यात आले.

सध्या कोरोनाच्या काळातही जळगाव विमान तळावरून आठवड्यातील चार दिवस वेळापत्रकानुसार विमानसेवा सुरू आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सूचनेनुसार आठवड्यातील चारच दिवस ही सेवा ठेवण्यात आली आहे. यात मुंबईची विमानसेवा दर बुधवारी व रविवारी सुरू आहे. मात्र, या सेवेला कोरोनामुळे प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. ७२ आसनी क्षमता असलेल्या या विमानात सध्या १० ते १२ प्रवासी मिळत आहेत. त्यामुळे विमान कंपनीला गेल्या दीड ते दोन महिन्यांच्या काळात एक कोटीहून अधिक आर्थिक नुकसानीचा फटका बसला असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, कोरोनामुळे प्रवाशांचा अल्प प्रतिसाद असला तरी, केंद्राच्या उडान योजनेअंतर्गत जळगावची विमान सेवा असल्यामुळे ही सेवा नियमित सुरू राहणार असल्याचे विमान कंपनीतर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

...तर होणार मुंबईची सेवा नियमित

मुंबई विमान सेवेच्या आठवड्यातून दोनच फेऱ्या होत असल्याबाबत विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोरोनामुळे राज्य शासनाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील अनेक विमान कंपन्यांच्या उड्डाणांना बंदी घातली आहे. त्यामध्ये जळगावला विमानसेवा देणाऱ्या कंपनीचाही समावेश आहे, तर जेव्हा राज्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होईल तेव्हाच मुंबईची विमानसेवा नियमित होणार असल्याचे विमान कंपनीतर्फे सांगण्यात आले.