जळगावात महामार्गावर ‘द बर्निंग कार’चा थरार, चौघांचा जीव वाचला 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2020 06:27 PM2020-11-18T18:27:07+5:302020-11-18T18:28:29+5:30

Burning Car : शॉर्ट सर्कीटमुळे घेतला पेट

The burning of 'The Burning Car' on the highway in Jalgaon saved the lives of four people | जळगावात महामार्गावर ‘द बर्निंग कार’चा थरार, चौघांचा जीव वाचला 

जळगावात महामार्गावर ‘द बर्निंग कार’चा थरार, चौघांचा जीव वाचला 

Next
ठळक मुद्देरस्त्याच्या मध्यभागीच ही घटना घडल्याने महामार्गावर वाहतुकीचा ख‌ोळंबा झाला होता. काही कळण्याच्या आत कारमधून भडका उडाला. यानंतर चौघेही मित्र महामार्गालगत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाकडे पळत सुटले.

जळगाव : सिग्नलवर थांबलेल्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना बुधवारी दुपारी अडीच वाजता महामार्गावर आकाशवाणी चौकात घडली. कारमधून निघणाऱ्या आगीच्या ज्वालांमुळे प्रचंड पळापळ व धावपळ उडाली. नशीब बलवत्तर म्हणून कारमधील चौघे जण बचावले, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. वाहतूक पोलीस, नागरीक व अग्निशमन दलाच्या जवानांच्या प्रयत्नांनी कार विझविण्यात आली. रस्त्याच्या मध्यभागीच ही घटना घडल्याने महामार्गावर वाहतुकीचा ख‌ोळंबा झाला होता.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कासोदा येथील आशिष मिलिंद तायडे (वय २२) हा  मित्र दिपक अडकमोल, पवन अडकमोल व गोपाल राक्षे यांच्यासोबत कारने (क्र.जी.जे.०५  सी.एच.९४४९) बुधवारी सकाळी जळगावात आला होता. अजिंठा चौफुली येथून काम आटोपून दुपारी २ वाजेच्या सुमारास ते पुन्हा कासोदा येथे घराकडे जाण्यासाठी निघाले. अडीच वाजता ते अजिंठा चौफुली येथे पोहचले. सिग्नल नसल्याने त्यांनी कार थांबविली. यावेळी कारमधून धुर निघत असल्याचे अशिषसह  मित्रांच्या लक्षात आले. नेमका काय प्रकार आहे, हे पाहण्यासाठी चौघेही कारमधून बाहेर उतरले. पाहणी केली असता, कारच्या खाली शॉर्टसर्किटने झाल्याचे दिसून आले. काही कळण्याच्या आत कारमधून भडका उडाला. यानंतर चौघेही मित्र महामार्गालगत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाकडे पळत सुटले.


अग्निचा भडका अन‌् पळापळ
कारमधून अग्निचा भडका उडाल्यानंतर चौकात थांबलेल्या वाहतूक पोलिसांनी तत्काळ महापालिकेच्या अग्निशमन विभागाला कळविला. त्यानुसार गोलाणी मार्केट येथून अवघ्या काही मिनिटातच अग्निशमन बंब घटनास्थळावर पोहचला. अग्निशमन विभागाचे युसुफ पटेल, देवीदास सुरवाडे, प्रकाश चव्हाण, गंगारधर कोळी, राजेंद्र चौधरी, सोपान जाधव या अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळविले. रस्त्याच्या मधोमध कार जळाल्याने तसेच घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाल्याने रस्त्यावर काही काळासाठी वाहतूक खोळंबली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. शहर वाहतूक शाखेचे साहेबराव कोळी, किरण मराठे, गणेश पाटील, बारसू नारखेडे, फिरोज तडवी, मोहनीन पठाण या कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने खाक झालेली कार रस्त्याच्या बाजूला केली व वाहतूक सुरळीत केली. अग्निशमन विभागाचे प्रकाश चव्हाण यांनी घटनेची नोंद केली आहे.

 

Web Title: The burning of 'The Burning Car' on the highway in Jalgaon saved the lives of four people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.