शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
2
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
3
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
4
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
5
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
6
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
7
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
8
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
9
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
10
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
11
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
12
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
13
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
14
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
15
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
16
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
17
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
18
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
19
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
20
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'

कोथिंबीर, हिरवी मिरची, वांगे तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 11:50 AM

टमाट्याचे भाव गडगडले

जळगाव : उन्हाळ््यामुळे भाजीपाल्याची आवक दिवसेंदिवस घटत असून त्यांचे भाव वाढत आहे. यात कोथिंबीर, हिरवी मिरची, वांगे यांचे भाव तर जवळपास दुपटीने वाढले असून इतर भाज्याही ‘भाव’ खात आहेत. दुसरीकडे भर उन्हाळ््यात टमाट्याचे भाव गडगडले आहे.गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने सर्वच पिकांवर त्याचा परिणाम झाला असून कडधान्याची आवक घटल्याने त्यांचेही भाव वाढत आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्यांची आवक घटल्याने त्यांचे भाव वाढत आहे. या आठवड्यात तर कोथिंबीर, हिरवी मिरची, वांगे यांच्या भावात जवळपास दुपटीने तेजी आली आहे.यामध्ये दैनंदिन वापरात येणारी कोथिंबीर सर्वाधिक महागली आहे. गेल्या आठवड्यात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २००० ते ५५०० रुपये प्रती क्विंटलने खरेदी झालेली कोथिंबीर या आठवड्यात थेट ४००० ते ९००० रुपये प्रती क्विंटलवर पोहचली आहे. किरकोळ बाजारात तर कोथिंबीरने प्रती किलोसाठी शंभरी पार केली आहे. कोथिंबीरच्या दर्जानुसार किरकोळ बाजारात हे भाव असून ८० ते १२० रुपये प्रती किलोने ती विक्री होत आहे.कोथिंबीर खालोखाल वांग्याचे भाव वाढले असून गेल्या आठवड्यात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ५०० ते ११०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या वांग्याचे भाव या आठवड्यात ८०० ते २२०० रुपये रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहे. किरकोळ बाजारात ते दर्जानुसार ३० ते ७० रुपये किलोने विक्री होत आहे.घरासह हॉटेल, नाश्त्याचे दुकान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वापरात येणारी हिरवी मिरचीदेखील अधिक ‘तेज’ झाली आहे. गेल्या आठवड्यात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १२०० ते ३५०० रुपये प्रती क्विंटल असणारी हिरव्या मिरचीचे भाव या आठवड्यात २००० ते ५००० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारतही मध्यम दर्जाची मिरची ८० ते १०० रुपये प्रती किलोने विक्री होत आहे.टमाट्याचे भाव निम्म्यावरएरव्ही हिवाळ््यामध्ये टमाट्याची आवक वाढून त्यांचे भाव मोठ्या प्रमाणात कमी होतात. मात्र यंदा भर उन्हाळ््यात टमाट्याचे भाव निम्म्यावर आले आहेत. गेल्या आठवड्यात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १००० ते १७५० रुपये प्रती क्विंटल असलेल्या टमाट्याचे भाव या आठवड्यात ५०० ते १००० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. किरकोळ बाजारात टमाटे १५ ते २० रुपये किलोने विक्री होतआहेत.सध्याकॉलन्यांमध्येहीटमाटेविक्रीच्याहातगाड्यादिसतआहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव