शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
9
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
10
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
11
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
13
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
14
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
15
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
16
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
17
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
18
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
19
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
20
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी

चातुर्मास म्हणजे मांगल्य प्रदान करणारे पर्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 11:39 PM

चातुर्मास म्हणजे चार महिने. आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्वीन, कार्तिकचे १५ दिवस. हा कालावधी विशेष धर्माराधना, साधना, उपासनेचा आहे, असे ...

चातुर्मास म्हणजे चार महिने. आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्वीन, कार्तिकचे १५ दिवस. हा कालावधी विशेष धर्माराधना, साधना, उपासनेचा आहे, असे प्रभू महावीर वर्धमान स्वामीने शास्त्रात सांगितले आहे. आषाढ म्हणजे अषढ-षटरिपूंपासून आत्म्याची सुटका. श्रावण म्हणजे श्रवण करणारे, प्रवचन ऐकणारे बना. भाद्रपद म्हणजे भद्रपद - सरल बना. अश्वीन म्हणजे अश्वीनीकुमार - स्वत:चे डॉक्टर स्वत: बना. तात्पर्य स्वत:च्या आरोग्याची काळजी स्वत:च घेतली पाहिजे. कार्तिक म्हणजे करा त्रिक - सम्यक दर्शन सम्पक ज्ञान, समक चरित्र जीवनात जोपासा. या चार महिन्यात ज्याने सद्गुरुंच्या सान्निध्यात किंवा मार्गदर्शनाने धर्म केला त्याचे कल्याण सुनिश्चित आहे.जसे शेतकरी पावसाळ्यात राबराब राबतो, आठ महिन्यांची कमाई चार महिन्यात करतो, तसेच पुण्यात्म्यानी चातुर्मासात धर्म केला तर झाला आठ महिने सुख-शांती मिळते. धर्म म्हटला म्हणजे तप-त्यागाने जीवन सुगंधीत करणे होय. दंभाला तिथे थारा नाही, लोभाला स्थान नाही. फक्त आणि फक्त आत्म ध्यान असते. आत्म गुण विकास, गुणांची शुध्दी, गुणांची प्राप्ती म्हणजेच धर्म होय. आत्मा अनंतगुणांनी भरलेला आहे. चार महिन्यांचा हा कालावधी आपली मनाची स्थिरता वाढविणे आणि आपल्या चेतनामध्ये स्थिरता करून घेण्याचे श्रेष्ठ माध्यम ध्यान असते. स्वाध्याय, जप आणि तपाने आपली आत्मा शुध्द करण्याचा हा काळ असण्यासह चातुर्मास काळ म्हणजे आराधनेचा पवित्र काळ आहे.- मुनीप्रवर श्री मोक्षरक्षित विजयश्री महाराज

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव