शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

कोरोना : मंगल कार्यालय, लॉन्स, विवाह सभागृही राहणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 12:45 IST

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर उपाययोजना

जळगाव : कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव टाळण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजनेंतर्गत लग्न समारंभाच्या ठिकाणची गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यातील मंगल कार्यालय, लॉन्स, हॉटेल अथवा अन्य वास्तूंमधील विवाह सभागृह (मॅरेज हॉल) बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी काढले आहेत. १९ मार्चपासून याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश असून पुढील आदेशापर्यंत ही ठिकाणे बंद राहणार आहेत. याचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारादेखील देण्यात आला आहे.कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढू नये याकरीता नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून जिल्ह्यात विविध उपाययोजना करण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये सर्व यात्रा व उत्सवात सहभागी होण्यासाठी देशाच्या तसेच राज्याच्या विविध भागातून येत असतात. अशाच प्रकारे लग्न समारंभ व इतर समारंभांसाठीदेखील वेगवेगळ््या भागातून नागरिक येत असतात. या सर्व नागरिकांची पूर्व तपासणी करणे शक्य नसल्याने जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालय, लॉन्स, हॉटेल अथवा अन्य वास्तूंमधील विवाह सभागृह (मॅरेज हॉल) व विवाहस्थळावर होणारी गर्दी टाळणे आवश्यक आहे. त्यामुळे उपाययोजना म्हणून हे ठिकाणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी १९ रोजी काढले. पुढील आदेशापर्यंत ही ठिकाणे बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे.या आदेशाचे उल्लंघन करून गर्दीचे कार्यक्रम आयोजित केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारादेखील देण्यात आला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव