शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
4
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
5
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
7
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
8
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
9
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
10
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
11
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
14
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
15
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

मुक्ताईनगरात एकहाती विजय आणि एकाकी झुंज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 8:02 PM

मुस्लीम, लेवा आणि बौद्ध समाजाभोवती फिरत राहिली निवडणूक

चुडामण बोरसेजळगाव - मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपाने एक हाती सत्ता मिळविली. तशी भाजपचे विरोधक असलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनीही एकाकी दिलेली चिवट झुंज सगळ्यांच्याच नजेरत भरणारी ठरली. मुक्ताईनगर नगरपंचायतीची ही निवडणूक मुस्लीम, लेवा आणि बौद्ध या तीन समाजाच्या अवती- भवती ही फिरत राहिली.मुक्ताईनगर नगरपंचायतीत १७ पैकी भाजपाला १३ जागा मिळाल्या आहेत. तीन जागा शिवसेनेला आणि एक अपक्ष आहे. एकमेव अपक्ष असलेल्या नुसरतबी मेहबूब खान ह्या भाजपच्याच बंडखोर असल्याचे म्हटले जात आहे. मुक्ताईनगर शहरात मुस्लीम, लेवा आणि बौद्ध समाज मोठ्या प्रमाणात आहेत. हे तीन समाज मतदान फिरवू शकतात, असे म्हटले जाते. त्याचा प्रत्यय निकालात उमटला. भाजपच्या तिकिटावर मुस्लीम समाजाचे सात नगरसेवक निवडून आले आहेत. तर एक अपक्ष मिळून ही संख्या आठ आहे.आमदार एकनाथराव खडसे यांच्या विरोधात कुठलीही निवडणूक लढविणे तसे सोपे नाही. खडसे यांना मानणारा मोठा वर्ग या ठिकाणी आहे. गेल्या तीस वर्षापासून हेच मतदार त्यांना निवडून देत आहेत. भाऊंचा शब्द मानणारे अनेक जण आहेत. निवडणुकीच्या सुरुवातीला चार ते पाच ठिकाणच्या जागा वाटपावरुन भाजापात नाराजी होती. शिवाय मुक्ताईनगरचा हवा तसा विकास झाला नाही. अशी भावना लोकांमध्ये होती. शेवटच्या चार ते पाच दिवसात आमदार खडसे स्वत: शहरात फिरले. नाराजांची नाराजी दूर केली. ग्रामपंचायत असल्याने निधीसाठी मर्यादा येतात, आता नगरपंचायतीत कामे होतील आणि ही कामे फक्त नाथाभाऊच करू शकतात, ही भावनाही लोकांमध्ये रुजविण्यात ते यशस्वी झाले आणि इथूनच मग विजयाचा मार्गही सुकर होत गेला.शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील ह्या शिवसेनेच्या एकांड्या शिलेदाराने एकनाथराव खडसे यांच्याविरुद्ध झुंज दिली. जिल्ह्यातील शिवसेनेची कुठलीही मदत त्यांनी घेतली नाही. तरुण वर्गाचा मोठा गट पाटील यांच्या मागे होता आणि आहे. पाऊस पडल्यावर मुक्ताईनगरातील अनेक रस्त्यांवर होणारा चिखल याबद्दल तर नागरिकांच्या मनात रोष होता. त्याचे रुपांतर मतदानात करुन घेण्यास शिवसेना अपयशी ठरली. याचा फायदा भाजप उमेदवारांना झाला. चंद्रकांत पाटील यांनी आगामी विधानसभेसाठी प्लॅटफॉर्म तयार करुन ठेवला, एवढे मात्र निश्चित. त्यांच्यासाठी ही निवडणूक विधानसभेची रिहर्सल होती.काँग्रेसने या निवडणुकीत सात जागा लढविल्या. एकही जागेवर या पक्षाला विजय मिळू शकला नाही. जिल्ह्यात काँग्रेसला संपविण्यात खडसे यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्याच विरुद्ध काँग्रेसजन उभारी घेत उभे ठाकले. डॉ. जगदीश पाटील यांंनीही एकाचवेळी भाजप आणि शिवसेना यांच्याविरुद्ध लढा दिला. यामुळे किमान काँग्रेसचे अस्तित्व असल्याचे लोकांपर्यंत पोहचले.या निवडणुकीत सुरुवातीला शिवसेना, काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेस यांच्यात महाआघाडी करण्याचा प्रयत्न झाला. नंतर नगराध्यक्षपदासाठी लागणाऱ्या जात पडताळणी प्रमाणपत्रारून शिवसेनेने कॉँग्रेसपासून दूर राहणे पसंत केले. आघाडीत पडलेली ही फूट भाजपाच्या पथ्यावर पडल्याचे म्हटले जात आहे.

 

 

टॅग्स :JalgaonजळगावEknath Khadaseएकनाथ खडसेMuktainagarमुक्ताईनगर